Thursday, 23 January 2020

🔸🔸🔸🔸🔸🔹🔸🔸🔸🔸🔸
*रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते टर्मिनल ?*

*जर कुठल्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल लिहिले असेल तर त्याचा अर्थ तिथून पुढे ट्रॅक नाही. म्हणजे रेल्वे ज्या दिशेने आली त्याच दिशेने परत जाणार. टर्मिनसला टर्मिनल पण म्हटले जाते. म्हणजे असे स्टेशन जिथून रेल्वे पुढे न जाता आली त्याच दिशेने परत जाते. आपल्या माहितीसाठी देशात सध्या 27 स्टेशनवर टर्मिनल लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस हे देशातील सगळ्यात मोठे टर्मिनल आहेत.*

 *चला तर तुम्हाला सांगतो की, रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते सेंट्रल ?*

*स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असले तर त्या शहरात एक पेक्षा अधिक स्टेशन आहेत. ज्या रेल्वे% स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असते ते त्या शहरातील सगळ्यात जुने स्टेशन असते. रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेलं असण्याचा दुसरा अर्थ असा की ते त्या शहरातील सगळ्यात व्यस्त राहणारे स्टेशन आहे. तुमच्या माहितीसाठी सध्या भारतात मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, त्रिवेंद्रम सेंट्रल, मंगलोर सेंट्रल, कानपुर सेंट्रल हे प्रमुख सेंट्रल स्टेशन आहेत.*

 *रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते जंक्शन ?*

*कुठल्याही स्टेशनच्या नावाच्या शेवटी जंक्शन लिहिलेले असणे म्हणजे त्या स्टेशनवर येण्या जाण्यासाठी ३ पेक्षा अधिक मार्ग आहेत. म्हणजे ट्रेन एका मार्गाने येऊन त्या स्टेशन वरून इतर दोन मार्गावरून जाऊ शकते. त्यामुळे स्टेशनच्या नावाच्या शेवटी जंक्शन लिहिलेले असते. सध्या देशात मथुरा जंक्शन (७ रुट्स), सालेम जंक्शन (६ रुट्स), विजयवाड़ा जंक्शन (५ रुट्स ), बरैली जंक्शन (५ रुट्स) हे जंक्शन स्टेशन आहेत.*
🔸🔸🔸🔸🔸🔹🔸🔸🔸🔸🔸
🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴
            *मतदानाच्या शाईची कथा.*

*मतदाराने मतदान केल्याची खूण म्हणून बोटावर जी शाई लावली जाते, ती गेली ५६ वर्षे मैसूर येथे बनविली जात आहे याची अनेकांना माहिती नसेल. हि शाई सर्वप्रथम मैसूरचे महाराज कृष्णराज वाडियार यांनी १९३७ मध्ये स्थापन केलेल्या मैसूर इंक लॅक अँड पेंट लिमिटेड या कारखान्यात बनविली गेली. मात्र तिचा प्रथम वापर १९६२ मध्ये केला गेला. पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना या शाईची संकल्पना सुचली.*

*त्याआधी बोटाला डाय लावला जायचा. त्यानंतर आजतागायत हीच शाई निवडणूक प्रक्रियेत वापरली जात आहे.*

*मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमीटेड या कंपनी मार्फत या शाईचे उत्पादन होते. हि शाई येथून मालदीव, अफगाणिस्थान, कंबोडिया, मलेशिया, इजिप्त, द.आफ्रिका या देशात निर्यात केली जाते. या शाईसाठी विशेष फॉर्म्युला वापरला जातो.*

*या शाईत २५ टक्क्यांपर्यंत सिल्वर नायट्रेट असतं. हे खूप महागडं रसायन असतं हे जांभळ्या रंगाचे विशेष रसायन सूर्यप्रकाशात रंग बदलते आणि सहजी ते घालविता येत नाही.*

*भारतात हाताच्या नखाखाली हि शाई मतदान केल्यावर लावली जाते, तर मालदीव कंबोडियात बोट या शाईत बुडविले जाते. बुरांडी, बुर्कीनो फासो येथे ती ब्रशने लावली जाते तर इजिप्त मध्ये त्यासाठी पेन वापरले जाते.*

*निवडणुकीसाठी पुरविण्यात येणाऱ्या शाईची खूप दक्षता घेतली जाते, आणि तिचा चोख हिशोब ठेवला जातो. या शाईच्या एका बाटलीतून ७०० ते ८०० मतदारांच्या बोटावर खूण करता येते. उरलेली शाई निवडणूक कार्यालयात जमा केली जाते आणि नंतर ती नष्ट केली जाते.*

🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴

Tuesday, 21 January 2020

मराठी भाषा पंधरवडा निमित्त

      🙏वंदन मायबोलीला🙏

मायबोली माझी मराठी
करतो तिजला वंदन
तिच्याचमुळे फुलले
माझ्या जीवनाचे नंदनवन

कधी न फिटती उपकार
माझ्या मायबोलीचे
मायबोलीने घडविले
दर्शन थोर विचारांचे

लावते अम्रुत ओठी
माय मराठी
आठवती नित्य
सानेगुरुजींच्या गोष्टी

विश्वात्मकतेचा नंदादीप
पेटविला संत ज्ञानेश्वरांनी
भक्तीच्या मंदिरावर कळस बांधला
महाराष्ट्र संत तुकोबा रायांनी

दासबोध करुणाष्टके मनाचे श्लोक
आरत्या,श्री हनुमंताची देवळे
साकारणार्या समर्थ रामदासांनी
राष्ट्रभक्तीचेही धडे दिले

पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे
बालकवी,राजकवी,बा.भ.बोरकर
यांच्यासह दुर्गाबाई,इरावती कर्वे
शांता शेळकेंनी फुलवला बहर

खांडेकर,कुसुमाग्रज, विंदा,नेमाडे
हे सारस्वत ज्ञानपीठाचे मानकरी
जनाई,मुक्ताई,बहिणाईचे वाङमय
हे तर सुवर्ण लेणे साक्षात् ईश्वरी

फादर दिब्रिटोंसह सर्व अध्यक्षांनी
वाढविली मायबोलीची श्रीमंती
कधी न फिटती उपकार जिचे
त्या माय मराठीची गाऊ आरती

राजेंद्र र.वाणी
दहिसर मुंबई🙏🌷