Sunday, 3 June 2018

आर्थर अँश

आर्थर अँश हा इटली मधील अतिशय
नावाजलेला टेनिसपटू होता.
१९८३ मध्ये
त्याच्या हदयावर शस्ञक्रिया करावी लागली.
त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे
त्याला कैन्सरची लागण झाली.
त्यानंतर
त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पञे येत राहिली.
त्यातील एका पञात म्हटले होते...
इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ?
या पञाला उत्तर देताना आर्थर म्हणतो...
५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस
खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक
टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस
सर्किटमध्ये दाखल झाली,
त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम
स्पर्धेसाठी निवडली गेली.
त्यातील फक्त ५० टेनिसपटू
विम्बलडनसाठी
निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे
अंतिम फेरीत पोचले.
त्या दोन
जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी विजेतेपदाचा करंडक
उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले
नाही की, माझीच निवड
का केलीस ? मग आत्ताच
वेदना होत असताना माझीच निवड का केली,
असे मी देवाला कसे विचारु ?
सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस
बनवते...अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.

            यशस्वी लोक आपल्या
            निर्णयाने जग बदलतात
             आणि अपयशी लोक
            जगाच्या भीतीने आपले
               निर्णय बदलतात...आरपार

पोराला थोडं रडू द्या

 *पोराला थोडं रडू द्या...!!*

काल पेपर वाचतांना खूप
छोट्याशा अशा एका बातमीनं
माझं लक्ष वेधलं...

बातमी होती हिंगोली मधून...
वडीलांनी १० वीची पुस्तकं
आणण्यास उशीर केला, म्हणून
एका १० वी च्या मुलानं रागाच्या
भरांत गळफास घेऊन आत्महत्या
केली...

छोटीच बातमी पण मनांला
चटका लावणारी...

आपल्या वाचनांत रोज अशा
बातम्या येत असतात, त्या
आपण वाचतो व सोडून देतो...

पण, आपण कोणीही खोलांत
जाऊन विचार करत नाहीत,
की असं कां..?

आपण थोडसं मागं म्हणजे
१९८० च्या आसपास किंवा
त्या दरम्यान... म्हणजे आता
जे लोक वय वर्ष ४५ च्या
आसपास आहेत, ते शाळेमध्ये
जातांना खाकी चड्डी व पांढरा
शर्ट शाळेचा गणवेश असायचा,
तो आपल्याला मिळायचा नाही,
आपल्या मोठ्या भावाचा आणि
मुलींना मोठ्या बहिणीचा
वापरावा लागत होता आणि
त्यालाच नीटनिटके करून
आपल्याला ते वापरावे लागत
होते. तशीच अवस्था आपल्या
पुस्तकांची होती, पुढच्या
वर्गातील मुलांची जुनी पुस्तकं
अर्ध्या किमतीत घ्यायची
आणि ती परत कव्हर लावून
फाटलेली पुस्तकं वर्षभर
काळजीपूर्वक वापरायची
आणि परत विकायची.

आताच्या मुलांना ठिगळ हा
शब्दच आठवत नाही आणि
त्यांना ते कांय असतं, तेही
माहित नाही. ते सरळ
आपल्यालाच विचारतील,
ते कांय असतं. आपल्या वेळेस
घरची परिस्थिती खूपच
हलाखीची असल्यानं वर्गातील
अनेकांच्या चड्डीवर ठिगळं
दिसायची...

साधारण १९९५ नंतर जसं
आर्थिक स्वायत्ततेचं वारं
आणि अनेकांच्या हातात थोडा
फार पैसा यायला लागला, तसे
अनेक प्रश्न निर्माण होत गेले...

👉​​आई सुद्धा जन्मलेल्या
मुलाला रडल्याशिवाय दूध
पाजत नाही... पण आज
आपण समाजमध्ये पाहतोय,
की बऱ्याच गरज नसलेल्या
गोष्टी मुलांच्या हातात येत
आहेत. लहानपणापासूनच
आपण पालक म्हणून मुलांना
गरज नसतांना सुद्धा उलट्या
होईपर्यंत देतो...

आज लहान मुलांच्या हातात
अनेक गॅजेट्स आले आहेत,
व्हाट्सअप, फेसबुक, इंटरनेट,
केबल टीव्ही आणि इतर अनेक
त्यामुळे त्यावरील बऱ्याच
गोष्टीमुळे मुले जास्त आभासी
दुनियेत वावरतात... पालक
म्हणून आपण त्याला कशालाच
नाही म्हणत नाहीत...

👉​​आज आपल्या देशात लेकरू
पहिलीला आल्या पासून त्याला
आपण अपंग करतोय, असं माझं
वैयक्तिक मत आहे. त्याला पुस्तकं
फुकट, वह्या फुकट, पाटी फुकट,
दुपारी मस्तपैकी पोषण आहार,
दप्तर फुकट आणि शिवाय
त्याला नापास करायचं नाही...

कशाला अभ्यास करतंय ते
मग...त्याला जर सगळंच
विनाकष्टाचे मिळत असेल, तर
पुढं कांय होईल...???

एक ऐत खाऊ पिढी तयार होईल.
आज आपण विध्यार्थ्यांना उलट्या
होईपर्यंत देत आहोत, त्याला
त्याची काहीच गरज नाही..

👉​​शाळेत मिळणाऱ्या फुकट
पुस्तकाची किमतसुद्धा आज
पालकांना माहित नाही, हे खूप
मोठं दुर्दैव म्हणावं लागेल...

आज बऱ्याच शाळांमधून
प्राथमिक स्तरावरील
विध्यार्थ्यांना इंटरनेटचं शिक्षण
दिलं जातं...

वास्तविक पाहता एकदम
चुकीची पद्धत आहे ती...
आणि काय शिकवावं आणि
कुठं शिकवावं हे पैसा जास्त
झाल्यामुळे पालकांना कळत
ठिक नाही...

👉​​आज मुलांना मैदानी खेळ
नको वाटतात, त्यामुळं त्याचा
आपल्या वयोगटातील मुलामध्ये
मिसळण्याची सवयच नाही
राहिली. घरी कोणी वडीलधारी
मंडळी आली, तर कसं वागावं,
याचं सामाजिक भान पण आज
 लोप पावत चाललं आहे...

सगळंच आयतं आणि विनाकष्ट
मिळत असल्यानं आजच्या
पिढीला नाही ऐकायची, सवयच
नाही राहिली, ना परिस्थितीची
जाण ना कशाची भीती...

मुलांच्या तोंडातून एकदा शब्द
बाहेर पडेपर्यंत ती वस्तू त्याच्या
समोर हजर...

आणि ज्या वेळेस ही मूलं वयांत
येतात... त्यावेळी आपल्या
हातातून सर्व परिस्थिती बाहेर
गेलेली असते, एकादी गोष्ट नाही
मिळाली, तर ही मुलं त्यामुळे
खूप टोकाची पावलं उचलतात.
 नाही ऐकण्याची सवय
 नसल्यामुळं ती खूप आक्रमक
झालेली असतात...

👉​​लाड करावेत, पण तेही
नियंत्रणात...आज मुलाच्या
बाबतीत प्रत्येक पालक नको
तितका जागरूक झाला
आहे, पालकांच्या भल्या मोठ्या
अपेक्षा वाढलेल्या आहेत, कांय
करावं आणि कांय नाही, तेही
आज समजण्याच्या पलीकडे
गेलं आहे...

🙏​​कष्टाला दुसरा कोणताही
शॉर्टकट नाही, हे त्या मुलांना
बालपणी पासूनच मनावर
ठिक बिबविण्याची गरज आहे...
तरच ही बालकं टिकतील...
म्हणून  मुलांना थोडं रडू
द्या...थोडं रडू द्या...!!🙏🏻़
[30/05, 6:08 am] Tai: पहाटेच जाग आली कुणीतरी टकटक करीत होते.

दार उघडून बघितले बाहेर तर कुणीच उभे नव्हते..

आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीच्या गजावर दिसला एक पक्षी.



चोचीने टकटक करीत तावदानावर उमटवीत होता नक्षी.

का रे बाबा? विचारले तर म्हणाला भाड्याने मिळेल का एखादे झाड घरटे बांधण्यासाठी.

एकटा कुठेही कसाही राहिलो असतो पण जागा हवी होणाऱ्या पिल्लांसाठी.



तुमच्या भाऊबंदांनी लुटले आमचे रान केले निर्वासित.

बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी असतो आता फिरस्तित.

वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे अन पाणी.

पण निवाऱ्याचे काय? हे लक्षात घेतच नाही कुणी.

पोटाला हवेच खातो ती भिक अन नेतो थोडे घरी.

खायला तर हवच जरी डोक्यावर छप्पर नसले तरी.

कधीकधी वाटते आत्महत्या करावी बसुन विजेच्या तारेवर.

किंवा द्यावा जीव लोटून उंच उंच त्या मोबाईल टाॅवरवर.



जसे मग आत्महत्या नंतर सरकार काही देते शेतकऱ्यांला.

तसेच मिळेल एखाद झाड माझ्या पिल्लांना तरी आसऱ्याला.

ऐकून मी चक्रावले खरच एवढा विचार मी नव्हता केला.

जंगलतोडीत त्यांच्या घरांचा विचार कुठेच नाही झाला.

मी हात जोडून म्हटले त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते.

पण आत्महत्या करू नको खरच मनापासुन सांगते.

तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर बांध वनरुम किचन खोपा.

अडचण होईल पण आतातरी एवढाच उपाय आहे सोपा.

तो म्हणाला खुप उपकार होतील पण भाडे कसे देणार.

मी म्हटले रोज सकाळ संध्याकाळ मंजुळ गाणी ऐकव बाकी काही नाही मागणार.

तो म्हणाला मला तुम्ही भेटलात पण बाकी नातलगांच काय

त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी कुठे ठेवतील पाय.

अरे लावताहेत आता झाडे अन जगवतात



आता कुणी कुणी बदलतेय चित्र पण त्यांना सांग आत्महत्या करू नका कुणी

ऐकुन तो पक्षी उडाला काड्या जमवायला घरट्यासाठी.

अन मी पण घरात आले तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी.

त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड.

वाचुन तुम्ही पण लावाल ना कुंडीत वा अंगणात एकतरी झाड.... निदान एक तरी झाड...

द लास्ट बकेट

*'द बकेट लिस्ट'*
2007 चा अमेरिकन चित्रपट. कुठलीही मारधाड़ नाही, स्पेशल इफेक्ट्स नाहीत, अॅनिमेशन नाही, कसलाही मसाला नाही, कुठलाही फॉर्म्युला नाही...
मग  बघायचा तरी कशाला? बघायचा त्यातील अप्रतीम संदेशासाठी आणि जमलंच तर त्या संदेशाची जशी जमेल तशी वैयक्तिक पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी...

तर 'बकेट लिस्ट' म्हणजे नक्की काय?
इंग्लिश भाषेत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूसंदर्भात एक बोली वाक्प्रचार आहे - To kick the bucket - त्याचा मराठी समानार्थी उपयोग सांगायचा तर 'त्याने अखेरचे डोळे मिटले' किंवा 'त्याने शेवटचा श्वास घेतला' असा सांगता येईल. मग बकेट लिस्ट म्हणजे काय, तर मरणापूर्वी करायच्या काही महत्वाच्या कामांची यादी. अशी यादी माणूस सहसा करत नाही. काही मोजक्या लोकांना मृत्यूची चाहूल लागते म्हणतात, ते लोक अशी यादी करत असावेत. अन्य काही थोडके लोक मृत्युपत्र करतात. पण बकेट लिस्ट म्हणजे मृत्युपत्र नव्हे. मृत्युपत्रात मरण पावलेल्या माणसाच्या इच्छेनुसार त्याच्या स्थावर जंगम मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी याची जंत्री असते. बकेट लिस्ट मध्ये अद्याप जिवंत असलेल्या पण मृत्यूची चाहूल लागलेल्या माणसाच्या अपूर्ण इच्छांची यादी असते. मग यात काहीही असू शकतं. अगदी ५ किलो आईसक्रीम एकट्याने खावं किंवा अमिताभ बच्चन सोबत चहा घ्यावा किंवा आयफेल टॉवर चढून जावा किंवा आयुष्यभर तोंड न पाहिलेल्या भावाशी पुन्हा जुळवून घेऊन मनसोक्त गप्पा माराव्यात यापैकी किंवा आपण कल्पनाही करू शकत नाही अशा कुठल्याही गोष्टी असू शकतात.

(आपल्याकडे काही वर्षांपूर्वी गाजलेल्या जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातून, असाच काहीसा, या क्षणात जगून घ्या असा संदेश दिला आहे.)

'द बकेट लिस्ट' या चित्रपटात असेच दोन अवलिये दाखवले आहेत. दोन तोडीस तोड पट्टीच्या अभिनेत्यांनी या भूमिका समर्थपणे निभावल्या आहेत. *जॅक निकोलसन* आणि *मॉर्गन फ्रीमन* यांनी!
आयुष्यभर इमाने इतबारे कार मेकॅनीकचे काम केलेला कार्टर चेंबर्स (फ्रीमन) आणि अब्जाधीश असलेला रुग्णालय साखळीचा मालक एडवर्ड कोल (निकोलसन) या दोघांनाही फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याने पुढच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाते आणि ते दोघेही एकाच दोन खाटांच्या खोलीत एकमेकांना उपचारा दरम्यान भेटतात. दोघांनाही एकमेकांविषयी काहीही ममत्व वाटत नसते आणि आता आपण लवकरच मरणार आहोत ही जाणीव छळत असते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच दोघांनाही त्यांचे डॉक्टर स्पष्ट पणे सांगतात की ते आता ६ महिने किंवा फार तर फार १ वर्षाचे सोबती आहेत. रुग्णशय्येवर पडल्या पडल्या कार्टर एक बकेट लिस्ट लिहित असतो. डॉक्टरांनी सहा महिन्याची मुदत जाहीर केल्यानंतर आणि पहिल्या तीन इच्छा लिहिल्यानंतर कार्टरचा त्या बकेट लिस्ट मधला रस जातो आणि त्या कागदाचा बोळा करून तो फेकून देतो. (त्याची १३ इच्छांची यादी खाली दिली आहे.)

१. Witness something truly majestic
२. Help a complete stranger
३. Laugh until I cry
४. Drive a Shelby Mustang
५. Kiss the most beautiful girl in the world
६. Get a tattoo
७. Skydiving
८. Visit Stonehenge
९. Drive a motorcycle on the Great Wall of China
१०. Go on a Safari
११. Visit the Taj Mahal
१२. Sit on the Great Egyptian Pyramids
१३. Find the Joy in your life

तो बोळा नेमका कोलच्या हाती येतो. तो ती यादी वाचतो आणि त्याला ती कल्पना भयंकर आवडते. कोल कार्टर ला त्या यादीविषयी विचारतो, त्यांची एक उत्तेजित भावनापूर्ण चर्चा होते आणि दोघांचे ठरते, की आपण ही बकेट लिस्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. कार्टरची बायको या सगळ्याला खूप विरोध करते. पण कार्टर तिला म्हणतो, "मी माझं सगळं आयुष्य कारच्या उघडलेल्या बॉनेट खाली दुरुस्ती करत काढलं. कुटुंबाप्रती सर्व जबाबदाऱ्या प्रेमाने निभावल्या. आता मला माझ्यासाठी म्हणून काही क्षण जगायचे आहेत. मला अडवू नकोस."

मी विचार करत होतो, आपण स्वतःसाठी खरंच किती जगतो? कायम जबाबदाऱ्या, रोजच्या जगण्यातली आव्हानं, मुलांचं मोठं होणं, पालकांचं दुसरं बालपण/ आजारपण, गृहकर्ज चुकवणे या आणि अशा असंख्य व्यवधानात आपलं आयुष्य कसं सरलं हे लक्षातही येत नाही. आपल्या मनातल्या काही इच्छा तरी, मरणाच्या दारात असताना पूर्ण करण्याची तयारी करण्यासाठी मन खंबीर असावं लागतं महाराजा! मला तर म्हणायचं आहे की मरणाच्या दारातच कशाला असं मन खंबीर करावं? एरवी देखील करावं कधी तरी ५ वर्षातून एकदा. आणि दरच वेळी काही महागडी टूर केली पाहिजे असं नाही. काही नाही तर निदान कासच्या पठारावर उमलणारा रानफुलांचा महोत्सव तरी बघावा एकदा डोळे भरून. कुठलेही बुकिंग न करता काशी यात्रा करून यावी. शेतात जाऊन कुणाच्या तरी मस्त मातीत हात घालावेत, भाकऱ्या भाजाव्यात चुलीवर, किंवा थोडा वेळ घालवावा एखाद्या hospice home मध्ये मरणासन्न लोकांचे अखेरचे बोल ऐकण्यात. करतो का आपण असं काही? का नाही करत? हे माझे मला 'बकेट लिस्ट' मुळे पडलेले प्रश्न.

मग निघतात दोघं सफरीला. स्काय डायविंग करतात, ताज महाल, चीनची भिंत, नेपाळ मधून हिमालय, इजिप्तचे पिरॅमीड, टांझानियाचे सिंह अभयारण्य असं आणि बरंच काही. इजिप्त मध्ये त्यांची चर्चा होते 'ममी'विषयी. कार्टर कोल ला विचारतो, की तुला या ममी संस्कृती विषयी काही माहिती आहे का? कार्टर ने या वेळी विचारलेले दोन प्रश्न माझ्या मनात घट्ट रुतून बसले आहेत. अगदी माधामाशीची नांगी त्वचेत रुतून बसते ना, तसे. खाली दिलेत.

Carter Chambers to Edward, (of the two questions asked of the dead by the gods at the entrance to heaven):

1. Have you found joy in your life?
2. Has your life brought joy to others?

एक: तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद मिळाला का?
दोन: तुम्ही आयुष्यात इतरांना आनंद देऊ शकलात का?

खूप खूप महत्वाचे प्रश्न आहेत हे. वरकरणी सोप्पे वाटतात. पण अर्थगर्भ आहेत. विचार करायला लावणारे आहेत. मी परवापासून गढलो आहे त्यातच. मी ठरवलं आहे की जेव्हा केव्हा माझी 'बादली लाथाडण्याची' वेळ येईल, तेव्हा मी स्वतःला हे दोन प्रश्न विचारेन. त्यांची उत्तरे ठाम, स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण हो अशी यायची असतील तर आज, आत्ता पासून सुरुवात करायला हवी. त्यासाठी मला माझी बकेट लिस्ट अर्थात मृत्यूपूर्व डोहाळे यादी करायला हवी. आणि नुसती करून उपयोग नाही, ती अंमलात सुद्धा आणायला हवी.

चित्रपटात पुढे बरंच काही घडतं. दोघे मिळून ती लिस्ट पूर्ण करतात.कार्टर चा कर्करोग मेंदूत पसरतो आणि त्याचे निधन होते. पण मृत्युपूर्वी तो कोल च्या मनातली त्याच्या मुलीविषयी असलेली अढी दूर व्हावी या विषयीची बीजे रोवतो. नंतर कोलचे देखील निधन होते. पण मरणापूर्वी त्याचे आणि त्याच्या लेकीचे मनोमीलन होते. तो त्याच्या नातीचा पापा घेतो आणि बकेट लिस्ट मधली Kiss the most beautiful girl in the world ही गोष्ट पूर्ण करतो.

हा चित्रपट बघाच आणि तुमचीही बकेट लिस्ट बनवाच. आणि,  ती पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा.

*एका तरी माणसाला 'बकेट लिस्ट' करायला उद्युक्त करेन, ही गोष्ट मी माझ्या 'बकेट लिस्ट' मध्ये लिहिली आहे!*

 (forward)
या *वेड्या* माणसाला पाठीमागूनच नमस्कार.....
------------------------------------------------
मंदिराबाहेर नेहमीप्रमाणेच भिक्षेकरी तपासत होतो... तपासुन घेण्यासाठी, औषधांसाठी नेहमीचीच भिक्षेकर्यांची झुंबड ....सहज लक्ष गेलं एका कोपऱ्यात, तिकडे दगडावर एक बाबा बसलेले दिसले... बसणं ताठ, नाक तरतरीत आणि सरळ, घारुळे डोळे, अंगावर साधे पण स्वच्छ कपडे... बराच वेळ मी तिरक्या नजरेने पहात होतो, हे भिक्षेकरी नक्कीच नव्हेत.... ! सहज दिसलं, उजव्या घोट्यापासुन पाय नव्हता त्यांना, बाजुलाच कुबडी टेकवुन ठेवली होती....

थोड्या वेळानं सहज लक्ष गेलं, कोणीतरी काहीतरी देत होतं आणि ते घेत होते... अरे ! माझा अंदाज चुकला तर....उत्सुकता वाढली म्हणुन त्यांच्याजवळ जायला लागलो तर कुणीतरी म्हणालं, डॉक्टर, नका जावु, वेडा आहे तो !

उत्सुकता स्वस्थ बसु देइना म्हणुन गेलो, मला वाटलं ते मला पाहुन हात पुढे करतील....पण त्यांचा हात पुढं आलाच नाही तीथंही अंदाज चुकला माझा....

मीच म्हणालो, बाबा काही त्रास ? कुबडी घेत हळुच उठत ते म्हणाले, Good afternoon doctor...... I think I may have some eye problem in my right eye ....

मी उडालोच इतकं अस्खलीत इंग्लिश ऐकुन...

मी धक्क्यातुन बाहेर येत, डोळा बघितला, पिकलेला मोतीबिंदु होता, मी म्हणालो मोतीबिंदु आहे बाबा, अॉपरेशन करावं लागेल.... तसे म्हणाले, oh, cataract ? I had cataract operation in 1999 for my left eye in Ruby Hospital but....

हा प्रकार काहितरी वेगळा आहे हे आता पक्कं जाणवलं.....

म्हणालो, बाबा, तुम्ही इथं काय करताय ?

मी रोजच इथं येतो दोन तास...

हो पण का? मला तर तुम्ही चांगले शिकलेले वाटता ?

शिकलेले ? या शब्दावर जोर देत ते हसत म्हणाले, *शिकलेले ???*

म्हणालो, बाबा तुम्ही थट्टा करताय का माझी ?

Oh no doc... Why would I ?... Sorry if I hurt you !

हर्ट नाही पण मला काही कळत नाहिये, काय चाललंय बाबा ...

कळुन घेवुन काय करणार आहात डॉक्टर ?

ओके, चला आपण तिकडे बसु, नाहितर लोक तुम्हालाही वेडा म्हणतील.... असं म्हणुन ते हसायला लागले....

आम्ही दोघंही थोडं बाजुला जावुन एका टपरीत बसलो....

Well Doctor, I am Mechanical Engineer.... बाबांनी इंग्लिशमध्येच सुरुवात केली.... मी xxxxx या कंपनीत सिनीअर मशीन अॉपरेटर होतो, एका नविन अॉपरेटरला शिकवत असतांना पाय मशीन मध्ये अडकला, आणि हातात कुबडी आली. कंपनीने सर्व खर्च करुन वर आणखी थोडे पैसे देवुन घरी बसवलं.... लंगड्या बैलाला कोण ठेवेल ?

मग स्वतःचं छोटं वर्कशॉप काढलं, मस्त घर घेतलं, मुलगाही मेकॕनिकल इंजिनियर आहे, वर्कशॉप वाढवुन त्याने छोटी कंपनी टाकली.....

मी चक्रावलो, बाबा पण मग तुम्ही इथं कसे ....?

मी...? नशीबाचे भोग...

मुलाने व्यवसाय वाढवायचा म्हणुन कंपनी आणि घर दोन्ही विकलं... म्हटलं पोराची भरभराट होत्येय.. विकुदे !

विकुन सगळं घेवुन तो गेला जपानला.... आणि आम्ही इथे उरलो जपानी बाहुल्या म्हणुन... ते हसायला लागले.... हसणंही इतकं करुण असु शकतं ...हे मी अनुभवलं .... !

बाबा पण तुमच्याकडे स्किल आहे, लाथ माराल तिथं पाणी काढाल तुम्ही....

तुटलेल्या उजव्या पायाकडे पहात बाबा म्हणाले, लाथ ...? कुठे आणि कशी मारु सांगा...?

मी ओशाळलो, मलाच वाईट वाटलं...

आय मीन बाबा कुणीही नोकरी देईल तुम्हाला अजुनही , कारण या क्षेत्रातला तुमचा अनुभव खुप आहे...

Yes doctor, मी एका वर्कशॉपमध्ये आहेच कामाला.... 7000 मिळतात मला....

माझ्या डोक्यातला तिढा काही सुटत नव्हता....

अहो बाबा तरी मग तुम्ही इथं कसे ?

डॉक्टर, मुलगा गेल्यावर एका चाळीत पत्र्याचं शेड घेतलंय भाड्यानं, तिथं मी आणि माझी बायको राहतो, तीला Paralysis आहे ती जागेवरुन उठु शकत नाही.

मी 10 ते 5 ड्युटी करतो, 5-7 इथं बसतो, आणि घरी जावुन "तिघांचा" स्वयंपाक करतो....

बाबा आत्ताच म्हणालात , घरी तुम्ही आणि बायको असता मग तिघांचा स्वयंपाक ?

डॉक्टर, माझ्या लहानपणी माझी आई वारली, माझ्या जिवलग मित्राच्या आईनेच त्याच्याबरोबर मलाही सांभाळलं, दोन वर्षापूर्वी तो मित्र वारला हार्ट अॕटॕकने, 92 वर्षाच्या त्याच्या आईला मी आणलं मग माझ्याच पत्र्यात.... ती कुठं जाईल आता....?

मी सुन्न झालो.... या बाबाचे स्वतःचे सर्व हाल, बायको अपंग, स्वतःला पाय नाही, घर धड नाही, जे होतं ते मुलानं विकलं ....त्यात मित्राच्या म्हाता-या आईला सांभाळतोय.....

बाबा मुलानं तुम्हाला रस्त्यावर आणलं, तुम्हाला राग नाही येत त्याचा ?

No no डॉक्टर, अहो ते त्याच्यासाठीच कमावलं होतं, घेतलं त्याने, काय चुकलं त्यात ..?

बाबा घेण्याची पद्धत चुकली त्याची , त्यानं ओरबाडुन घेतलं सर्व....

डॉक्टर, अहो आपले पुर्वज माकड होते, शेपुट गेलं तरी ओरबाडायची सवय जाइल का माणसाची ...? असं म्हणुन हसता हसता तोंड फिरवलं .... ते हसणं होतं कि लपवलेले हुंदके ???

बाबा, कळलं मला 7000 मध्ये भागत नाही तिघांचं म्हणुन तुम्ही इथं येता, बरोबर ?

No you are wrong doctor. 7000 मध्ये मी सर्व मॕनेज करतोच सगळं, पण जी म्हातारी आई आहे मित्राची तीला डायबेटीस आणि ब्लड प्रेशर दोन्हीची औषधं चालु आहेत, ती मात्र मॕनेज होत नाहित या सात हजारात....

मी येतो दोन तास इथे, कुणी दिलेलं अन्न मी स्विकारत नाही, पैसे कुणी दिले तर मात्र घेतो.... तीची महिन्याची औषधं ओळखीच्या मेडिकल स्टोअर मधुन आधीच घेतो आणि रोज दोन तासात जे पैसे मिळतील ते पैसे मेडिकल वाल्याला रोजच्या रोज देतो.... !

या बाबाला त्याचा स्वतःचा मुलगा सोडुन गेलाय आणि हा बसलाय दुस-याची आई सांभाळत....

डोळ्यातुन पाणी येवु न देण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही डोळे शेवटी मला दगा देतातच ....

बाबा, दुसऱ्याच्या आईसाठी तुम्ही इथं पैसे मागायला येता ?

दुसऱ्याची ? अहो माझ्या लहानपणी खुप केलंय तीनं माझं.... आता माझी पाळी आहे इतकंच ....!

मी त्या दोघींना सांगितलंय 5-7 आणखी एक काम मिळालंय म्हणुन....

बाबा, आणि त्यांना जर कळलं तुम्ही इथे मागता म्हणुन तर ...?

अहो कसं कळेल ? दोघीपण खाटेवर पडुन....... इकडच्या कुशीवरुन तिकडं होता येत नाही त्यांना मी केल्याशिवाय...येतीलच कश्या त्या ? हा...हा...द्या टाळी !

हुंदका लपवण्याची आता माझी पाळी होती पण बाबांइतका मी सराइत नव्हतो या लपवालपवीत ....

ब-याच वेळानं लक्षात आलं टाळीसाठी दिलेला बाबांचा हात माझ्या हातात तसाच होता, तोच हात दोन्ही हातात घेवुन मी त्यांना विचारलं, बाबा तुमच्या आईला मी डायबेटीस आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या कायम स्वरुपी दिल्या माझ्याकडुन तर तुम्हाला इथं हे असं मागावं लागणार नाही right ?

म्हणाले, no doctor, तुम्ही भिका-यांसाठी काम करता, तीला तुम्ही गोळ्या देणार म्हणजे एका अर्थी ती भिकारीच झाली ना ? मी आहे अजुन समर्थ, तीचा मुलगा म्हणुन... मला कुणी भिकारी म्हणालं तरी चालेल पण तीला नाही....

OK Doctor, जावु मी आता ? घरी जावुन स्वयंपाक करायचा आहे अजुन ....

बाबा भिका-यांचा डॉक्टर म्हणुन नाही, तुमचा मुलगा समजुन घ्या ना आज्जीसाठी औषधं ....

हात सोडवत ते म्हणाले, डॉक्टर, आता या नात्यात मला अडकवु नका please, एक गेलाय सोडुन......

आज मला आशेला लावुन उद्या तुम्ही गेलात तर .... ? सहन करायची ताकत नाही राहिली आता.... !

असं म्हणंत ते कुबड्यांवर निघाले सुद्धा ..... जाताना हळुच डोक्यावर हात ठेवला, म्हणाले, काळजी घे बेटा स्वतःची.....

शब्दातुन त्यांनी मी लावलेलं मुलाचं नातं नाकारलं, पण डोक्यावरल्या हाताच्या गरम स्पर्शातुन जाणवलं, त्यांनी हे नातं मनोमन स्विकारलंय .....

या *वेड्या* माणसाला पाठिमागुनच नमस्कार करण्यासाठी माझे हात आपोआपच जुळले .....

हे क्षण मुद्दाम शेअर केले आहेत, जेणेकरुन आपल्याला कळावं, आपल्यापेक्षा वाइट परिस्थितीत जगणारे लोक आहेत खुप.... निदान यांच्याकडे पाहुन आपल्या दुःखाची झळ कमी होईल, आयुष्याकडे बघण्याचा आपला चष्मा तरी बदलेल.... 🙏

डॉक्टर पारसनिस, सोलापुर.

गाथा यशस्वीतांची

#सातारच्या _"#हणमंतराव_गायकवाड" या #कोट्याधीश व्यावसायिकाची
एक असामान्य यशोगाथा - #BVG_Group

माझं गाव सातारा जिल्ह्य़ातलं रहिमतपूर
शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. याच दोन महान व्यक्ती माझ्या प्रमुख प्रेरणास्रोत बनल्या.
----------------------------------------
संसदेच्या हाऊसकीपिंगचं काम मिळालं आणि त्यानंतर ‘बीव्हीजी’चं नाव पसरतच गेलं.
पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं मिळाली. पुढं पंतप्रधानांचं निवास.
तिथं बागेतला धूळ बसून काळा झालेला रस्ता पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केली.
मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.
आज ‘बीव्हीजी’च्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार.
अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत!
विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर,
ओएनजीसी, आयटीसी. कितीतरी. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था आहेत.
कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच.’’

“ माझ्या सभोवताली पैशावर
निजलेले उडय़ा मारणारे
गगनचुंबीत राहणारे
कोटय़धीश-अब्जाधीश
मीही माझ्या ध्रुवावर
सर्वापेक्षा उंचावर
जाण्यासाठी तप करणारा
जेथून कोणीच मला
पैशात तोलू शकणार नाही
भले मी निष्कांचन राहीन
पण ध्रुवावर जरूर जाईन !’’

हो. मी ध्रुवावर जायचं पक्कं केलं होतं. कसं? कधी? माहीत नव्हतं. खिशात पैसा नव्हता, मार्गही माहीत नव्हता, पण जायचं होतं, हे निश्चित! त्यावेळची ही माझी कविता.

मी पुण्यात बिबवेवाडीतल्या व्हीआयटी कॉलेजात होतो. इंजिनीअरींगचे शिक्षण घेत होतो. वसतिगृहात राहायचो. त्याआधी फुगेवाडी ते बिबवेवाडी हे रोजचं अंतर सायकलवरून कापायचो. वेळ खूप जात होता. म्हणून वसतिगृहात राहायचं ठरवलं. पण महिन्याचं ३०० रुपयांचं भाडं देण्याची ऐपत नव्हती. प्राचार्य खाडिलकर सरांना भेटलो. त्यांनी २५ रुपयांमध्ये राहायची परवानगी दिली. माझी इलेक्ट्रिकची शेगडी होती. तिच्यावर भात शिजवायचो. खालून करपायचा, वरून कच्चा. मधला काढून खायचो. इतर पोरं टिंगल करायची. ती कॅन्टीन, स्वीट मार्टमधून खायला आणायची. पाटर्य़ा करायची. मला रोजच्या भाकरीची भ्रांत होती.

दहापैकी दोन पोरं मदत करायची. शनिवार-रविवारी पार्टीला जायची, मग त्यांच्या जागी मला मेसला जेवायची संधी मिळायची. बाकी पोरं मजा पाहायची.. तेव्हा धडा शिकलो- तुमच्याकडं पैसा असेल तर हजारो लोक जवळ येतात, नसेल तर मजा पाहतात. लहानपणी प्रेरणा मिळावं असं वातावरण आजूबाजूला नव्हतं. पण नेहमीच मोठी स्वप्नं पाहायचो. हे कुठून आलं असेल? आता आठवतं, लहानपणी वडील, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं ऐकायला न्यायचे. व्याख्यानांचे विषय असायचे- शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद. याच दोन महान व्यक्ती माझ्या प्रमुख प्रेरणास्रोत बनल्या.

माझं गाव सातारा जिल्ह्य़ातलं रहिमतपूर. वडील सातारच्या न्यायालयात क्लार्क. तोकडा पगार. ते सतत आजारी असायचे. आई-वडील, मी, धाकटा भाऊ भाडय़ाच्या खोलीत राहायचो. घरात लाइट नव्हती. चौथीत स्कॉलरशिप मिळाली. वर्गातल्या हुशार-श्रीमंत मुलांना मिळाली नव्हती, मला मिळाली. आत्मविश्वास वाढला. वडिलांनी शिक्षणासाठी पुण्यात आणलं. मुक्काम पोस्ट- फुगेवाडी. रामचंद्र फुगे चाळ. १० बाय १० ची खोली. वडिलांना जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली. आजारपण सुरूच होतं. ते आजारी पडले की तीन-चार महिने बरे व्हायचे नाहीत. ससून, रुबी, बुधराणी, केईएम, िपपरीचं चव्हाण रुग्णालय फिरायचो. दरम्यान, आईला शिक्षिकेची नोकरी मिळाली. तरीपण पैशाची चणचण असायचीच. पैशाची गरज पडली की आई कानातला दागिना, मंगळसूत्र सोनाराकडं तारण ठेवून व्याजानं ५००-१००० रुपये घ्यायची.

माझं नूमवि, मॉडर्न हायस्कूलला शिक्षण झालं. मी वर्गात हुशार. गणितात तर पैकीच्या पैकी मार्क पडायचे. मॉडर्नमध्ये गणिताच्या रासकर सरांचा मी आवडता विद्यार्थी. ते कधीच पैकीच्या पैकी मार्क द्यायचे नाहीत, पण माझा एक मार्क कुठं कापायचा, हा त्यांना प्रश्न पडायचा. या गणितानंच मला उभं केलं. कारण आयुष्यात गणितच तुमच्या कामी येतं.

दहावीत चांगले मार्क मिळाले. आईच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी सुचवलं- डिप्लोमाला घाला. मग गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमध्ये गेलो. सायकलने जायचो. याच काळात वडील गेले. त्यांचं वय होतं- ४५ वष्रे नि माझं १८.

वडिलांना कपडय़ांची हौस होती. त्यांना थ्री-पीस सूट आवडायचा. त्यांनी जाण्यापूर्वी महिनाभर आधी सूट शिवायला टाकला होता. ते गेल्यावर मी तो घेऊन आलो. त्या प्रसंगानं सांगितलं- ‘माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही.’ काहीशी विरक्ती आली. त्याच वेळी ठरवलं, काहीतरी वेगळं, इतरांसाठी करायचं. ‘भारत विकास प्रतिष्ठान’ (बीव्हीजी) या नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून दानशूरांकडून देणग्या घेऊन गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणं सुरू केलं. शिक्षण सुरू असतानाच क्लास घेणं, सॉस-जॅमच्या बाटल्या विकणं, घरं रंगवून देणं अशी कामं घेणं सुरू केलं.

इंजिनीअर बनायचं होतं. त्यासाठी औरंगाबादला प्रवेश मिळत होता, पण आईच्या आग्रहाखातर पुण्यातच राहिलो. व्हीआयटीला प्रवेश मिळाला, पण फीसाठी आईने मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेतून १५ हजारांचं कर्ज काढलं. माझा रोजचा सायकल प्रवास सुरू झाला. दरम्यानच्या काळात वडिलांच्या सेवेतील काही रक्कम मिळाली. इतर काही पैसे जुळवून गुरव-िपपळे येथे प्लॉट घेतला. त्यावर घर बांधलं. पैशाची गरज होती. कॉलेजला प्रॅक्टिकलपुरतं जायचो. बाकी कामाच्या मागे लागलो.

तेव्हा बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियमचं काम सुरू होतं. एका एजन्सीकडं सिव्हिलची कामं होती. त्यांच्याकडं गेलो. माझं शिक्षण सुरू होतं इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगचं आणि हे काम होतं सिव्हिलचं- काँक्रीटचा रस्ता करण्याचं. तीन लाख रुपयांचं कंत्राट होतं. मलाही घर बांधण्याचा अनुभव होता. एजन्सीला सांगताना ‘नरोवा-कुंजरोवा’ केलं. ‘डिप्लोमा केलाय, इंजिनीअरींग करतोय’ असं सांगितलं. पण कुठल्या विषयाचा हे बोललोच नाही. काम मिळालं, ते सात दिवसांत पूर्ण करायचं होतं. खर्च जाऊन दीडेक लाख रुपये सुटणार होते. मजुरांची जुळवाजुळव केली. आपल्याला पैसे मिळणार म्हणून मजुरांनाही जास्त मजुरी दिली. महिला-पुरुष अशा एका जोडीला दीडशे रुपये मिळायचे. मी अडीचशे रुपये दिले. शिवाय सकाळी चहा-वडापाव आणि रात्री त्यांना लागणारं त्यांचं आवडतं पेय. मजूर मंडळी खूश होती. शंभर जोडय़ा, पन्नास गाढवं मिळून पाच दिवसांतच काम उरकलं.

त्याचदरम्यान लातूरचा भूकंप झाला, पैसे अडकले. मध्ये पाऊस झाला. त्यात आमचा रस्ता वाहून गेला. चूक समजली. लेव्हल केली नव्हती. डोक्याला हात लावला. रस्ता पुन्हा केल्याशिवाय पैसे मिळणार नव्हते. रस्ता करण्यासाठी हाती पैसे नव्हते. मजुरांना हे समजलं. ते मदतीला धावून आले. त्यांनी पैसे न घेता काम केलं. सिमेंट, वाळूसुद्धा त्यांनीच मिळवली. रस्ता उत्तम झाला. पैसे मिळाले. सर्वाचे पैसे भागवून वर फायदाही झाला. आयुष्यात असे प्रसंग येत गेले, तेव्हा निराश न होता स्वत:च स्वत:ला प्रेरणा देत राहतो. विवेकानंदांचे ते शब्द उपयोगी पडले. आजही पडतात..

‘जेव्हा दशदिशा अंधकाराने भरून गेल्या होत्या,
तेव्हा मी म्हणत होतो- झुंजा, झुंजत पुढे चला..
आज आशेच्या प्रकाशानं दशदिशा किंचित उजळल्या असतील, तरीदेखील तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला!’

पुढं इंजिनीअरींगसाठी वसतिगृहात गेलो. एक सत्य समजलं, ‘जग नेहमीच प्रचंड अपमान करतं. ते मनाला लावून घ्यायचं नाही. तुम्ही हिरे असाल, तरी ते तुम्हालाच सिद्ध करावं लागतं..’ १९९४ साली बी.टेक.ची पदवी मिळाली. ‘टेल्को’मध्ये (आताची ‘टाटा मोटर्स’) ट्रेनी म्हणून नोकरी मिळाली. पगार- महिना सात हजार रुपये. टेल्को म्हणजे प्रतिष्ठेची नोकरी. तिथं नोकरी करत असतानाही घरं रंगवून देण्याची वगरे कामं सुरूच होती. कंपनीत भंगारमध्ये तांब्याच्या वापरलेल्या तारा होत्या. त्यांचा कंपनीसाठी उपयोग केला आणि कंपनीचे अडीच कोटी रुपये वाचवले. त्यामुळे माझ्यावरचा विश्वासही वाढला.

दरम्यान, माझ्या गावाकडून कामाच्या आशेनं मुलं माझ्याकडे येत होती. मी कर्मचारी असल्याने कंपनीतल्या कामाची कंत्राटं घेऊ शकत नव्हतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच उपाय सुचवला- एखाद्या संस्थेतर्फे कामं घ्या. मग ‘भारत विकास प्रतिष्ठान’द्वारे हाऊसकिपींगचं काम घेतलं. ही गोष्ट १९९७ मधली. इंडिया गाडीचा प्रकल्प उभा राहत होता. तो स्वच्छ ठेवण्याचं काम घेतलं. आठ लोक होते. त्यानंतर मात्र मागं वळून पाहिलंच नाही. वाट्टेल ते काम द्या, नाही म्हणायचं नाही. हे आमचं तत्त्व. तेच कामी आलं.

गावचा मित्र उमेश माने हा माझ्यावर विश्वास टाकणारा पहिला माणूस. त्यांनी प्रतिष्ठानच्या कामासाठी नोकरी सोडली. कंत्राटं मिळवणं, पैशाची जुळणी करणं हे माझं काम आणि काम करून घेणं ही उमेश माने यांची जबाबदारी. पहिल्या वर्षीची उलाढाल होती आठ लाख रुपये. पुढच्या वर्षी ती झाली ५६ लाख रुपये. गुणवत्ता, प्रामाणिकपणा, विश्वास आणि वेळेच्या आधी पूर्ण होणारं काम यामुळे आम्हाला काम देणारे लोकच आमची प्रसिद्धी करत होते. आपोआप कामं मिळत होती. १९९९ मध्ये लग्न झालं. पत्नी वैशालीने घरची जबाबदारी उचलली. मग नोकरी सोडून हे काम पूर्णवेळ करायला लागलो. पुढे जनरल इलेक्ट्रिकल्सच्या (जीई) प्लँटचं स्वच्छतेचं काम मिळालं. बंगळुरूला जावं लागणार होतं. विलंब न करता मी, उमेश आणि आठ कामगार तिथं धडकलो. आमचे प्रेरणास्रोत शिवाजी महाराज. त्यांनी दक्षिणेवर स्वारी केली होती. आम्हीसुद्धा त्यांच्याच मातीतले ना! कंपनीचं दोन दिवसांनी ओपनिंग होणार होतं. त्याआधी प्लँट चकाचक केला. कामाची गुणवत्ता पाहून लोक समाधानी होते. मग चेन्नई, हैदराबाद अशी इतर शहरांमधली कामं मिळाली. कामाला नाही म्हणत नव्हतोच. रेल्वे स्थानकं, विमानतळ, रुग्णालये यांच्या स्वच्छतेचं काम घेतलं.. विस्तार वाढत असताना कर्मचाऱ्यांबाबत एक सूत्र कायम ठेवलं. कामावर देखरेख करणारा सुपरवायझर गावातला, विश्वासाचा माणूस, ३० टक्के कर्मचारी पुण्याहून-गावाहून पाठवलेले आणि ७० टक्के स्थानिक कर्मचारी. त्यामुळे कुठंही कामात अडथळा आला नाही.. अजून सारं सुरळीत सुरू आहे.

आणि म्हणूनच असेल कदाचित, मी पाहिलेली स्वप्नं पूर्ण झालीच. कधी तीन दिवसांतच, तर कधी १०-१५ वर्षांनी. १९९७ मध्ये पहिलं कंत्राट मिळालं तेव्हाच स्वप्न पाहिलं- आपल्याला संसदेच्या हाऊसकिपींगचं काम मिळालं तर.? तेव्हा माहीतही नव्हतं, तिथं काय पद्धत असते. पण २००३ साली हे स्वप्न पूर्ण झालं. ‘बीव्हीजी’चं नाव वाढत होतं. ते आता दिल्लीपर्यंत पोहोचलं होतं. संसदेच्या ग्रंथालयाचं कंत्राट मिळालं. देखभालीचं काम. तिथं श्रीनिवासन नावाचा शिस्तबद्ध आणि प्रामाणिक मुख्य अभियंता होता. त्याला भेटून विश्वास दिल्यावर काम मिळालं, पण ते सहा महिन्यांपुरतंच. चांगलं केलं तर पुढं सुरू ठेवणार, नाहीतर हाकलून देणार. त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यासाठी ४० लाख रुपयांची दर्जेदार यंत्रणा विकत घ्यायला लागणार होती. काम सुरू राहिलं नाही तर ही यंत्रणा पांढरा हत्ती ठरणार होती. पण स्वत:वर विश्वास होताच. काम सुरू केलं. ते सुरूच राहिलं. श्रीनिवासन खूश झाले. त्यांनी पुढच्याच वर्षी लोकसभा, राज्यसभेच्या स्वच्छतेची कामं दिली. पण सुरक्षेच्या कारणास्तव आत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे ‘बीव्हीजी’चे कर्मचारी बाहेरचीच स्वच्छता पाहत होते. बाहेरचा परिसर इतका स्वच्छ पाहून खासदारांनीच याबाबत विचारणा केली. मग थेट लोकसभेच्या सभापतींनी परवानगी दिली, तेव्हा ‘बीव्हीजी’चा लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश झाला. पुढं पंतप्रधानांचं निवास. तिथं बागेत चालण्यासाठी लाल दगडांचा मार्ग होता. तो धूळ बसून काळा झाला होता. तो पहिल्यासारखा स्वच्छ लालभडक केला आणि त्याने किमया केल्यासारखं अनेकांचा विश्वास बसत गेला. मग पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय.. दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या वास्तूला ‘बीव्हीजी’ची सेवा मिळू लागली. आज एकटय़ा दिल्लीत ‘बीव्हीजी’चे नऊ हजार लोक काम करतात. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आहे ६० हजार. अगदी तिसरी उत्तीर्णपासून ते उच्चशिक्षित अधिकाऱ्यांपर्यंत! विस्तार वेगाने वाढतोय. भारतीय रेल्वे, टाटा समूह, फोक्सवॅगन, हिंदुस्थान लिव्हर, ओएनजीसी, आयटीसी.. कितीतरी ग्राहक आहेत. देशभर २० राज्यांमध्ये चारशेपेक्षा जास्त कंपन्या, संस्था, आस्थापना ग्राहक आहेत. कोणतंही मोठं नाव घ्या. आम्ही तिथं आहोतच. आता विविध क्षेत्रांमध्ये उतरलोय.
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस रुग्णवाहिकेचे (डायल १०८) कंत्राट ‘बीव्हीजी’कडं आहे. त्यासाठी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका राज्यभर धावत आहेत. याशिवाय लँडस्केप-गार्डनिंग, टेक्निकल सर्व्हिसेस, सुरक्षा सेवा, औद्योगिक सेवा, सोलार पार्क, एलईडी लायटिंग, सोलार पंप, प्लास्टिकपासून इंधन, फूड पार्क अशा अनेक क्षेत्रांत जम बसवतो आहे. ‘नॅशनल इन्नोव्हेशन फाउंडेशन’शी भागीदारी केली आहे. त्याद्वारे विविध व्याधींवरील चहा, आरोग्यदायी उत्पादने, शेळीचे दूध, उंटणीचे दूध, जैविक खते, जैविक कीटकनाशके अशा अनेक उत्पादनांमध्ये प्रवेश केला आहे.

मी इतके सारे उद्योग कसे करू शकतो? कारण माझ्या वाटचालीत विविध टप्प्यांवर भेटलेले असंख्य लोक आज माझ्यासोबत ‘बीव्हीजी’मध्ये आहेत. मी कार्यक्षम माणसं शोधतो आणि त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकतो. बस्स.. हा संच वाढतो आहे, उत्तरोत्तर अधिकच वाढत जाईल. ‘बीव्हीजी’चं ब्रीदवाक्यच आहे- ‘ह्य़ुमॅनिटी अहेड!’

२०२० पर्यंतचे उद्दिष्ट आहे दोन लाख कर्मचारी आणि कंपनीची १० हजार कोटींची उलाढाल! हे सर्व करताना माझ्या कर्मचाऱ्यांचा, सामान्य माणसांचा विचार असतो. कर्मचाऱ्याला इतर कंपन्यांपेक्षा दोन पैसे जास्तच मिळतात. त्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून इतर क्षेत्रांत प्रवेश करतोय. शासनाच्या विविध योजनांतून माझ्या ६०० कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात घरे देऊ शकलो. जे.आर.डी.टाटा हे उद्योगातील आदर्श आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकलो- सामाजिक बांधीलकी, कामाची पद्धत, एकजीनसीपणा. त्यामुळेच ‘बीव्हीजी’च्या मुख्यालयाला (चिंचवड, पुणे) नाव दिलंय- ‘बीव्हीजी हाऊस’! टाटांच्या ‘बॉम्बे हाऊस’चा हा प्रभाव!

लोकांचा विचार करत गेलो की आपोआप पैसा मिळतो. मी हेच करत आलो. त्यामुळे मीसुद्धा मोठा झालो. कधी गैर काम करत नाही, कोणाचं वाईट चिंतत नाही, कोणाला फॉलो करत नाही, कोणाशी स्पर्धा करत नाही, संधी मिळाली तरी अनैसर्गीक नफ्याच्या मागे लागत नाही. त्यामुळे कधीही डोळे मिटले तरी शांत झोप लागते.

सर्व थरांत लहानमोठय़ा लोकांमध्ये वावरतो. राजकीय व्यक्ती, आध्यात्मिक गुरू, प्रशासकीय अधिकारी सर्वाशी मैत्री आहे. त्यामुळे अनेकांचे गरसमज होतात, पण कोण काय म्हणतं याकडं लक्ष न देता पुढं जात राहतो. त्याच वेळी कामगाराशी खांद्यावर हात टाकून बोलतो. त्यात काही वेगळं- विशेष वाटत नाही. आता इतकी पत कमावली आहे की, शेकडो कोटींचं कर्ज द्यायला बँका तयार आहेत. पण पूर्वी आईसाठी फ्रीज, वाॅशिंग मशीन घ्यायला कोणी कर्ज देत नव्हतं, ही परिस्थितीही विसरलेलो नाही. म्हणून जमिनीवरूनच चालतो.

खरंतर आता थांबलो तरी वैयक्तिक काही बिघडणार नाही. पण लोकांना जोडणं हे माझं व्यसन आहे. शिवाय आजच्या जगातही सरळ मार्गाने मोठं होता येतं, इतरांनाही मोठं करता येतं, हे दाखवून द्यायचंय. त्यासाठी मला कार्यरत राहावंच लागेल. कारण माझा आजही तोच मंत्र आहे- झुंजा, झुंजत पुढे चला