Saturday, 22 April 2017

‘अडगळीत गेलेले शब्द

‘अडगळीत गेलेले शब्द

‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की ‘अडगळ’ हा शब्दच अडगळीत गेला आहे.पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची.सगळ्या नको असलेल्या,परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते.

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, ओसरी, पडवी, परसू, माजघर, बळद, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.


माळा (आताच्या मराठीत अॅटिक, पाण्याची अवैध सिंटेक्स टाकी लपवण्याचं ठिकाण) ही पूर्वी अभ्यासाची जागा पण असायची.


तसंच आता व्हेंटिलेटर फक्त हॉस्पिटल किंवा थिएटर मधेच दिसतो. दरवाज्यावर एक झरोकावजा खिडकी असायची हवा खेळती रहाण्यासाठी, तिला व्हेंटिलेटर म्हणायचे हे थोड्यांनाच माहीत असेल. 


‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा. घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.


पागोळं म्हणजे काय?  वळचणीवर पाऊस पडल्यानंतर बहुतेक पाणी 'पन्हळी' तून जमिनीत जातं. पण तरीही बरेच चुकार थेंब पन्हळीतून खाली येतात - ती पागोळी.


‘फडताळ’ ..... फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द. जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.


गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली. सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. आता व्हॅनिटी बॉक्सेस आल्या. प्रसाधनं त्याच्यात, डोळ्यात व दुकानात मावेनाशी झाली. 


लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला ‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.


स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल,वैल,निखारे हे शब्दही गेले. स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोवळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले. ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला. पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले. देवघराबरोबर सहाण, गंधाची थाटी, गायब. 


‘काथवट’हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली. 


कपड्यांचा विचार करताना तठव,जाजम,बसकर, सुताडे सगळे हरवून गेलेले.सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,  पण उत्तरवस्त्र ‘पाभरी’ हरवून गेली. सोवळ्यात नेसण्याची‘ धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.

सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले. 

कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या, ढोल्या - ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे - त्या गडप झाल्या.

सूप खुंटीवरून बाउल मधे आलं.

एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई. 


‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले. काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात.भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे,फक्त गेल्या अर्धशतकाच्या पूर्वी विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच,इतकेच


काळाबरोबर प्रत्येकाला बदलावंच लागतं

जे नाही बदलंत ते मोडून पडतं
          ।। कालाय तस्मै नम:।।⁠⁠⁠⁠

खरा आनंद

खरा आनंद
एकदा श्री कृष्ण आणि अर्जुन फिरायला बाहेर पडले. वाटेत त्यांना एक माणूस भीक मागताना दिसला. अर्जुनाला त्याची दया आली आणि त्यांनी त्याला सुवर्णमुद्रांनी भरलेले एक पोते दिले.
या अचानक धनलाभाने तो माणूस अतिशय प्रसन्न झाला. मनात आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवत आपल्या घराच्या दिशेने जाऊ लागला. पण त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. वाटेत चोरांनी त्याला अडवले आणि सुवर्णमुद्रांनी भरलेले ते पोते चोरून घेऊन गेले.
तो माणूस दुःखी मनाने आपल्या चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.
अर्जुनाला जेव्हा तो भीक मागताना दिसला तेव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.
सर्व हकिकत ऐकल्यानंतर अर्जुनाला त्याची दया आली. आणि त्याला एक मौल्यवान माणिक दिले. ते घेवून तो घरी पोहोचला. त्याच्या घरात एक जुने मडके होते. त्याचा वापर गेल्या कित्येक दिवसात झाला नव्हता. चोरीच्या भीतीने त्याने ते माणिक त्या मडक्यात लपवून ठेवले.
अजूनही त्याचे दुर्भाग्य त्याची सोबत सोडायला तयार नव्हते. दमल्यामुळे त्याला गाढ झोप लागली. त्याच वेळी त्याची पत्नी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. वाटेत धक्का लागून तिचे मडके पडून फुटले.
तिने विचार करुन घरी असलेले जुने मडके घेऊन पाणी भरायला नदीवर गेली. मडके स्वच्छ धुऊन चांगले पाणी भरून घरी आली. माणिक पाण्यात पडले.
माणसाला जेव्हा हे कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला.
चरितार्थासाठी पुन्हा भीक मागू लागला.
अर्जुन आणि श्री कृष्णाला जेव्हा तो भीक मागतांना दिसला तेंव्हा त्यांनी त्याचे कारण विचारले.
सर्व हकिकत ऐकल्यानंतर त्यांना वाटले की यांच्या नशिबात सुख नाही आहे. आपण काही तरी करुया की जेणे करुन हा यातून बाहेर पडेल.
आता यापुढे देवाची कृपा सुरु झाली. श्रीकृष्णाने त्या माणसाला दानात फक्त दोन रुपये दिले.
अर्जुन म्हणाला "प्रभू मी दिलेल्या सुवर्णमुद्रा आणि माणिक या माणसाचे दारिद्रय घालवू शकले नाही तर या दोन रुपयांनी काय होणार?"
हे ऐकून श्रीकृष्ण फक्त हसले आणि अर्जुनाला त्या माणसाच्या मागावर जायला सांगितले.
तो माणूस चालता चालता विचार करू लागला की दोन रुपयात धड एका माणसाचे जेवण पण होत नाही आणि देवाने असे कसे केले? ही देवाची कसली कृपा?
चालत असतांना त्याची नजर एका मासेमा-यावर गेली. त्याच्या जाळ्यात एक
छोटा मासा तडफडत होता. माणसाने विचार केला की दोन रूपयात आपले पोट भरणार नाही पण या माश्याचा जीव वाचू शकतो.
सौदा करुन त्याने दोन रूपयांना तो मासा विकत घेतला. त्याला आपल्या कमंडलूत घेतले. त्यात पाणी भरले आणि त्याला नदीत सोडायला निघाला.
प्रभूची लीला पाहा.... माश्याच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडले. निर्धन माणसाने ते पाहिले तर काय आश्चर्य, माश्याने गिळलेला तोच माणिक होता तो की जो त्याने मडक्यात ठेवला होता.
तो माणूस अत्यानंदाने ओरडू लागला "सापडला, सापडला"
नेमका त्याबाजूने तो चोर चालला होता ज्याने याच्या सुवर्णमुद्रा लुटल्या होत्या.
त्याने माणसाला "सापडला सापडला" असे ओरडताना पाहिले. चोर घाबरला. चोराने विचार केला की याने मला ओळखले आहे आणि आता हा राजाकडे माझी तक्रार करील. घाबरुन त्याने चोरलेल्या सर्व सुवर्ण मुद्रा त्याला परत आणून दिल्या आणि क्षमा मागू लागला.
हे पाहाताच अर्जुनाने श्रीकृष्णाला नमस्कार केला. अर्जुन म्हणाला "जे काम पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक करू शकले नाही ते आपल्या दोन रुपयांनी करुन दाखवले"
श्रीकृष्ण म्हणाले “अर्जुना हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. जेंव्हा तू पोतेभर सुवर्णमुद्रा आणि मौल्यवान माणिक त्याला दिलेस तेंव्हा त्याने फक्त स्वतःचा विचार केला पण दोन रुपये दिल्यानंतर त्याने दुस-याचा विचार केला. म्हणून जेंव्हा आपण दुस-याच्या दुःखाचा विचार करतो, दुस-याचे भले करतो तेंव्हा आपण देवाचे काम करतो. आणि तेंव्हा देव आपल्या सोबत असतो".⁠⁠⁠⁠

कडू डोस:

कडू डोस 14

कुणावाचून कुणाचे अडत नाही


'जो चोच देतो ,तो दाणे पण देतो.' अशी एक म्हण आहे.ही म्हण ज्याने सर्वात अगोदर म्हटली असेल त्याला शतशः प्रणाम.

म्हणी तयार होतात त्या खूप निरीक्षण करून होत असतात.आणि ही सुद्धा म्हण निर्मात्याने निरीक्षण करूनच लिहिली किंवा बोलली असेल.
आता बघा ना .लहान लहान पशु पक्षी असतात.त्यांना सुद्धा निर्माता जगवतोच ना.इतकेसे जीव किती किती मोठा प्रवास करून आपले पोट भरतात. कुठे ना कुठे तरी त्याच्या पोटाची व्यवस्था केलेलीच असते.जर कोणी आणून दिले तर चांगलेच पण नसेलच कोणी आणून दिले तर ते स्वतःचे पोट भरण्यासाठी वणवण भटकतात, आणि आपले अन्न मिळवतात.
मानवजातीचे पण तसेच नाही का,सुरुवातीचे दिवस त्याचे आईवडील नातेवाईक त्याच्यासाठी खूप काही करतात.त्याला चालायला शिकवतात.जगायला शिकवतात.समाजात कसे वावरायचे हे शिकवतात, समाजाची बरोबरी करण्याची ताकद देतात. समाजातील तो एक प्रतिष्ठित नागरिक होतो. मग तो इतरांना शिकवायला लागतो.हे रहाट असेच चालू असते.कधी कधी त्याच्या डोक्यात हवा जाते, आणि 'मी आज जो काही आहे तो स्वतःच्या ताकदीवर आहे,मला कोणीही मदत केली नाही, मी माझे विश्व स्वतः तयार केले, अशा वलग्ना करतो.आई बाप आणि त्याला घडवणारा समाज याना विसरतो.स्वतःसाठी जगतो.
 या जगात प्रत्येकासाठी घर, अन्न विधात्याने बनवून ठेवले आहे. फक्त ते त्याला त्याचे शोधावे लागते.काहींना चटकन मिळते काहींना खूप मेहनत करूनही मिळत नाही. शेवटी त्याचा अंत होतो पण त्यांच्यासाठीचे घर त्याला।मिळत नाही.
त्याचे प्रयत्न अपुरे पडतात. कधीकधी साथ देणारे अर्धवट रस्त्यात सोडून जातात.
पण तो धीराचा असला तर स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढतो.इतरांवर अवलंबून राहत नाही.
जो इतरांवर अवलंबून असतो त्याचे काही खरे नसते.तुम्हाला काही मिळवायचे असेल तर स्व कर्तृत्व अतिशय महत्वाचे. सोबत करणारे शेवटपर्यंत साथ देतीलच असे नाही.एखादे कार्य करण्यास ते सोबत येतील पण शेवटपर्यंत  टिकतीलच असे नाही.ते तुम्हाला मध्यावर सोडून जातील.त्यावेळेस तुमच्यात धमक असली पाहिजे.घेतलेले कार्य शिद्दीस नेण्याची जिद्द पाहिजे. तुम्ही कोणाच्या भरवश्यावर एखादे कार्य हाती घ्याल तर तुमचे काही खरे नाही.ते तुम्हाला कार्य पूर्ण होण्याआधीच सोडून जाऊ शकतात. किंवा तुमच्या कार्यात अडथळे सुद्धा आणू शकतात.
तुमच्या सोबत असणारे कधी कधी तुमच्या पासून अलगद दूर जाऊन तुमची गम्मत पाहू शकतात. तुमच्यावर कोट्या करू शकतात.तुमची कशी फजिती होते हे दूरवरून बघू शकतात.पण तुम्ही धीराचे असाल तर त्यांच्यावर मात करू शकता.त्यांचे दात त्यांच्याच घश्यात घालू शकता. 
तुम्हाला ध्येय साधण्यासाठी एखाद्या प्रवासाला जावे लागते.तो प्रवास असाध्य असतो पण अश्यक्य नसतो.तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही तो शक्य करू शकता.पण कधी कधी सोबत असलेले ,आणि ज्यांच्यावर तुमचा भरोसा आहे तेच तुम्हाला संकटात टाकून मागे फिरतात.आणि तुमचे हसू कसे होईल याची योजना आखतात.पण तुमचा प्रवास प्रामाणिक असेल तर तुम्हाला वाटेत नवीन साथीदार भेटतात ते तुम्हाला हवी ती मदत करतात. तुमच्या अगोदरच्या सोबत्यांपेक्षा जास्त जीव लावतात.हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते.फक्त जिद्दीने जगता आले पाहिजे.कारण जो चोच देतो तो दाणे पण देतो.
कुठलेही कार्य हातात घेण्या अगोदर तुम्ही ते पूर्ण करू शकत असाल तरच हातात घ्या.दुसऱ्याच्या भरवश्यावर कधीही घेऊ नका.
समजा एखाद्या ठिकाणी काही वाद होत असेल ,आणि तुमच्या सोबत चार साथी असतील.तर त्यांच्या भरवश्यावर समोरच्याशी वाद कधीच करू नका, कारण त्याची ताकद तुम्हाला माहित नसते.त्याने तुमच्या एक ठेऊन दिली की तुमच्या मागे असणारे चार कधी गायब होतील कळणार नाही.कारण इथे कोणाला कोणाची पडलेली नसते.जो तो स्वतःसाठी जगत असतो.त्या माकडीनीची गोष्ट माहित आहे ना?
बिरबलाने एक प्रयोग करून  अकबराला शिद्द करून दाखवले की कोणीही स्वतःसाठीच जगत असतो.त्याने एका हौदात माकडीन आणि तिचे अत्यंत लाडके पिल्लू जे की ती कधीच त्याला एकट्याला सोडत नाही.त्याच्यावर तिचा खूप जीव असतो.त्या दोघांना एका हौदात टाकले जाते.आणि हौदात पाणी सोडले जाते.जेव्हा हौदातले पाणी वाढायला लागते तेंव्हा माकडीन पिल्लाला उचलून कमरेवर घेते.पाणी कमरेपर्यंत येते माकडींन पिल्लाला खांद्यावर घेते ,पाणी खांद्यापर्यंत येते,माकडीन पिल्लाला डोक्यावर ठेवते,पण गळ्यापर्यंत ,पाणी नाकातोंडात जायला लागते  ती पिल्लाला आणखी वर करते, टाचा वर करते तरी ही पाणी   तोंडात जाते, ती गुदमरायला लागते , तिला श्वास घेता येत नाही. आता काहीच पर्याय राहत नाही.तिला तर जगायचे असते, ती पिल्लाला पायाखाली टाकते आणि त्याच्यावर उभे राहून स्वतःचा जीव वाचवते..असेच असते.ती आई असून आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या पिल्लाचा जीव घेण्यास कमी करत नाही.मग तुमचे सोबती तर वेगळे असतात.काही कारणाने काही हेतूने एकत्र आलेले असतात.त्यांच्या वर काय भरोसा ठेवायचा?
जे काही करायचे असेल ते स्वतःच्या हिमतीवर करा.यश तुमचेच आहे कारण ज्याने चोच दिली त्याने दाणे सुद्धा दिले आहेत ते फक्त आपल्याला शोधायचे आहेत.

कडू डोस:


कुठलेही कार्य करताना कुणाच्याही भरोश्यावर करू नका.कारण कोण कधी दगा देईल सांगतां येत नाही.

कार्य स्वतःच ओढून नेण्याची ताकद असेल तर ते कार्य हातात घ्या.अन्यथा त्या वाटेला जाऊच नका

Friday, 21 April 2017

श्रीमंत

श्रीमंत

मला नेहमी असं वाटायचं की च्यायला जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो...

नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये...

श्रीमंत या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी "श्री" नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे...

श्री या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्युत आहेत...

फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरिक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरंच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत...

गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता...

अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची "फिकीर नाही"...

अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथेलोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही...

बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला...

सगळीकडे झगमगाट होता पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता...

"मी किती महागाची स्कॉच पितो बघ" हे सांगण्यामागे ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यु होती...

ही खरेदी आणि बेफिकीरी घरातल्या इंटॆरिअरपासुन लहानशा खरेदीपर्यंत जिथेतिथे दिसते...

सुसंस्कृतपणा खुप कमी पैशेवाल्यांकडे आहे. 
मुलं काय शिकतायत? यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचंच वारेमाप कौतुक...

वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथेतिथे अभाव दिसत होता...

पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खुपच निराळी आहेत. 

कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक इंटेरिअर (अजिबात झकपक नाही), 
कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करुन त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला Antic मूर्त्या आणि चित्रं जमवायचा छंद...

कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस. 
आणि गंमत म्हणजे सर्व श्रीमंत हे अतिशय Down to earth आणि सुसंस्कृत विचारांचे आहेत...

प्रत्येकाने संपत्तीचं उत्तम,
 Long Term नियोजन केलेलं आहे. 
रितसर कागदपत्रे, 
त्यांच्या फायली तयार आहेत. सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो. 
कुठेही कसलाही Show Off नाही आणि बडेजाव तर त्याहून नाही...

स्वत: केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबात नाही.

कोट्याधीशाकडच्या पार्ट्यांसोबत गरीबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जुन जातात..
कुठेही कसलाही भेदभाव नाही, Attitude तर औषधालाही नाही...

उत्तम मोजकं आणि छान खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं, वागणं... म्हणजे वेदातल्या "श्री" या संकल्पनेला अनुरुप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो...

आणि मग माझ्या लक्षात आलं की एकतर भरपूर मेहनत करुन, कष्ट करुन, उद्योग करुन किंवा मग लांड्यालबाड्या करुन, जमिनी विकून "पैसेवाला" होता येणं कुणालाही सहज शक्य आहे पण "श्रीमंत" होणं हे एक कष्टसाध्य पण छान व सुंदर "मिशन" आहे...

पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. 

तो एक प्रवास आहे, विचारपुर्वक करण्याचा...
तो करायलाच हवा.
तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे हे लक्षात घ्या...

आपण खुप श्रीमंत  व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना...!!!⁠⁠⁠⁠

*आपसी विश्वास*

*आपसी विश्वास* 

संत कबीर रोज सत्संग किया करते थे। दूर-दूर से लोग उनकी बात सुनने आते थे। एक दिन सत्संग खत्म होने पर भी एक आदमी बैठा ही रहा। कबीर ने इसका कारण पूछा तो वह बोला, ‘मुझे आपसे कुछ पूछना है। मैं गृहस्थ हूं, घर में सभी लोगों से मेरा झगड़ा होता रहता है। मैं जानना चाहता हूं कि मेरे यहां गृह क्लेश क्यों होता है और वह कैसे दूर हो सकता है?’ 

कबीर थोड़ी देर चुप रहे, फिर उन्होंने अपनी पत्नी से कहा, ‘लालटेन जलाकर लाओ’। कबीर की पत्नी लालटेन जलाकर ले आई। वह आदमी भौंचक देखता रहा। सोचने लगा इतनी दोपहर में कबीर ने लालटेन क्यों मंगाई। थोड़ी देर बाद कबीर बोले, ‘कुछ मीठा दे जाना।’ इस बार उनकी पत्नी मीठे के बजाय नमकीन देकर चली गई। उस आदमी ने सोचा कि यह तो शायद पागलों का घर है। मीठा के बदले नमकीन, दिन में लालटेन। वह बोला, ‘कबीर जी मैं चलता हूं।’ 

कबीर ने पूछा, ‘आपको अपनी समस्या का समाधान मिला या अभी कुछ संशय बाकी है?’ वह व्यक्ति बोला, ‘मेरी समझ में कुछ नहीं आया।’ कबीर ने कहा, ‘जैसे मैंने लालटेन मंगवाई तो मेरी घरवाली कह सकती थी कि तुम क्या सठिया गए हो। इतनी दोपहर में लालटेन की क्या जरूरत। लेकिन नहीं, उसने सोचा कि जरूर किसी काम के लिए लालटेन मंगवाई होगी। मीठा मंगवाया तो नमकीन देकर चली गई। हो सकता है घर में कोई मीठी वस्तु न हो। यह सोचकर मैं चुप रहा। इसमें तकरार क्या? आपसी विश्वास बढ़ाने और तकरार में न फंसने से विषम परिस्थिति अपने आप दूर हो गई।’ उस आदमी को हैरानी हुई। वह समझ गया कि कबीर ने यह सब उसे बताने के लिए किया था। कबीर ने फिर कहा,’ गृहस्थी में आपसी विश्वास से ही तालमेल बनता है। आदमी से गलती हो तो औरत संभाल ले और औरत से कोई त्रुटि हो जाए तो पति उसे नजरअंदाज कर दे। यही गृहस्थी का मूल मंत्र है।’ 

"परिवार" से बड़ा कोई "धन" नहीं! 
"पिता" से बड़ा कोई "सलाहकार" नहीं! 
"माँ" की छाव से बड़ी कोई "दुनिया" नहीं! 
"भाई" से अच्छा कोई "भागीदार" नहीं! 
"बहन" से बड़ा कोई "शुभचिंतक" नहीं! 
"पत्नी" से बड़ा कोई "दोस्त" नहीं 
इसलिए 
"परिवार" के बिना "जीवन" नहीं!!!!! 

पालकांसाठी थोडं महत्वाचं

पालकांसाठी थोडं महत्वाचं.👨👩👧👦👨👩👧 

एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर. 
घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती. 
एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती. 
इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले. 
त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे. 
आजोबा म्हणाले "इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत." 

आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते. 

पॉवर ऑफ चॉइस

पॉवर ऑफ चॉइस 
सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत याने सांगितलेला हा किस्सा आहे. 
--------------------------------------------------- 
मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालून माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’ 

‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षितपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’ 
मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती. 

वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ’ कॉफी आहे!’ 
मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’ 
‘काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’ 

‘मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्य काही लपत नव्हते. 
माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’ 
माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’ 

मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टॅक्सी सुरु करताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’ 
वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगितले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहिती दिली. 

‘आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही’ वासु म्हणाला. 

‘मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’ 
वासुच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासूनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस’ बद्दल कळले!’ 

‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले 

‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक’ करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले’ वासु म्हणाला 

‘आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजूबाजूला निरीक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता. 

‘मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले. 
‘झाला तर!’ वासु उत्साहाने सांगू लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले. या वर्षी कदाचित माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’ 

गरुड व्हा, बगळा होऊ नका! 
वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले. 
बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हा चॉइस देवाने प्रत्येकालाच दिलेला आहे, अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत! 

आता आपण बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का? 
#PowerOfChoice 

😄 मराठी विलोमपद

😄 मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते जसे सरळ वाचताना...... 👇 

१. चिमा काय कामाची 
२. भाऊ तळ्यात ऊभा 
३. रामाला भाला मारा 
४. काका, वाचवा, काका 
५. काका, वाहवा ! काका 
६. ती होडी जाडी होती 
७. तो कवी डालडा विकतो 
८. तो कवी मोमो विकतो 
९. तो कवी सामोसा विकतो 
१०. तो कवी कोको विकतो 
११. तो कवी ईशाला शाई विकतो 
१२. तो कवी रीमाला मारी विकतो 
१३. तो कवी वामाला मावा विकतो 
१४. तो कवी व्हिटी ला टिव्ही विकतो 
१५. तो कवी विकीला किवी विकतो 
१६. तो कवी चहाच विकतो 
१७. तो कवी का विकतो? 
१८. तो कवी लिली विकतो 
१९. तो कवी ऊमाला माऊ विकतो 
२०. तो कवी ठमाला माठ विकतो 
२१. तो कवी कणिक विकतो 
२२. तो कवी बेड व डबे विकतो 
२३. तो कवी ठमीला मीठ विकतो 
२४. मराठी राम 
२५. तो कवी चक्काच विकतो 
२६. तो कवी हाच चहा विकतो 
२७. तो कवी राशीला शिरा विकतो 
२८. तो कवी टोमॅटो विकतो 
29. टेप आणा आपटे. 
30. शिवाजी लढेल जीवाशी. 
31. सर जाताना प्या ना ताजा रस. 
32. हाच तो चहा