१) स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे
तुम्हांला इतरांना दोष दयायला वेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने
तुमच्याकडे पहावे म्हणून नाही तर त्या शिखरावरून
तुम्हांला जग पाहता यावं म्हणून.
२) आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे
आणि तुम्ही म्हणजे लाटा आहात. समुद्रात किती
आणि तुम्ही म्हणजे लाटा आहात. समुद्रात किती
लाटा आहेत ते महत्त्वाचे नाही त्या किनाऱ्याला
किती स्पर्श करतात ते महत्त्वाचे.....
किती स्पर्श करतात ते महत्त्वाचे.....
३) केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायावर
यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते.
४) आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोअर नाही,
हवेहवेश्या वाटणाऱ्या क्षणाला डाऊनलोड करता येत नाही. नकोनकोश्या वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही
म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या प्रत्येकाशी प्रेमाने वागा.
म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या प्रत्येकाशी प्रेमाने वागा.
५) जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका .....
सगळं काही मनासारखं होतं असं नाही
एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका .....
सगळं काही मनासारखं होतं असं नाही
पण मनासारखं झालेलं विसरू नका....
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नका.
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नका.
६) प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही
तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यात दिसते.
तसेच मन व विचार सैरभर असताना मार्ग
कधीच मिळत नाही, शांत व्हा व मन एकाग्र
करून विचार करा तुम्हांला मार्ग नक्कीच सापडेल.
करून विचार करा तुम्हांला मार्ग नक्कीच सापडेल.
७) दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची
एक दीपमाळ तयार होते,फुलाला फुल जोडले
की फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस
जोडत गेलं की माणुसकीच सुंदर नातं तयार होतं.
की फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस
जोडत गेलं की माणुसकीच सुंदर नातं तयार होतं.
८) कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका,
आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे
भले होणार असल्यास ते सोडू नका.
९) जर आपला हेतुच शुद्ध आणि प्रामाणिक असेल
९) जर आपला हेतुच शुद्ध आणि प्रामाणिक असेल
तर आपल्यावर टीका करणाऱ्याच्या टीकेला
नक्कीच महत्व नसते.
१ १०) चांगल्या कर्माची फळ चांगलीच असतात.
मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थीपणे
केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही.
केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही.
११) हसताना जितक्या हक्काने रुसता आलं पाहिजे...
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता
आलं पाहिजे.....मान-अपमान मैत्रीत काहीच नसतं.
आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात
आलं पाहिजे.....मान-अपमान मैत्रीत काहीच नसतं.
आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात
घुसता आलं पाहिजे.......
१२) जर तुम्हांला आयुष्यात खूप संघर्ष करावा
लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा,
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच
देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
१३) चांगली माणसे व जीवाभावाचे मित्र शंभर
वेळा जरी नाराज झाले तरी त्यांची नाराजी
दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे कारण किमती
मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्या वेळा
दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे कारण किमती
मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्या वेळा
आपण ती ओवतो. माळ तुटली म्हणून
आपण मोती फेकून देत नाही.
१४) आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दु:ख नसतेच असे नाही ,
फक्त त्यांना दु:खाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते.
१५) ज्यांचा स्वाभिमान जिवंत आहे तीच माणसे
१५) ज्यांचा स्वाभिमान जिवंत आहे तीच माणसे
‘संघर्ष’ची व्याख्या समजू शकतात.! ज्यांचा स्वाभिमान
मेलेला आहे ते आयुष्यभर इतरांचे गुलाम बनून जगतात ...!
अशी मेलेली माणसे कोणतेही मिशन चालवू शकत नाहीत ...!
तर जिवंत माणसे चालू मिशन थांबू देत नाहीत ...!
१६) लोखंडाला दुसरे कोणी नष्ट करू शकत नाही,
त्याच्या गंज पकडण्याच्या वृत्तीशिवाय ...
आपल्यालाही कोणी हरवू शकत नाही,
आपल्या नकारात्मक विचार करण्याच्या वृत्तीशिवाय.....
१७) जो मैदानात हरलाय तो परत जिंकू शकतो,
परंतु जो मनाने हरलाय, तो कधीच जिंकू शकणार नाही,
आपला आत्मविश्वास हाच आपला सर्वात मोठा ठेवा आहे ,
त्यास डळमळू देऊ नका .
१८) जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा लोकही वाईट वागतात,
चांगली वेळ आल्यावर लोक चांगले वागतात,
दोष लोकांचा नाही तर वेळेचा आहे.त्यामुळे नेहमी
लक्षात ठेवा माणसं बदलण्यात वेळ घालवू नका.
परिस्थिती बदला बाकी सगळे आपोआप बदलेल.
१९) चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो आणि
योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास वाढतो
म्हणून निर्णय चूक कि बरोबर विचार करायचा
नाही ...निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचे.
२०) न थकता, न हरता, न थांबता....
प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीकधी नशीबदेखील हरते ...
२०) न थकता, न हरता, न थांबता....
प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीकधी नशीबदेखील हरते ...
पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो
त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची वाट सापडते .
२१) चांगल्या लोकांना मिळणारा मान कधी कमी
होत नाही, शुद्ध सोन्याचे शंभर तुकडे केले
तरी त्याची किंमत कमी होत नाही.
तरी त्याची किंमत कमी होत नाही.
चुकणे ही प्रकृती, मान्य करणे ही संस्कृती आणि सुधारणा करणे ही प्रगती आहे.
जगायचे तर दिव्याप्रमाणे , जो राजाच्या
महालात आणि गरिबांच्या झोपडीत
सारखाच प्रकाश देतो ...!
२२) माणसाच्या मुखात गोडवा ... मनात प्रेम ...
वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जान असेल
तर बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात .
२३) स्वभावाला औषधं असते पण ते रोज घ्यायचं असते,
अधिरातला अ काढून धीराने घ्यायचे असते,
संतापातला ताप सोडून मनाने संत व्हायचे असते,
मनातला हट्ट सोडून नाते घट्ट करायचे असते,
माझ्यातला मी सोडून तिच्यातला ती जपायचा असतो,
आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचही ऐकायचं असतं..
२४) कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचे
२४) कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचे
प्रयत्न करावा.....!कारण एक जुनी म्हण आहे
‘जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातानाही
नेहमी सुगंध दरवळत राहतो.’
‘जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातानाही
नेहमी सुगंध दरवळत राहतो.’
२५) मृगाकडे कस्तुरी आहे ....,फुलात गंध आहे...,
सागराकडे अथांगता आहे..., माझ्याकडे काय आहे....?
असं म्हणून रडू नका.अंधाराला जळणारा एक सूर्य
तुमच्यातही लपलाय ! आव्हान करा त्या सूर्याला !!
तुमच्यातही लपलाय ! आव्हान करा त्या सूर्याला !!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिजे घेऊन,
अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून.
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ, उत्साह-ध्येयाने भरून..!!
‘जीवन खूप सुंदर आहे फक्त तसे जगायला हवे..’
२६) पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे वाहून जाणाऱ्या मातीच्या
ढेकळाप्रमाणे आपण भुसभुशीत नसून आपण पाण्यात
न विरघळता नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या एखाद्या
न विरघळता नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या एखाद्या
भक्कम खडकासारखे आहोत आणि कोठेही असलो
किंवा कोणाच्याही संगतीत राहिलो तरी आपण
स्वत:चे वैशिष्ट्य कधीही गमवायचे नसते.
२७) आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, राशींवर नाही.
कारण राम-रावण, ओबामा-ओसामा, गांधीजी-गोडसे,
कृष्ण-कंस यांच्या राशी एकच होत्या पण कर्म वेगळे...!
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन... भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाही.
२८) ओंजळीत बसेल तेवढ नक्की द्या ...
पण सांडण्यापूर्वी ते वाटायला शिका ...
माणुसकी कमी होत चालली आहे,
तेवढी फक्त जपायला शिका.
इतिहास सांगतो कि काळ सुख होत !
विज्ञान सांगते कि उद्या सुख असेल !
पण माणुसकी सांगते कि जर मन खरे असेल
आणि हृदय चांगले असेल तर दररोज सुख आहे !
२९) ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी
गाठली आहे, त्या पायरीला कधीच विसरू नये .
कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण
पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो ...!
३०) या जगात सर्वात ...
मोठी संपत्ती “बुद्धी”
सर्वात चांगला हत्यार “धैर्य”
सर्वात चांगली सुरक्षा “विश्वास”
सर्वात चांगले औषध “हसू”
आणि आश्चर्य म्हणजे “हे सर्व विनामूल्य आहे...”
३१) हरण्याची पर्वा कधी केली नाही ,
जिंकण्याचा मोह कधी केला नाही,
नशिबात असेल ते मिळेलच पण प्रयत्न
करणे मी सोडणार नाही ...
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात .
पण, एकच गोष्ट आशी आहे कि जी एकदा
हातातून निसटली की,कोणत्याही उपायाने पुन्हा
मिळू शकत नाही...आणि ती असते... “आपलं आयुष्य...”
म्हणूनच ..... मनसोक्त जगा .....
मिळू शकत नाही...आणि ती असते... “आपलं आयुष्य...”
म्हणूनच ..... मनसोक्त जगा .....
३२) साधे सोपे जगावे, दिलखुलास हसावे न लाजता रडावे,
राग आलं तर चिडावे पण झाले – गेले सोडावे,
आपल्या माणसांवर हक्कानी रुसावे,
मदतगारांना आयुष्यभर स्मरावे,
खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावे.
स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावे,
सुंदर जग बनवल्याबद्दल मात्र
‘त्या परमेश्वराचे आभार मात्र जरूर मानावे...’
३३) आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची
भीती नसते, मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची
परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात, या परीक्षेत जो
उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतोच.
उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतोच.
३४) संयम आणि माफी करण्याची ताकद मनुष्यामध्ये
असली की तो यशस्वी होतोच.
३५) समाधान प्रत्येकालाच हवे असते व ते मिळवण्यासाठी
प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या ‘क्षमते’नुसार प्रयत्न करीत
असते. कधी-कधी साफल्याचे प्रयत्न व पूर्तीचे समाधान
असते. कधी-कधी साफल्याचे प्रयत्न व पूर्तीचे समाधान
मिळतेही पण,ते काही काळापुरतेच,चिरकालीन नव्हे.
पण, ते मिळवण्याचाही प्रयत्न करावयास हवा.
अन्यथा व्यक्तीच्या सर्जनशीलतेला, क्रियाशक्तीला बाधा
येईल. समाधान, असमाधानाचा झोका अथवा लंबक
मागे-पुढे होताच असतो. हे वास्तव मनोमन ठसवून
जीवन जगण्यात मौज आहे.
जीवन जगण्यात मौज आहे.
३६) अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका
उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल हिशोब
तुम्ही करू नका. काही जिंकण बाकी आहे,
तुम्ही करू नका. काही जिंकण बाकी आहे,
काही हरणे बाकी आहे. अजुनही आयुष्याचे पूर्ण
सार बाकी आहे.आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे,
सार बाकी आहे.आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे,
आपण पहिल्या पानावर आहोत,अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे .....
३७) परिस्थितीनुसार मानसिकता बदलायला शिका
अथवा तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही.
३८) जो माणूस वेळोवेळी गरम होतो त्याला काच समजावे
आणि जो विपरीत परिस्थितीतही शांत राहतो
त्याला हिरा समजावे.
३९) जे घडते ते चांगल्यासाठीच ...! फरक फक्त एवढाच
असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असते
तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी...!
तर कधी दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी...!
४०) आयुष्यात यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात.
थोडेसे दुर्लक्ष आणि थोडासा आत्मविश्वास – मार्क ट्वेन.
४१) जेव्हा एक दरवाजा बंद होतो, तेव्हा तुमच्याही
नकळत दुसरा दरवाजा उघडलेला असतो, हे कायम
लक्षात ठेवा – बॉब मार्ले.
लक्षात ठेवा – बॉब मार्ले.
४२) संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये
असली की तो यशस्वी होतो.
४३) सेल्फिपेक्षा इमेज महत्त्वाची असते, कारण सेल्फी
सहज काढता येतो पण इमेज बनवावी लागते.
४४) ताकद आणि पैसा हे जीवनाचे फळ आहे
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम हे जीवनाचे मुळ आहे.
४५) आयुष्यात सुई बनून रहा कैची बनून राहू नका
कारण सुई दोन तुकड्यांना जोडते तर कैची
एकाचे दोन तुकडे करते .
४६)*सुंदर काय असतं ???*
जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं... *ते मन सुंदर...*
चांगल्या चेह-याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात...
*ते विचार सुंदर...*
आणि कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते... *ते नाते सुंदर...!*
४७)*ज्योतीचा वापर योग्य केला तर अनेकांचे आयुष्य उजळतं*...
पण याच ज्योतीला जर *अहंकाराचा वारा लागला तर*... "वणवा" पेटतो.....
*जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते*.
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे योग्य..!!
*स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,*
*स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,*
पण.... *एखाद्याच्या मनात घर करणे*, यापेक्षा सुंदर काहीच नसते.
No comments:
Post a Comment