Sunday, 16 October 2016

प्रसार माध्यमे फायदे आणि तोटे


माझा पहिला आदर्श शिक्षक पुरस्कार

      

'शिक्षणातले जुनेच वारे आता नव्यानं वाहू पाहतात,गांधीरवींद्रनाथसाने गुरुजी पुन्हा नव्याने भेटू पाहतात....शिक्षणाचे नवेच पाझर पुन्हा नव्याने न्हाऊ पाहतातविवेकानंद पुन्हा भेटून विवेकी - विचार आणू पाहतात,शिक्षण जगवू  - घडवू पाहतात.... स्वीकारू याअंगिकारू याहृदया - हृदयापर्यंत नेऊ या... शिक्षणाची अमृतधारा 




'A teacher takes a hand,Open a mind and touches the heart by his teaching'

'Teaching is an art, its not a job.'


            अध्यापन हे आदर्श करिअर मानले जाते. शिकवण्याची मनापासूनची इच्छा आणि शिकवण्याची आवड असणे हा फार आवश्यक आणि महत्त्वाचा गुण आहे या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी आहे. 
                          'जसा कवी जन्मावा लागतो तसाच शिक्षकही जन्मावा लागतो' असं म्हणतात. शिकवण्याची कला ही शिक्षकाची अंगी उपजतच असते म्हणून तेच फक्त शिक्षक व्हावयास लायक असतात असे म्हणतात.                       
                          आपल्याकडील 'वसिष्ठसांदिपनीयांसारख्या ऋषीमुनी किंवा पाश्चात्य 'सॉक्रेटिसप्लेटोऍरिस्टोटलया सर्व विचहरवंतांनी अध्यापनाचा प्रभावी पाया घालून दिला. त्यांनी घालून दिलेली परंपरा तशीच किंवा त्यासारखी कित्येक वर्षे प्रचलित होती. या परंपरेने एक पाया घालून दिला होता व त्यानुसार अध्यापन हि एक वैशिष्टयपूर्ण क्रिया असून त्यासाठी उच्च बुद्धिमत्ता व कौशल्य लागते. 
        जीवन म्हणजे कायअसे जर कोणी मला विचारले तर 'जीवन म्हणजे संस्कार संचय' अशी मी व्याख्या करेनअसे विनोबा भावे यांनी एका ठिकाणी म्हटले आहे. हि संस्कारक्षमता व्यक्तीला अनेक ठिकाणांहुन प्राप्त होत असते. त्या अनेक ठिकाणांपैकी महत्त्वाचे केंद्र म्हणजे शिक्षण होय. शिक्षणातून विद्यार्थी केवळ ज्ञानसंपन्न आणि कौशल्यपरायण झाला एवढ्यावरच संतुष्ट राहणे अपुरे ठरेल. विद्यार्थी मनानेही तेवढाच संस्कारीत झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या मशागतीसाठी कुशल अध्यापकाची गरज आहे.
         कोणतीही कला म्हटली की, त्यात सर्जनशीलता पाहिजे. त्यात नाविन्य पाहिजे. कलेने स्फुर्ती दिली पाहिजे. कलेने परंपरा सांभाळून नव्या वाटा शोधल्या पाहिजेत. हे कलेसंबंधीचे विचार अध्यापन कलेलाही लागू पडतात. शिवाय काळाच्या ओघात जशी कलेची नवी तंत्रे दिसतात, नवे स्वरूप दिसते तशी अध्यापनाची नवी स्वरूपे, तंत्रे नव्या पद्धती विकसित होताना दिसतात. अर्वाचीन काळात शिक्षणाच्या कल्पनाही झपाटयाने बदलत आहेत. 
         पूर्वी शिक्षण प्रक्रियेत शिक्षक केंद्रस्थानी होता तर आता विद्यार्थी केंद्रस्थानी आहे. पूर्वी श्रवणशक्ती, घोकंपट्टी रूढ होती. आता मात्र विद्यार्थ्यांच्या स्वयं शिक्षणाला, सहभागाला, स्वयं अध्ययनाला महत्त्व आले आहे. पूर्वी अध्यापन साधने नाममात्र होती तर आता मात्र विद्यार्थ्यांच्या स्वयं शिक्षणाला, सहभागाला महत्त्व आले आहे. पूर्वी अध्यापन साधने नाममात्र होती तर आता अध्यापन साधनांचा सुकाळ आहे. पूर्वी शिक्षण हे विशिष्ट वर्गासाठी सिमित होते तर आता सर्वांसाठी, समतेसाठी शिक्षण असा पुकारा होत आहे.
                        खरेतर शिक्षक भाग्यवानच म्हटला पाहिजे कारण नेहमीच त्याच्या भोवतालचे वातावरण चैतन्यमय असते. अनेक बालिश, उत्सुक चेहरे त्याच्याकडे आशेने बघत असतात. त्यांना तृप्तीचा आनंद शिक्षकाने द्यावयाचा आहे. शिक्षणक्षेत्राचा किंवा शिक्षकी पेशाचा विचार करता प्रत्येक शिक्षकाला काही किमान गोष्टींची जाणीव असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट या क्षेत्रातील आपला संबंध सातत्याने विद्यार्थ्यांशी येतो. काही शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये मिसळणे, त्यांना समजावून घेणे सहजगत्या जमते. तर काहींना हे कौशल्य जाणीवपूर्वक जोपासावे लागते. त्यामुळे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला साजेश्या उपक्रमात भाग घेणे हे समाधानकारक असेलच.  


Teaching is not just profession but it is mission.

          जरी शिक्षिकी पेशा हा पोटापाण्याचा व्यवसाय असेल किंवा मुख्य आर्थिक स्त्रोत असेल तरीसुद्धा केवळ आर्थिक क्रांती हे एकमेव ध्येय नसावे. या ठिकाणी 'आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना |' अशी आदर्शवादी भूमिका अपेक्षित आहे. याचे कारण म्हणजे पालकांप्रमाणेच शिक्षकही मुलांसाठी आदर्श असतात. त्यामुळे 'मी सांगतो तसे वाग, मी वागतो तसे नको' अशी भूमिका नसावी. शिक्षक विद्यार्थ्यांना स्वत:बद्दलची वास्तव जाणीव करून देण्यास मदत करू सतत 
           प्रभावी अध्यापनाचा मुलभूत पाया म्हणजे आशय होय. अध्यापनाला जीव की प्राण आत्मा मानावे. जीव ओतून अध्यापन करणारा शिक्षकच खर्या अर्थाने विद्यार्थांच्या गुणवत्तेच्या दिशेने नेतो. कुतूहल निर्माण होईल अशा प्रकारची अद्ययावत अध्यापनपद्धती, तंत्रे, प्रतिमाने यांचा वापर केल्यास अध्यापन परीमानकारक होते. शिक्षकाचे व्यावसायिक समाधान हे त्याच्या अध्यापन कार्यातच दडले आहे. भाषेवरील प्रभुत्व, शिस्त व वक्तशीरपणा व विनोदबुद्धीने केले तर दुधात साखर कारण 'यथा राजा तथा प्रजा' या म्हणीनुसार 'जसा शिक्षक तसा विद्यार्थी' घडतो.
              वर्गात अध्यापन करत असताना प्रगत विद्यार्थ्यांसोबत अप्रगत विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागतात कारण सर्वच विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक सारखा नसतो. घरातील वातावरण, प्रेम, सुविधा सारख्याच नसतात. अशावेळी शक्कल लावून वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करावा लागतो. उदा. कथाकथन पद्धती, प्रश्नपद्धती, प्रकल्पपद्धती, चर्चात्मक पद्धती, नाटक पद्धती, इत्यादी. अशा विद्यार्थ्यांसाठी अध्यापन करताना सतत विषयाची पुनरावृत्ती करावी लागते. पंचइंद्रियांचा पूर्ण वापर करून ज्ञानदान करावे लागते. उदा. सफरचंद नुसते पाहून मनावर त्याची छाप मर्यादित पडेल, परंतु तेच सफरचंद हाताळण्यास दिले, स्पर्श केला, वास घेतला, स्वाद चाखला तर त्याची गाढ छाप मनावर बसते.

               माझ्या मते, अध्यापन जर यशस्वी करायचे असेल तर सर्वात प्रथम नियोजन महत्त्वाचे असते. हर्बाटच्या पंचपदीनुसार आपल्याला दैनंदिन अध्यापनाच्या घटकाचा जीवनाशी संबंध जोडता आला पाहिजे. उदा. विज्ञानातील विविध प्रयोग हे दैनंदिन जीवनाशीच निगडीत आहे. पावसाळ्यात येणारे गढूळ पाणी शुद्ध असते का? ते कसे शुद्ध करता येईल? अशा प्रश्नांनी पाण्याचे शुद्धीकरण शिकवावयास सुरुवात केली तर अध्यापन निश्चितच परिणामकारक होईल. अध्यायनार्थीची पातळी लक्षात घेऊन, पुर्वज्ञानाचे दुवे लक्षात घेऊन त्यांना समजून घेणारा, शिक्षकच चांगले अध्यापन करू शकतो. उदा. गुणाकार शिकवताना बेरजेचे ज्ञान पडताळणे आवश्यक असते. भागाकार शिकवताना गुणाकार, वजाबाकीचे ज्ञान पडताळणे आवश्यक आहे.

                पाठ्यपुस्तकातील घटक कोणताही असो, पाठ्यपुस्तकाद्वारेभूतकाळातील घटना, त्यांची वर्तमानाशी तुलना करून भविष्याचा वेध घ्यायला शिक्षण देणे हेच आनंददायी शिक्षण प्रक्रियेचे मूळ उद्दिष्ट आहे. 
         माझ्या मते शिक्षक किती शिकवतो. यापेक्षा कसे शिकवतो? हे महत्त्वाचे आहे. ज्ञानदानाबरोबर जीवनकौशल्याची रुजवणूक, गाभाघटक, नैतिकमुल्ये यांचा विचार करणे गरजेचे असते. विद्यार्थ्याच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. नवीन शिक्षणप्रणालीनुसार शिक्षकाने काम करायचे असते, हे जरी खरे असले तरी शाळेतील शिक्षकाचे महत्त्व कमी नाही. विद्यार्थी कार्यप्रवृत्त झाला पाहिजे, त्याला अभ्यासाची गोडी निर्माण झाली पाहिजे, चांगला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक मुल्यांची जोपासना करणे इत्यादी जबाबदाऱ्या अध्ययनाद्वारे - अध्यापानाद्वारे शिक्षकाला पार पडायच्या असतात.
           अध्यापनात कला व शास्त्र यांचा सुरेख संगम साधला तर सुलभ प्रक्रिया होते. कला व्यक्तीपरत्वे बदलते. त्यामुळे ती वेगवेगळ्या कौशल्यांचा वापर करून समृद्ध करता येते.


'मी ऐकले, मी विसरलो,
मी पाहिले माझ्या लक्षात राहिले,
मी केले मला समजले,
मी अनुभवले मला उमजले.'


          कृतीयुक्त सहभागातून संबोध पक्के होतात. पर्यावरण, विज्ञान, भूगोल या विषयांत भोवतालच्या परिसरातील डोंगर, नदया, आकाश, तारे, झाडे, फुले, पक्षी इ. निरीक्षण करून अनुभव घेतला तर तो कायमस्वरूपी होतो.
         इंग्रजीचे संवाद, one act play घेताना योग्य पात्रांची निवड करून नाट्यीकरण पद्धतीने पाठ घेतल्यास वेगळ्या पद्धतीने अर्थ समजून सांगण्याची गरज नाही. सतत ऐकत राहणे हि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. याउलट मुलांचा सहभाग घेतला तर मुलांना आनंद होतो.
आपल्या विषयाकडे आकर्षित करण्यासाठी योग्य वातावरणनिर्मिती करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे.इंग्रजी विषयात शब्दांचे अर्थ समजून सांगताना 'Direct Method' चा वापर करताना विविध उदाहरणे, वाक्य, कृती, वस्तूंचा वापर केला गेला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहितीच्या युगात विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. मग आपली भूमिका काय? आपल्याला एवढंच करता येईल. त्या माहितीचे ज्ञानात विशेषतः व्यवहार्य उपयोग करता येईल याकडे लक्ष दिली पाहिजे. अद्ययावत ज्ञान देण्यासाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर करताना शिक्षकाने स्वत:ला अद्ययावत ठेवले पाहिजे.
            आज अध्यापक, अध्यापन, अध्ययन या सर्वच भूमिकांमध्ये होणाऱ्या बदलांना आनंदाने सामोरे जाणे गरजेचे आहे. आपल्या आनंदी अध्यापनाने ही कला विकसित करणे आपले आद्य कर्तव्य आहे. जाता - जाता एवढंच म्हणेन -

'मातीचे गोळे नव्हे,
सजीव चैतन्यांचे कलश हे...
या कलशांना सजवूया, घडवूया,
ज्ञानरूपी बनवूया....
साक्षर भारत घडवू या,
 साक्षर भारत घडवू या,|'

माझी ओळख

मी सौ शिल्पा योगेश पाटील विकास मंदिर सेमी इंग्रजी प्राथमिक विद्यालय  उल्हासनगर ४ येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे माझा इमेल आयडी patilshilpa907@gmail.com my mobile no is 8691049880 
अध्यापन एक कला