Sunday, 23 April 2017

पॉज़िटिव विचार आणि निगेटिव विचार यांचा फरक

पॉज़िटिव विचार आणि निगेटिव विचार यांचा फरक --------------------


एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते. 

अचानक काही आठवलं म्हणुन त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली ....

     * * या वर्षात माझ्या शरीरातलं  पित्ताशय काढुन टाकलं 

आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळुन रहावं लागलं . 

     ** याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पुर्ण केली 

आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची 30 वर्ष नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली 

** याच वर्षात माझ्या वडिलांच्या दु:खद निधनाचं  दु:ख मला पचवावं लागलं  


** याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकिय शिक्षणाच्या परिक्षेला मुकला.... 

त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे ! 
जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले
 शिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजुन वेगळेच ..!

                  आणि शेवटी त्यांनी  लिहिले ..…. 

"खरच, किती वाईट आणि दु:खदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी !!!

    इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली. 

भरलेले डोळे आणि विचारात गढुन गेलेल्या आपल्या पतिकडे पहाताच त्याना काहितरी वेगळ असल्याचा अंदाज आला.
 सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला
 आणि काही न बोलता त्या खोलीतुन निघुन गेल्या. 

                  थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता. 

तो कागद त्यानी त्यांच्या पतिच्या कागदा शेजारी ठेवला. 
लेखक महाशयानी तो कागद उचलुन वाचायला सुरुवात केली. 
त्यात लिहिले होते ..

         ** गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशय अखेर या वर्षात मी काढुन टाकले. 

आता मला कुठलाही त्रास नाही. 
मी अत्यंत सुखी झालोय यामुळे ..!

       ** याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पाडली.

 आणि एक चांगल्या नोकरीतुन सन्मानाने सेवानिवृत्त झालो, 
आता अजुन चांगलं आणि लक्षपुर्वक लिहायला माझ्याकडे भरपुर वेळ आहे...!!

      ** याच वर्षात माझे तिर्थरुप वडिल वयाच्या 95 व्या वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबुन न रहाता इहलोकीची यात्रा संपवुन शांतपणे मार्गस्थ झाले ..!!


     ** याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं, 

जीवघेण्या कारच्या अपघातातुन जरी कार पुर्णपणे मोडित निघाली तरी तो बचावला 
आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला जोमाने लागला ....!!!

  आभारी आहे देवा ...!!

 किती सुंदर आणि चांगल वर्ष दिलस तु मला ..!!"

         बघा मित्रानो ... तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी ..!! 

नकारात्मक विचार बाजुला सारुन एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी !! 

  आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात.

 आपण ज्या दृष्टीने त्याकडे पहातो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो. 
प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.
 आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायच…..!!!

     त्या घटनेची वाईट बाजु न पहाता चांगली बाजु, सकारात्मक बाजु डोळ्यासमोर ठेवायला शिका. 

जे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगुन पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपुर्वक विचार करा ...!! 
जगणं अजुन सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!

   Every Dark cloud has a silver lining …!!!

 प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हे ही लक्षात ठेवा ..!! 

     शेवटी चिडचिड करुन जगायच की आनंद घेत हे आपल्या विचारांवरच ठरणार आहे. 


आपल्याकड काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेवुन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा ..!!


 दु:खात सुख शोधा, सुखात दु:ख नको !!


  शेवटी पाडगावकरांच्या  ओळी आठवतात….!!


पेला अर्धा सरला आहे

असं सुद्धा म्हणता येत;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येत!

सरला आहे म्हणायचं

कि भरला आहे म्हणायचं?

सांगा कसं जगायचं?

कण्हत कण्हत 
कि गाणं म्हणत

तुम्हीच ठरवा....!!



मित्रानो सकारात्मक व्हा ....आनंद लुटा ..!!

घर निंदकाचं

कडू डोस 15

घर निंदकाचं

म्हण आहे,'निंदकाचे घर असावे शेजारी'
अगदी बरोबर आहे.निंदक म्हणजे निंदा करणारा.सोप्या भाषेत टीका करणारा.
निंदकाला काय काम असते? चांगले चालले असेल तरी काहीतरी निंदा करून लोकांच्या मनात भूत घालून द्यायचे. लोकांचेही काही खरे नसते,ग्लोबल नीती प्रमाणे एक गोष्ट सारखी सारखी सांगितली की ती लोकांना खरी वाटायला लागते.दुसऱ्या महायुद्धात हिटलरचा जवळचा अधिकारी ग्लोबल याने ही ट्रिक वापरली. आपण सतत आघाडीवर आहोत असे ग्लोबल आकाशवाणी वरून लोकांना सांगत होता.लोक खोट्या विजयाला भुलून  हिटलरचा उदो उदो करत होते.हिटलर इतका काळ युद्धात टिकून राहिला त्याचे श्रेय ग्लोबललाच दिले जाते.

निंदक  तेच तर करत असतो.एकच गोष्ट फिरवून फिरवून लोकांना सांगत असतो आणि लोकांच्या भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असतो.
गोष्ट असते लहानशी. पण  तो आपल्या पद्धतीने तिला मालमसाला लावून सांगत असतो.त्यामुळे लोकांचे मनोरंजन होते आणि समोरच्या व्यक्ती बद्दल मत वाईट होते. खरे म्हणजे एखादी व्यक्ती जर एखाद्या व्यक्ती बद्दल काही माहिती सांगत असेल तर लगेच तिच्यावर विश्वास ठेवण्या अगोदर त्याची खातरजमा करायला काय हरकत आहे?पण लोकही फार उतावीळ असतात.घटनेची खातरजमा ना करता ती गोष्ट पसरवायला सुरुवात करतात.आणि निंदकाचे फावते.
ज्याची निंदा केली जाते त्यांच्यापर्यंत बातमी खूप उशीरा पोचते.किंवा जरी पोचली असेल तरी तो सौजन्य दाखवून त्यास काहीच माहित नाही असे दाखवतो आणि  भांडणाचा प्रसंग टाळतो.
एक इंग्रजी सुभाषित आहे,'देवाने नेत्याला संपवण्यासाठी अनुयायी निर्माण केले.
अनुयायी नेत्यांची तळी उचलत असतो.नेत्याने काहीही केले तरी 'खूप छान साहेब.' असेच म्हणत असतो तो. त्यामुळे नेता आणखी फुगतो आणि त्याच्या कडून परत परत त्याच चुका होत जातात.आणि त्याची अधोगती होत जाते.
पण तोच कार्यकर्ता असेल तर त्याच्या नेत्याने काही चुकीचे केले असेल तर लगेच सांगतो,'साहेब तुम्ही इथे असे बोलायला नको होते.ते तुमच्या फायद्याचे नाही.तुम्हाला त्रास होऊ शकतो.लोक तुटू शकतात. विरोधकांना फायदा होऊ शकतो.
पण दुर्दैवाने खरे कार्यकर्ते कमी असतात.आणि बोगस अनुयायी जास्त  असतात.ते नेत्याला बुडवत असतात. आज महाराष्ट्रात असे अनेक प्रकार नेत्यांबाबत बघायला मिळतील. नेते त्याच त्याच चुका करताना दिसतील.

'निंदकाचे घर असावे शेजारी'असे म्हटले जाते त्याचे कारण असे की,निंदक तुमच्या प्रतेक गोष्टीवर लक्ष ठेऊन असतो.तुम्ही काय करता?कुणाशी बोलता?काय खाता?तुमचे काय कार्यक्रम ठरलेले आहेत?हे जितके तुमच्या जवळच्या किंवा घरातल्या लोकांना माहित नसते तितके निंदकाला माहित असते.कारण त्याला काही काम धंदा नसतो.त्याचा एकच उद्योग असतो.तुम्हाला अडचणीत पकडायचे आणि त्याचा डांगोरा पिटायचा.तुमच्या बद्दल वाईट सांगून जनमत खराब करायचे.आणि वातावरण बिघडवायचे.एक पाहिले का?निंदकाला तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी कधीच दिसत नाहीत. एकदा एका शिक्षकाने एक मोठा पांढरा कपडा विध्यार्थ्यांपुढे ठेवला त्यावर एक छोटासा काळा डाग होता. विदयार्थ्यांना  त्याचे वर्णन करायला सांगितले.प्रत्येकाने कापडा किती मोठा आहे.किती शुभ्र आहे.कुठे खराब झाला आहे.तो कसा असायला हवा होता हे सगळे सांगितले आणि सगळ्यांनी एक काळ्या डागाचे त्यांच्या भाषेत वर्णन केले.काळ्या डागाचे सर्वानीच वर्णन केले.
शिक्षकाने सांगितले,'सर्वानी काळ्या डागाचे वर्णन केले.पण सगळ्याना इतका मोठा पांढरा कपडा दिसला नाही.त्यातील एक छोटा डाग लगेच दिसला.आणि विशेष म्हणजे सगळ्यांचे लक्ष फिरून फिरून त्या काळ्या डागाकडेच जात होते.तसेच असते.निंदकाचे केलेली निंदाच आपल्याला दिसत असते.ज्याची निंदा केली त्याचे काम दिसत नाही. त्याने इथपर्यंत येण्यासाठी खाल्लेल्या खस्ता दिसत नाहीत. त्याचा इतका मोठा त्याग दिसत नाही.त्यांना दिसते फक्त निंदकाने केलेली निंदा.
सच्ची माणसे कधीच निंदेला घाबरत नाहीत उलट निंदकाला जवळ घेऊन शाबासकी देतात कारण त्याच्या मुळेच त्याच्या कडून घडणाऱ्या खूप चुका वाचलेल्या असतात. निंदकाने अगोदरच त्याला सावध करून टाकलेले असते.
तसे पाहिले तर ,दुसऱ्याच्या अंगावर शेण फेकून त्याचा आनंद घेणाऱ्या निंदकाचेही हात भरतातच ना?
निंदक चांगल्या गोष्टी पण वाईट ठरवण्यात खूप माहीर असतात.कारण त्यांचा धंदाच तो असतो.त्यामुळे हुशार माणसे त्याकडे लक्ष देत नाहीत. आणि आपली गाडी रुळावरुन घसरू देत नाहीत.

निंदक पराचा कावळा करण्यात पटाईत असतात.ते पराचा कावळा करतात पण लोक खरोखरचा कावळा समजतात.
आम्ही बारावीला असताना इंग्लिश मध्ये एक कविता होती तिचा सार असा, एक टीकाकार म्हणजे निंदक ,सलून मध्ये जातो.सलून मध्ये काही लोक बसलेले असतात.त्यालाही दाढी करायची असते तो तिथे बसतो आणि अचानक त्याचे लक्ष समोर असलेल्या घुबडावर जाते.घुबड न्हाव्याच्या डोक्यावर एका फळीवर असते.टीकाकार आपली हुशारी दाखवण्यासाठी मोठयाने बोलायला लागतो,' हे जे घुबड आहे ना? ज्याने कोणी त्याची मूर्ती बनवली आहे ती खुप सुंदर आहे. पण त्यात काही चुका आहेत.सगळे लोक त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतात. त्याला आणखी हुरूप येतो.तो म्हणतो,घुबडाची चोच खूपच अनुकूचीदार झाली आहे, ती इतकी अनुकूचीदार नसते.'तो आपली हुशारी दाखवण्यासाठी आणखी सांगतो,'खरे म्हणजे घुबडाचे पंख इतके मोठे नसतात.ते थोडे आखूड झाले असतात.तसे घुबड झाले आहे छान. त्या कलाकाराला दाद दिली पाहिजे.पण घुबड इतके जाड नसते.त्याची जाडी थोडी कमी पाहिजे होते.त्याचे पाय खूपच लहान झाले आहेत थोडे।मोठे पाहिजे होते.आणि नखे खूपच बोथट झाली आहेत ती टोकदार पाहिजे होती.बाकी घुबड झाले आहे छान.पण त्याची मान खूपच लांब झाली आहेघुबडाची मान इतकी लांब नसते.पण झाले आहे छान.आणि डोळे किती मोठे काढले आहेत ,त्याची बुबुळे इतकी मोठी थोडीच असतात."असे म्हणत असतानाच घुबडाने थोडीशी मान हलवली.बुबुळे कोठी केली.आणि तोंडातून एक आवाज काढला.
टिकाकाराचे तोंड बघण्यासारखे झाले.आणि सलून मधील सगळे हसू लागले.
अशा पद्धतीची फजिती निंदकाची होते.एखाद्याला एखादी गोष्ट सांगायला जातो आणि ज्याला सांगायला जातो तोच प्रत्यक्ष साक्षीदार असतो.त्यामुळे निंदकाचे तोंड बघण्यासारखे होते.
निंदक शेजारी असल्याने आपला दिवस खूप चांगला जातो.आपल्या चुका आपण टाळण्याचा प्रयत्न करतो.कारण निंदकाच्या हाती आपली एखादी गोष्ट लागू नाही म्हणून आपण काळजी घेत असतो..

 कडू डोस:


निंदकाला लगेच प्रती उत्तर देऊन नका.त्याने केलेली निंदा सहन करायला शिका.आणि जमलेच तर आपल्यातले त्याने दाखवून दिलेले अवगुण काढायला शिका.तो सतत आपल्यावर टीका करतो म्हणून त्याचे आभार माना. आणि त्याला आणखी टीका करण्याची संधी द्या.""म्हणजे एक काळ असा येईल की तुमच्यातील सर्व अवगुण नष्ट होऊन त्याला निंदा करण्यासाठी काहीच राहणार नाही. आणि तो जुनेच चघळत बसेल.मग हसण्याची पाळी तुमची असेल.


शांताराम निकम
22 एप्रिल 2017⁠⁠⁠⁠

मुलांवर संस्कार कसे करावेत ?

मुलांवर संस्कार कसे करावेत ?
याचं एक सुंदर उदाहरण पहा.
एक मध्यमवयीन गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर एक ७-८ वर्षांचा मुलगा भर दुपारी चालले होते. 
वाटेत त्यांना एक मोठं शेत लागलं. शेतात एक शेतकरी जमीन नांगरत होता. जवळच एका झाडाखाली त्याचं जुजबी समान होतं आणि झाडाच्या फांदीवर त्याने आपला सदरा अडकवला होता. सदरा पाहताच या छोट्या मुलाच्या मनात काहीतरी सुरु झालं आणि त्याचे डोळे चमकू लागले.
तो म्हणाला, "बाबा, त्या सदऱ्याच्या खिशामध्ये मी आता २-२ दगड ठेवतो, जेव्हा तो शेतकरी सदरा घालेल आणि खिशात हात घालून दगड पाहील तेव्हा खूप मजा येईल."
बाबा म्हणाले, "हो, पण मी एक बदल सुचवतो बघ ....त्या दगडांच्या ऐवजी आपण २-२ चांदीचे रुपये ठेऊ या."
मुलगा म्हणाला, छे, दगडानं जास्त गम्मत येईल, रुपयांपेक्षा."
पण बाबा म्हणाले, "पहा तर, तुला जास्त मजा येईल."
मुलगा थोड्या नाराजीनेच तयार झाला आणि त्यानं टाचा उंचावून त्या फांदीला लटकवलेल्या सदऱ्याच्या दोन्ही खिशात २-२ चांदीचे रुपये ठेवले. त्याला वाटत होतं....मजा तर येणारच नाही उलट रुपये मात्र जाणार.
ते दोघेही एका झाडामागे लपून शेतकऱ्याकडे पाहू लागले. सूर्य डोक्यावर आला. शेतकऱ्यानं नांगरणी थांबवून बैल सोडले आणि एका झाडाखाली त्यांना बांधलं, चारा टाकला आणि स्वतःशीच पुटपुटत बांधावर बसला. आता त्याचं बोलणे या दोघानाही ऐकू येऊ लागलं.
'कालच्यान् अन्नाचा कण कोनाच्या पोटात गेला नाई. घरात शिजवायला कायबी नाई. कारभारीनबी उपाशीच. लेकराला दूध नाई. कसं व्हणार? काय बी समजना.' 
मग हताश होऊन तो उठला मडक्यातील पाणी प्यायला आणि फांदीवरचा सदरा काढून अंगात घातला. सवयीने खिशात हात गेला हाताला काही लागलं म्हणून पाहतो तो काय चांदीचे २ रुपये!...दुसऱ्या खिशात हात घातला तर त्यामध्येही २ रुपये!!. 
त्याच्या चेहऱ्यावर मघापासून जी उदासीनता होती ती नाहीशी झाली त्याचा चेहरा उजळला आणि पुन्हा बोलू लागला. 'आता या पैशानं मी धान आणील आणि कारभारनीकडं देईन. मग ती रांधून पोटभर जेवंल आणि लेकरालाबी दूध पाजंल. लेकरू मग खूप खूश होईल. त्या दोघांना असं आनंदात बघून माझंबी पोट भरंल.'
मग तो नांगरलेल्या शेतात गेला. वरती आकाशाकडे पहात बोलू लागला, 'देवा, कोनाच्या रूपानं तू माज्यासाठी येवडा तरास घेतलास? ज्येनं ह्ये काम केलं त्येला खूप आयुक्ष दे, त्यो जगाचा धर्मावतार होऊ दे, देवा, ही सारी तुजी दया...म्या आज भरून पावलो.'
हे सारं बोलणं ऐकून तो लहान मुलगा रडू लागला. आपल्याला काय होतं आहे हे त्यालाच कळत नव्हतं. तो बाबांना म्हणाला, "बाबा,मला काय होतंय, हे मला काहीच कळत नाही. असं वाटतंय की, माझ्या शरीराला लक्ष लक्ष डोळे फुटले आहेत आणि त्या साऱ्या डोळ्यांनी मी रडतो आहे....
पण तरीही माझ्या अंगातून सुखाच्या, समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी उठत आहेत."
बाबा म्हणाले."बाळ, माणुसकीचा एक धडा तू आज शिकलास. त्या गरिबाचे शब्द तू ऐकलेस ना? त्याचा आशीर्वाद देवाघरून आला आहे, तो खरा होणार."
अशी शिकवण हवी, असा गुरु हवा किंवा असा संस्कार हवा की, तो कायमचा मनांवर बिंबला जाईल.
☞☞आवडली तर नक्की शेयर करा ☜☜

🙏🏻🙏🏻 ।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🏻🙏🏻⁠⁠⁠⁠

⁠⁠⁠"अपेक्षा "

⁠⁠⁠"अपेक्षा "

आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, "बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे?  तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझ आजारपण, पडण, रडण, दुखण, भरवणं, शिकवण काय काय नाही केल. स्वत:च जगणंच विसरले मी."


मुलगा म्हणाला, "आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."


आई स्मितहास्य करित म्हणाली, " अरे वेडया हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन् हो, तू जेव्हा खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा  ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."


मुलगा म्हणाला,"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर"


आई आता हसली म्हणाली, "सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच ईच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न कराव ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ दयावी, समजून घ्याव व सुखाने एकत्र नांदाव."


मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला, "आता तूच सांग ना आई मला, "मी काय कराव तुझ्यासाठी?"

आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली, "ऐक, जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने  मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हिच अपेक्षा आहे माझी.
 जेव्हा देवासमोर उभा राहशील तेव्हा माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर.
 मी जेव्हा मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर. तु केलेले प्रत्येक चांगले काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, आसपास असलेल्या लहानथोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव.
लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट हे मी स्वेच्छेने स्विकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा  दोघांचा निर्णय होता.

 देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची त्याबद्दल त्याची मी सदैव रृणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.


 तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल.

करशील का हे?"

निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते.


धन्य धन्य ती माता!!

निरपेक्ष व निस्सिम प्रेम फक्त माताच करु जाणे, त्रिवार वंदन प्रत्येक  मातेला !!

अबोला

अबोला

काही मंडळी अबोल्याचा आपल्या विरोधकांविरोधात शस्त्रासारखा उपयोग करतात. ज्या व्यक्‍तीशी आपले मतभेद आहेत किंवा काही कारणाने वादविवाद झाला आहे, अशा व्यक्‍तीशी बोलणे बंद करणे, अबोला धरणे ही बाब समाजात सर्रास आढळते. या अबोल्यांना वयाचे, पदाचे, परिस्थितीचे, प्रांताचे, देशाचे कशाचेही बंधन नसते. विशेषत: नवराबायकोच्या नात्यात या अबोल्याला विशेष स्थान आहे.

लहानपणीे खेळता-खेळता मित्रमैत्रिणींशी भांडण झाले की, कट्टी त कट्टी, बालं बट्टी लिंबाचा पाला तोडू नको, बारा महिने बोलू नको, असे अगदी रितसर सांगून अबोला धरला जायचा, 12 महिन्यांची कालमर्यादाही घालून दिली जायची, एकप्रकारे 12 महिन्यांनंतर बोलण्याचे आश्‍वासन दिले जायचे. अर्थात हा अबोला अनेकदा 12 मिनटातच संपायचा, हा भाग वेगळा. (आताच्या लहान मुलांची अबोला धरण्याची काय पद्धत आहे, माहिती नाही.) मोठ्यांचा अबोला मात्र अनेकदा कुठलीही कल्पना न देता सुरू होतो. बरेचदा तर निर्णय एकतर्फी घेतलेला असतो. समोरच्याने आपल्याशी अबोला धरला आहे, त्या माध्यमातून तो आपल्याला शिक्षा देतो आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला अनेकदा माहिती नसते. कधी कधी तर ही अबोल्याची शिक्षा आपल्याला कशासाठी देण्यात आली आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला कळतच नाही. हे प्रगल्भतेचे लक्षण नक्‍कीच नाही. अबोल्याने कुठलेही प्रश्‍न सुटू शकत नाहीत. उलट गैरसमज वाढतात आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्यातले किती सुंदर सोनेरी क्षण या अबोल्यात आपण कायमचे हरवून बसतो. त्यापेक्षा एखाद्या व्यक्‍तीविषयी आपल्याला काही तक्रार असेल, किंवा त्याच्याशी काही विषयात मतभेद असतील, तर ते चर्चेतून सुटू शकतात. दोघांनीही एकमेकांविषयीच्या तक्रारी शांतपणे, समजूतदारपणे एकमेकांना सांगाव्यात गरज असल्यास दोघेही ज्या व्यक्‍तीला मानत असतील, अशा मध्यस्थाला सोबत ठेवावे. त्यातून काही मध्यम मार्ग निघू शकतो का, ते पाहावे. मतभेद अगदीच टोकाचे असतील आणि मार्ग निघण्याची शक्‍यता संपलेली असेल, तर तेवढा मतभेदाचा विषय बाजूला ठेऊन बाकी संबंध कायम ठेवले जाऊ शकतात. अर्थात यासाठी दोन्ही बाजूच्या व्यक्‍ती तेवढ्या प्रगल्भ असणे आवश्‍यक आहे. कारण बोलणे म्हणजे एकमेकांना त्यानिमित्ताने टोचणे किंवा कलगीतुरा नव्हे, तर संभाषण होय. अशा प्रकारे मतभेद विसरून संबंध कायम ठेवणारी माणसे हे समृद्ध मानसिकतेचे लक्षण आहे. अशा पद्धतीने वागणारी माणसेच मोठी होतात. त्यांच्या लोकसंग्रहात दिवसेंदिवस वाढच होते. 
एरवी अशा बालिश अबोल्याने अनेक वर्षांचे चांगले संबंध संपुष्टात येतात. पुढे कधीतरी कळते. ज्या कारणासाठी आपण अबोला धरला होता, तो कोणीतरी तिसऱ्याने निर्माण केलेला गैरसमज होता. किंवा आपलाच अहंकार होता की मीच का बोलावे, मीच का पुढाकार घ्यावा, पण हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. चांगले नाते कोमजलेले असते.

जिथे बोलून किंवा मन मोकळे करूनही दुसरी व्यक्‍ती समजण्यापलिकडची असेल, किंवा आपल्या समजुतदारपणाला आपली कमजोरी समजली जात असेल, अशावेळी अबोल्याला पर्याय नसतो, अर्थात तरीही तुझ्या अशा वागण्यामुळे मी आता तुझ्याशी बोलणे बंद करणार आहे, हे त्या व्यक्‍तीला निश्‍चित सांगावे. 

आयुष्य किती आहे, कोणाला माहिती आहे, मित्रांनो. कधीतरी छोट्याशा अहंकारामुळे किंवा गैरसमजामुळे आपण कोणाला तरी अबोल्याची शिक्षा देतो आणि कदाचित मग हळहळण्यापलिकडे आपल्या हातात काहीही उरत नाही. 

अलिकडे हा अबोला मोबाईल, फोन, सोशल साईट्‌सलाही घेरून बसला आहे. अनेकदा एखाद्या व्यक्‍तीचा फोनच उचलला जात नाही. त्याच्या संदेशांना उत्तरही दिले जात नाही. कधी महत्त्वाचा निरोप असतो किंवा त्या व्यक्तीला तुमच्या मानसिक आधाराची नितांत गरज असते. अशावेळी त्या व्यक्‍तीची केलेली अडवणूक हा निव्वळ क्रुरपणा आहे. 
नवे वर्ष येऊ घातले आहे, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग, अशा काही व्यक्‍ती असतातच. आपण स्वत:हून एक पाऊल पुढे टाकून बघुया का? आयुष्यातला कडू रस कमी होतोय का ते?

अशा अबोला धरलेल्या पण हवाश्‍या वाटणाऱ्या व्यक्‍तीला मनापासून हळुवार हाक देऊन तर बघा, मनावरचे मणामणांचे ओझे क्षणात उतरेल आणि मनातल्या सुकलेल्या झाडाला कोवळी लुसलुशीत पालवी फुटेल.⁠⁠⁠⁠

inspiring words

Worlds 8  superb  sentences

--------------<>-------------

Shakespeare :👌

Never  play  with the feelings

of  others  because  you may

win the  game but the  risk is

that  you  will surely  lose

the person  for a  life time.

--------------------------------

Napoleon.👌

The world  suffers  a  lot. Not

because  of  the  violence  of

bad people, But because   of

the silence of good people!

--------------------------------

Einstein :👌

I  am  thankful  to  all those

who  said  NO  to  me   It's

because  of  them  I  did  it

myself.

--------------------------------

Abraham Lincoln :👌

If friendship is your weakest

point  then  you  are  the

strongest  person  in the

world.

--------------------------------

Shakespeare :👌

Laughing  faces  do  not

mean that  there is  absence

of sorrow!  But it means that

they  have the ability to deal

with it.

----------------------

William  Arthur : 👌

Opportunities   are  like

sunrises, if  you  wait too

long  you  can miss them.

------------------------------

Hitler : 👌

When  you  are  in  the light,

Everything follows  you, But

when  you  enter  into   the

dark, Even your own shadow

doesn't  follow  you.

--------------------------------

Shakespeare : 👌

Coin  always  makes  sound

but  the  currency  notes are

always  silent.  So  when

 your value  increases

keep quiet.⁠⁠⁠⁠