माझी भाषणे आणि निबंध

मराठी भाषेचे संवर्धन एक आवाहन


जन्मले मातीत ज्याती माती मराठी,
बिलगले छातीस ज्याती छाती मराठी,
चालले हातास धरूनतो हात मराठी,
लाभली आजवर साथती साथ मराठी.’

    जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी' म्हणजे जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे असे आपल्या संस्कृत सुभाषितकारांनी म्हटले आहेयात थोडी भर घालून मी असं म्हणेन की आपली माता,मातृभूमी याबरोबर मातृभाषेचाही प्रत्येकाला अभिमान असतोआनंददुःखभीती अशा क्षणी आपल्या ओठी शब्द येतात ते मातृभाषेतूनच .
     मला सांगायला अभिमान वाटतो कीमाझ्या मराठीची गोडीमला वाटते अवीट असे म्हणून शाहिरांनी ज्या मराठी भाषेचे कौतुक केले आहे ती मराठी भाषा माझी मायबोली आहे.२१ फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिन ठिकठिकाणी साजरा केला गेला आणि २७ फेब्रुवारीला आपण मराठी राजभाषा दिन साजरा करतो. मातृभाषेचा हा गौरव मराठी माणसाला अभिमान वाटावा असाच आहेमराठी भाषा संपन्न आहे.मराठीची शब्दसंपत्ती समृद्ध आहेसूक्ष्मातिसूक्ष्म आशय व्यक्त करण्याची ताकद या भाषेत आहेमात्र आजच्या मराठी भाषेच्या स्वरूपासंबंधी विचार करताना प्रामुख्याने जाणवतेते तिचे झपाट्याने बदलत चाललेले रूप खरेतर इंग्रजीचे आक्रमण आणि जागतिकीकरणाच्या वादळात मराठी भाषा आणि संस्कृती नष्ट होण्याची भीती सातत्याने व्यक्त केली जातेमराठी राजभाषा दिन साजरा करणे खूप सोप आहेपण खरोखर आपण ती टिकावी म्हणून प्रयत्न करतो काअशावेळी फक्त मराठीचे गोडवे गाणाऱ्यांच्या संदर्भात पुढील ओळी सार्थ ठरतात.

'मराठी वाचवामराठी वाचवा,
या केवळ गप्पा आहेत,
घरोघरी मम्मीआंटीअंकलआणि पप्पा आहेत,
कुणी इंग्रजाळलेले आहेतकुणी हिंदाळलेले आहेत,
मराठीचे सारे संस्कारमाळ्यावरती गुंडाळलेले आहेत,
अशांनी मराठी वाचवा म्हणायचेकाही कारण नाही,
ज्ञानानामातुका, एका,
जिचे पुत्र तिला कधीसुद्धा मरण नाही.'

आपले संवेदनशून्य होत चाललेले मन सध्या हेही विसरत आहे की जागतिक 
रेट्यासमोर आपली मातृभाषा तिच्या हक्कांपासून वंचित होत आहेआपल्याच मातृभाषेपासून आपण दूर होत आहोततिच्या शुद्धतेला पारखे होत आहोतएकीकडे इंग्रजीसारख्या परकीय भाषेचा द्वेष करायचा नाही अन त्याचे ज्ञानही मिळवायचे हे मोठे आव्हान आहे परंतु त्याचबरोबर आपली भाषा समृद्ध करायचीतिचा वापर प्रसार करायचा हेही आव्हान आहे आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतील शक्तीस्थळ आपण ओळखायला हवीतभाषेचा योग्य सन्मान राखायला हवा.
     याच पार्श्वभूमीवर  मला महात्मा गांधीजींचीही आठवण येते. स्वातंत्र्यापूर्वी सर्वच क्रांतिकारकांविषयी तत्कालीन जनतेच्या मनात आदर होता परंतु गांधीजींविषयी जास्त आदर होता कारण गांधीजींनी अगदी लहान लहान कृतींतून देशभक्ती व्यक्त करता येऊ शकते हे संगीतले होतेउदाप्रभात फे-या काढणेवंदे मातरम म्हणणेखादीचा वापर करणे इत्यादी. त्यामुळे लोकांना देशासाठी कार्य केल्याचा अभिमान वाटत होतायाची आठवण आता होण्याचे कारण म्हणजे ज्याप्रमाणे गांधीजींनी इंग्रजांसमोर प्रतिआव्हान निर्माण केले होते त्याप्रमाणे आज मराठी भाषेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत त्यांना प्रतिआव्हाने  निर्माण करावी लागतील त्यासाठी आपण छोट्या छोट्या कृतींद्वारे ते करू शकतोउदादैनंदिन जीवनात आपण १० तरी फोन कॉल्स घेतोतेव्हा हँलो बोलतो त्याऐवजी नमस्कार बोललो तर आपले भाषेवरचे प्रेमही व्यक्त होईल आणि समोरची अनोळखी व्यक्ती जर मराठी भाषिक असेल तर ती आपल्याशी सहज संवाद साधू शकेल.
     आज महाराष्ट्राला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली त्याला अर्धशतक उलटून गेले तरी मराठी भाषा व संस्कृती संवर्धनास योग्य दिशा व गती प्राप्त झाल्याचे दिसत नाही त्यासाठी प्रयत्न होत आहेत;परंतु ते दूरदृष्टीने होताना दिसत नाही.
     आज जर मराठीचे संवर्धन करायचे असेल तर सर्वप्रथम आपण ती भाषा हिरिरीने बोलली पाहिजेअनेक प्रमुख भाषांपैकी मराठीलाही मान्यता आहेआणि म्हणूनच आपण तिचा सामाजिक व्यवहारात वापर करायला हवा.मराठीमध्ये अनेक बोलीभाषा आहेतभाषेचे संवर्धन करायचे असेल तर या बोलीभाषांचा विकास करायला हवा. प्रत्येकाने कसलीही लाज न बाळगता आपल्या बोलीभाषेचा वापर आपल्या समूहात,प्रदेशात केला पाहिजे.
मराठी भाषेच्या संवर्धनाचा विचार करताना ती जिवंत राहणार आहे आणि आपण ती जिवंत ठेवणार आहोत.आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात इंग्रजीचा बोलबोला आहेत्यामुळे इंग्रजीचाच वरचष्मा असणे स्वाभाविक आहेपरंतु प्रश्न आहे तो इंग्रजीतील ज्ञानसंपदा मराठीत आणण्यासाठी आपण किती प्रयत्नशील आहोत.यासाठी भाषांतर कौशल्य विकसित केलेपाहिजे.विमा,फॅशनबांधकामप्रसारमाध्यमेमनोरंजन या विविध सेवाक्षेत्रामध्ये तांत्रिक भाषेची अधिक गरज नाही तेथे मराठीचा अधिकाधिक वापरप्रसार केला पाहिजे.
     आजच्या काळात टिव्हीहे सर्वात प्रभावी माध्यम आहेआज मराठी भाषिक प्रेक्षक हिंदी व इंग्रजी वाहिन्यांकडून मराठी वाहिन्यांकडे वळत आहेतया माध्यमांमुळे मराठीचा नकळत का होईना प्रसार-प्रचार होत आहेआज इंटरनेटविकिपीडियामराठी-इंग्रजी शब्दकोष यामुळे मराठीचे अधिकाधिक संक्रमण होणे गरजेचे आहेत्याठिकाणी मराठीचा अधिकाधिक वापर होणे गरजेचे आहेवेबब्लॉगट्विटर यामुळे लेखकांना प्रकाशकांच्या मध्यस्थी शिवाय लेखन करणे शक्य झाले आहेयाचाच फायदा आपण करून घ्यायला हवा.
     मराठीला खरोखर सक्षम व समर्थ करायचे असेल तर मराठी भाषिक समाजाचा दृष्टिकोन मुळातून बदलायला हवामराठी भाषेवरचे आपले प्रेम नकारात्मक आणि सापेक्ष असता कामा नयेमराठी भाषिकांची वृत्ती अधिक कृतिशीलव्यवहारी व आधुनिक व्हायला हवीतिच्याशिवाय फक्त गौरवाचेअभिमानाचे शब्द न काढताहळवे न होता ती आहे तशी पुन्हा निर्माण केली पाहिजेजाता-जाता एवढंच म्हणेन,

'उतरवून निराशेची  कातचढवा कात मराठीची,विसरुनी सारी जातलढवा जात मराठी, बोलीन एक भाषाती भाषा मराठी,दाखवीन उदयाची आशाती आशा मराठी.'


मतपेटीचे मनोगत 
किती वर्ष झाली या अंधाऱ्या गोदामात मी पडून आहे.
श्वास घ्यायचा म्हटल तरी धूळ नाकातोंडात जाते आणि
जीव गुदमरून जातो. जळमटामध्ये अनभिषिक्त सम्राटासारखे विराजमान कोळी मला वाकुल्या दाखवत आहेत.भलेथोरले उंदीर माझ्या अंगावर बागडतात,माझ्या पोटाच्या पोकळीत शिरून कल्ला करतात,किळसवाण्या पाली माझ्या अंगावरून सरपटत जातात तेव्हा मी शहारते,झुरळांचे तर बोलायलाच नको. माझ्या शरीराच्या सांधीकोप्र्यात त्यांनी आपल बस्तान बसवले आहे. सूर्याचा किरण मी गेल्या कित्येक वर्षात पाहिला नाही.दिवस कधी उजाडतो आणि मावळतो ते मला ठाऊक नाही.एखाद्या तुरुंगातील अट्टल गुन्हेगाराला जसे काळकोठडीत कोंडलेले असते तशी माझी अवस्था आहे. 
अजून मला जुने दिवस आठवतात.......निवडणूक आली की,
मला रंगरंगोटी करून किंवा काळे पोलिश करून एखाद्या मतदान केंद्रावर मी जात असे.मतदानापासून मात्मोजानिपर्यंत मी कडक सुरक्षेत असायचे.लोकसभा झाली की विधानसभा, महापालिका झाली की नगरपालिका .......मी सतत पायाला भिंगरी लागल्यासारखी
फिरत होते. बिहारमध्ये काही धटीगणांनी बंदुकीचा धाक दाखवून मला पळवून नेले.नंतर मात्र पोलिसांनी लागलीच माझी सुटका केली. राजीव गांधी यांना लोकसभा निवडणुकीत धो धो मते पडली पण कुणी माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले नाहीत.माझी मैत्रीण शाई हिच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेकदा आरोप केले. 'निवडणुकीतील विजय हा इंदिरा या बाईचा नसून शाईचा आहे.'
परवा मी पडलेल्या गोदामात काही माणसे आली.त्यातल्या एकाने माझ्यावरची धूळ झटकली. लागलीच माझ्या पोटावरचे उंदीर पळून गेले.झुरळ सैरावैरा झाली. लोकांचा EVM मशीनवरचा विश्वास उडालाय.आता पुन्हा हिला बाहेर काढावे लागेल. मी जीवाचा कान करून ते काय बोलतायत ते ऐकत होते. दुसरा म्हणाला, 'लगेच EVM जाणार नाही. मशीनवर झटपट निकाल लागतो. जेव्हा निर्णय होईल तेव्हा बघू.' तोपर्यंत हि इकडेच राहू दे. भंगारात नको काढूया ना? दुसरा बोलला. म्हणजे माझी या काळकोठडीतून सुटका नाही, हे दु:ख कायम.मात्र त्याच वेळी माझं अस्तित्व टिकून राहण्याचा सुखद प्रकाश हिच काय ती आशा............ 

ईव्हीएम मशीनचे आत्मकथन
      किती हा घोर अन्याय बघा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर जर कुणी टीकेचे लक्ष्य असले तर मीच. उद्धव ठाकरेंपासून मायावतींपर्यंत आणि राज ठाकरेंपासून अरविंद केजरीवालांपर्यंत सारेच माझ्या नावाने कडाकडा बोटे मोडताहेत. मुंबई महापालिका निवडणुकीपासून उत्तर प्रदेश विधानसभेपर्यंत सर्वच निवडणुकीत
मला भाजपाने manage केल्याच्या टीकेचे अक्षरशः काहूर माजलाय. 'शिवसेनेला चीतपट करण्याकरिता कॉंग्रेसने २००९ मध्ये मनसेला manage केल अथवा पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला रोखण्याकरिता भाजपाने कॉंग्रेसला manage केल' हा आरोप कोणी केला, तर तो समजू शकतो कारण manage होणे हा मर्त्य मानवाचा गुणधर्म म्हणा अथवा अवगुणधर्म आहे. वेगवेगळ्या राज्यांतील निवडणुकींच्या वेळी माझीच निवडणूक आयोग या माझ्या पितृसंस्थेला आठवण होते. मग,माझी चाचणी घेऊन माझ्या प्रकृतीस्वास्थ्याची खातरजमा केली जाते. त्यानंतर मी माझ्या हजारो सहकाऱ्यांसह प्रयासाला निघतो. जेथे उतरवतील तेथे निमुटपणे उतरतो. ज्या स्त्रीपुरुषाच्या हाती मला सोपवलं जातं,त्याच्याबरोबर जातो. अगोदरच निवडणुकीची ड्यूटी लागल्यानं शिक्षक,सरकारी कर्मचारी वैतागलेले असतात.त्यामुळे निवडणूक आयोग,राजकारणी,वरिष्ठ सरकारी अधिकारी, कुटुंबीय या साऱ्याचा राग काही जण मला जमिनीवर अथवा टेबलावर आपटून काढतात.पण मी कधीही हू की चू करीत नाही.
   मी manage होणारा असल्याचा जावईशोध सर्वप्रथमरीत सोमय्या यांनी लावला. २००९ मध्ये भाजपचा पराभव झाल्यावर त्यांनी परराज्यातील तज्ञ बोलवून माझ्यावरील कमळाचे चिन्ह दाबले, तरी मत हाताला जाते, दाखवण्याचा प्रयत्न केला.आता हि किमया माणसाची की यंत्र असलेल्या माझी?आता तोच जावईशोध भाजपाच्या अंगलट आला आणि हात दाखवून अवलक्षण करण्याची वेळ आली आहे.सोमैयांसारख्या नेत्यांनी तज्ञांची फौज कमी लावून आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून घाऊक पद्धतीने उत्तर प्रदेशात  ३२५ ची मजल मारली आणि त्याची रंगीत तालीम मुंबईत केली,अशी कुजबुज अस्मान पाहिलेली मांडली करताहेत.
   आता गंमत बघा हि किमया माणसाची; पण माणसाविरुद्ध थेट पुरावा नसल्यानं सर्रास बदनामी माझी. तो नतद्रष्ट मिडिया तर काय साऱ्यांच्याच मागे हात धुऊन लागलेला असतो.देशविदेशांतील हजारभर पत्रकार उत्तरप्रदेशात फिरत होते. त्यांना कुठेही भाजपाची लाटली नसताना ती उसळीच कशी? एकही एक्झिट पोलमध्ये भाजपाचे हे महाधवल यश प्रतिबिंबित झाले नसताना हे घडलेच कसे? अशा शंकाकुशंका उपस्थित करणाऱ्या मिडियाने आरोपांकरिता अंगुलीनिर्देश केला तो माझ्याकडेच. माझ्यात मते नोंदवण्याची पद्धती सदोष असल्याने युरोप-अमेरिकेतही मतपेटीत मते टाकण्याची पद्धत अवलंबली जाते,असा डांगोरा पिटून त्या सटवी मतपेटीच्या नशिबी भाग्योदय लिहिण्याचे कपट-कारस्थान मिडिया आणि पडेल उमेदवार व पक्षांनी सुरु केलय.त्या मतपेटीचा वनवास संपून तो आपल्या नशिबी यायला नको,याकरिता निवडणूक आयोगापासून अनेकांना manage करायलाच हवे चला,लागू या कामाला..... 
कुठे हरवली आहे संवेदनशीलता?
     नमस्कार मंडळी गुन्हेगारी जगतातील काही विशेष घडामोडी.  'सातारा जिल्ह्यातील मुळगाव येथील एका दलित स्त्रीची विवस्त्र धिंड काढण्यात आली.' तिने काय केले? तर तिचा गुन्हा काहीच नाही.तिच्या मुलाने आंतरजातीय विवाह केला होता.
     '१६ डिसेंबर रोजी तालीबाल्यांनी पेशावरजवळील पाक लष्करी शाळेवर हल्ला करून १३२ मुले व काही शिक्षकांची निर्घुण हत्या केली.'
     'मुलगा व्हावा म्हणून नगरमधील एका सुशिक्षित इसमाने आपल्या तिन्ही मुलींना जिवंत गाडले.' 
     'सिद्धी प्राप्त होण्यासाठी नांदेडमधील एका नराधमाने एका कोवळ्या जीवाचे तुकडे करून किडनी भाजून खाल्ली.'
     मद्रासजवळील एका शाळेत घडलेली मन सुन्न करणारी घटना पुढीलप्रमाणे-
      मंडळी या सगळ्या बातम्या ऐकून एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल की माझा विषय काय? 
    'कसलं लेका माणूस तुम्ही, अजून सुदिक पेटला असता, 
              अजून तुम्ही धुपत नाय.'
होय  मंडळी हे मी तुम्हालाच म्हटलं आहे कारण कारण आपल्यातील संवेदनशीलता हरवली आहे आणि म्हणूनच मी विषय निवडला आहे 'कुठे हरवली आहे संवेदनशीलता?' 
संवेदनशीलता म्हणजे काय? यापूर्वी संवेदना म्हणजे काय? हे पाहणं महत्वाचं आहे. संवेदना म्हणजे सहवेदना. तुमच्या दु:खात,वेदनेत मी समरस आहे म्हणजे संवेदना आणि एखाद्याची वेदना पाहून मलाही वेदना होते त्याला म्हणतात संवेदनशीलता.
   माणूस हा मुळातच संवेदनशील प्राणी आहे.मग हि संवेदना प्राप्त कशी होते?आपली संस्कृती फार मोठी आहे.
     'अतिथी देवो भव', 'प्राणीमात्रांवर दया करा', 
     'स्त्रियांचा आदर करा', 'गोर-गरिबांना मदत करा.'  
असे ती सांगते.या सर्व ठिकाणी करणे म्हणजे माणुसकीचा धर्म पाळणे. माणुसकीचा जो धर्म जो पाळतो तोच खरा संवेदनशील. मनुष्य हा उद्योगशील प्राणी होय. पूर्वीच्या काळी मानवी गरजा कमी होत्या तो संतुष्ट होता. आता मानवी गरजा वाढल्या आहेत. स्पर्धा, धावपळ वाढली आहे. माणूसकी कोपऱ्यात जाऊन पडली आहे, अनितीचा प्रवास सुरु झाला आहे. चांगले डोळे, कान असताना मन मात्र मृगजळाच्या मागे धावत आहे. मी, माझं, माझ्यासाठी यामुळे स्वार्थी प्रवृत्ती बळावत आहे. चूक बरोबर या पलीकडे मानवी वृत्ती पोहचते आणि संवेदनशीलता हरवून बसते.
     लोकशाहीर संभाजी भगत म्हणतात, 'माणूस मारतो म्हणजे नेमकं काय होतं? तर तो चेतनाहीन होतो पण अविरत चेतना वागवत हिंडणारे, फिरणारे खाणारे, पिणारे सर्वच लोक खरचं जिवंत असतात का? खरं सांगायचं तर तस नसतं.वरवर जिवंत असणारे आपण खर तर मेलेलो असतो. फक्त आपल्यावर अंतिमसंस्कार झालेले नसतात.पहिला मरतो विचार,मगरते विचारधारा आणि नंतर मरते संवेदना आणि मग अस्तित्वात येतं संवेदनहीन जग. जे खर तर एका स्मशानभूमिसारखेचं असते.
      खरचं आपल्या देशाची स्तिथी आज स्मशानभूमिसारखीच झाली आहे.आपल्या रोजच्या जगण्यात आपण अशा अनेक गोष्टी, उदाहरणे पाहत असतो, ऐकत असतो, कुठेतरी बॉम्बहल्ला किंवा अतिरेकी हल्ला झाला की आपण फक्त चर्चा करतो, निषेध नोंदवतो. एखाद्या मुलीवर अत्याचार झाले तर आपल्यावर अशी वेळ आली नाही म्हणून धन्यता मानतो. अपघाताच्या ठिकाणीपण बघ्याची भूमिका घेतो. 
                'पावसानं झोडपलं अन 
          दाद्ल्यानं मारलं तर दाद कुठे मागणार?'
जगाच्या संस्कृतीत माता  म्हणून मिरवणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्री सुरक्षित आहे का? लाज या शब्दाला लाज वाटेल इतके भयानक अत्याचार, अन्याय अगदी जन्माला न आलेल्या स्त्री गर्भापासून ते ६०-७० वर्षाच्या वृद्धेवर होत आहे. पहिली बेटी धनाची पेटी संकल्पना बदलत आहे. सामुहिक बलात्काराची घटना कानावर पडली की 'परक्या स्त्रीला माता मानून तिची ओटी भरणारे शिवराय कुठे आणि स्त्रीला उपभोगाची वस्तू समजणारे हे नराधम कुठे?
    घरंदाजी श्रीमंती असणार्या डॉक्टर बाबा आमटे यांनी कुष्टरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवला हि असते संवेदनशीलता अन वृद्ध मातापित्यांना वाऱ्यावर सोडणारी मुले पहिली की वाटत कुठे हरवली आहे संवेदनशीलता?१०० कोटी केवळ प्रजासत्ताक दिनावर खर्च करणारे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीबाबत उदासीन दिसते. वर्ष उलटून गेले तरी माळीण गावची लोक बेघर असताना आपले मंत्री बंगल्याच्या नूतनीकरनावर खर्च करत आहेत.अनाथ  मुलांना न्याय देता यावा म्हणून स्वत:च्या मुलीला दगडूबाई त्रस्ट कडे आपली मुलगी सोपवणाऱ्या सिंधुताई सपकाळ कुठे अन मुलगी जन्माला आली म्हणून तिचा गळा घोटणारे आई वडील कुठे? दुर्गम भागात लोकांच्या आरोग्यासाठी कार्य करणारे डॉ. अभय बंग , राणी बंग कुठे आणि रुग्णांच्या किडन्या विकणारे डॉक्टर कुठे? माणुसकी जपणारी हजारो नावे आहेत. मेधा पाटकर, डॉ.सत्यार्थी, कै.कॉम्रेड पानसरे, मलाला युसुफजाई, मुंबईचे संदीप परब आणखीही बरीच नावे आहेत.आपण त्यांना पुरस्कार मिळालेल्या वाजवतो,खुश होतो. बस्स एवढाच आहे की आपला सहभाग? आपले समाजासाठी काहीच उत्तरदायित्व नाही का? 
    योग्य ठिकाण योग्य प्रकारे योग्य साधनांचा वापर केला तर आपण समाजात बरेच बदल घडवू शकतो. त्यासाठी हवी कठोर मानसिकता अन जोडीला स्वत:चा बुलंद आत्मविश्वास मग बघा बदल निश्चितच आहे. एखाद्या ठिकाणी चुकीची गोष्ट घडत असेल तर अरे ला कारे केलचं पाहिजे. मी असं म्हणणार नाही की तुम्ही तुमचं जेवणाचं ताटचं समोरच्याला द्या परंतु आपण दोन घास नक्की देऊ शकतो. एखाद्या ठिकाणी खरचं मदत हवी असेल तर माघार घेऊ नका नाहीतर तशा अडचणीत तुम्ही असताना लोक मागे फिरले तर त्यांच्या नावाने बोटे मोडू नका. 
     कोणाच्या तरी वासनेला बळी पडलेल्या अनाथ मुलांना कधीतरी दोन रुपयांचा खाऊ देऊन पहा अन बघा ते कसं खुदकन हसेल. बस हे दोन क्षण त्याला आणि तुम्हाला आनंद देऊन जातात. हे जीवन सुंदर आहे.त्याला अनीती, भ्रष्टाचार, स्वैराचार, व्यभिचार, पापकर्म यांची नजर लागू नये माणुसकी, संवेदनशीलता ,ममता, कारुण्य, वात्सल्य, आनंदी विचार यांचे तीट लावूया कारण आयुष्य फार सुंदर आहे ते जपा........

 शिवबा तुम्ही पुन्हा जन्माला या !


      शिवबा तुम्ही पुन्हा जन्माला या !

    'धर्म रक्षणार्थ परमेश्वर' खरोखर अवतरतो की नाही माहित 
नाही. पण जेव्हा जमाजात अराजकता माजते, अन्यायाच पारड जड होतं तेव्हा महापुरुषांनी तारल आहे, मार्गदर्शन केल आहे. एक दिशा दिली आहे.
   छत्रपती शिवाजी महाराज असेच एक महापुरुष होते. त्यांनी   

मुगलांच्या, परकियांच्या जुलमानं गलितगात्र झालेल्या महाराष्ट्रात 

चैतन्य निर्माण केले. अन्यायाचा प्रतिकार करण्याची समाजाला 

ताकद दिली. म्हणूनच त्याकाळी स्वराज्यासाठी मृत्यूलाही 

कवटाळणारे वीर योध्दे जन्माला आले ज्यांनी स्वराज्याचा पाया 

रचला.

वारसा हक्काने राजे बनलेले अनेक होवून गेले. शिवबा वारसा 

हक्काने राजे बनले नव्हते. त्यांनी राज्य निर्माण केले. ते राज्य 

संस्थापक होते. राज्य निर्माण करणे सोपे नव्हते व नसते. आज 

शिवबांच्या या हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी लढले.

त्या हिंदवी स्वराज्यातील स्वातंत्र्यातील राजकारण शिक्षण व समाजजीवन भ्रष्टाचारान लडबडून गेलं आहे. आज संजय दत्त सारखे तरुण आमच्या तरुणांचे हिरो आहेत. समाजाला योग्य मार्गदर्शन करणारे जहाल नेते आज नाहीत आजची तरुण पिढी राजकारणी यांना नित्तीमत्ता म्हणजे काय? हे माहित नाही. म्हणूनच रोज पेपरमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार, महिलांची छेडछाड अशी वृत्ते वाचावयास मिळतात.

आज पुन्हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेऊन परत 

या पावन भूमीवर यावे, असे वाटते. असे वाटण्याचे एक नाही 
अनेक कारणे आहे.
शिवाजी महाराजांनी माणसांची कुवत, क्षमता पाहिली व त्याप्रमाणे त्यांची योग्य ठिकाणी नेमणूक केली. नात्यागोत्याचा विचार केला नाही आज आपण काय पाहतो. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नात्याशिवाय दुसरा माणूस तुम्हाला दिसणार नाही. स्वत:च्या माणसांची वर्णी लावण्यासाठी वाटेल त्या थराला जाणारी जाणारी भ्रष्ट नेतेमंडळी पाहिल्यावर जीवाची तगमग अधिकच वाढते काय होणार आपल्या देशाचे? जिकडे तिकडे भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनाचार वाढला आहे.नित्तीमत्ता लयाला गेली आहे. भ्रष्टाचार नाही असा एक तरी विभाग आहे का?ज्याने संसदेवर हल्ला केला. त्याला न्यायालय शिक्षा देते पण अंमलबजावणी करायला नेते मंडळीना सवड नाही. कशासाठी पुन्हा आपले सैनिक प्राण धोक्यात घालून रक्षण करतील.
  
    'रामजी खोडे' नावाचा माणूस त्याचा मुलीवर रांजणगावच्या 
पाटलाने बलात्कार केला. महाराजांनी ताबडतोब त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. ताबडतोब अंमलबजावणी झाली. चोख न्यायव्यवस्था ठेवली. आज गुन्हेगार गुन्हा करतो. लगेच त्याला जामीन मिळतो. शिक्षा तर दूरच. पकडण्याआधीचा गुन्हेगार पकडला गेला तर लगेच आजारी पडतो. जेलच्या ऐवजी दवाखान्यात भरती होतो. हे सर्वच राजकीय पक्षांना सोईचे असल्याने सोयीस्करपणे याकडे दुर्लक्ष करतात. हजारो कोटींचा चारा खाल्ला तोही मुक्या जनावरांचा पण लालू मोकळे आहेत. पदाचा गैरवापर केला जातो आहे तो राठोड आज वृत्तवाहिन्या त्याच्यावर तोंडसुख घेत आहेत. पण त्याला फक्त सहा महिन्यांची शिक्षा होते. त्याला पाठीशी कोणी घातले एवढे धाडस त्याचे कसे होते. कायद्याची भीती कुणालाच नाही. अन्न पाण्याची समस्या राक्षसासारखी असताना. महागाईचा आगडोंब भडकत असताना सरकार काय करते तर त्याच धान्यापासून दारू बनवण्याचा निर्णय घेते. प्रत्येक राजकीय पक्ष स्वत:ची भाकरी भाजून घेत आहे. निवडणुकीत स्वत;च्या नातेवाईकांनी तिकीट मिळते. अण्णा हजारे सारख्या समाजसेवकांना माझ जीवे मारण्याची सुपारी दिली जाते. एवढी लोकसंख्या पण ऑलंपिक मध्ये सुवर्णपदकाचा दुष्काळ. खेळाडूपेक्षा अधिकारी अधिक जनतेच्या पैशावर परदेश वापर केला जातात. अभ्यास दौरे काढतात. पण कशाचा अभ्यास करतात? व त्याचा फायदा जनतेला किती होतो हे कुणालाही कधी कळले नाही. सर्वच क्षेत्रात गुन्हेगारी बोकाळली आहे. गुन्हेगार संसदेत बसत आहेत. ज्यांची जागा तुरुंगात ते संसदेसारख्या पवित्र ठिकाणी बसत आहेत.

शिवाजी महाराजांचे वर्तन एवढे चांगले होते की शत्रूलाही त्यांच्या 

वर्तनाबद्दल कधीच शंका वाटली नाही. असाच एक वेगळा प्रसंग 

सांगितला जातो.

लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शयीस्तेखानावर शिवाजी 
रजनी हल्ला चढवून त्याची चार बोटे छाटली त्या वेळच्या गोंधळात औरंगजेबाच्या बहिणीची मुलगी बेपत्ता झाली.
औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले त्यावेळी औरंगजेबाची ही  
बहिण पुन्हा पुन्हा औरंगजेबाला कळवते की तुझ्या भाचीला 
शिवाजी राजांनी पळवून नेले आहे. तो तुझ्या ताब्यात असल्यामुळे त्याला तू ठार कर. यावर औरंगजेब म्हणतो 'शिवाजी राजा दुसरे काहीही करेल पण परस्त्रीच्या अब्रूला हात लावणार नाही.' शत्रूलाही शिवाजी राजांबद्दल केवढा आत्मविश्वास होतं हे लक्षात घेतले पाहिजे.  
       हिंदवी स्वराज्य म्हणजे सर्वसामान्य माणसाचे (रयतेचे) 

राज्य होते. या हिंदवी स्वराज्यात धर्मावरून वा जातीवरून भेदभाव 

मानला जात नव्हता. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात 

असलेल्या एकही मशिदीला कधीच हात लागलेला नाही. त्यात 
कधीही कुराणाचा अपमान झाला नाही. स्वारीच्या वेळी जर एखादी कुरणाची प्रत हाती लागली तर ती मुस्लिमांच्या धर्मगुरूंकडे सन्मानपूर्वक शिवाजी महाराज पाठवत असत. एवढेच काय? तर मुस्लिमांचे धर्मगुरू बाबा याकुद यांच्या दर्शनासाठी शिवाजी महाराज अनेकदा जात असत. त्यांच्या सैन्यांमध्ये असेक मुस्लिमही होते. एवढेच काय पण निरपराध मुस्लिमांच्या कत्तली शिवाजी महाराजांच्या राज्यात कधीही घडल्या नाहीत. स्वत: औरंगजेबाने लिहून ठेवले आहे. "शिवाजी शत्रूच्याही धर्माचा मान राखतो."
ते सतरावे शतक होते आणि तरीही तक्क्याच्या विहिरीवर पाचाड 
गावातील दलित आया - बहिणी कमरेवर डोक्यावर घागरी घेऊन 
पाणी भरायला येत होत्या. त्यांच्याशी राजे सुखदुःखाच्या गोष्ठी 

करीत होते. हिंदवी स्वराज्य सर्वाना आपलेसे का वाटते? शिवाजी 

राजांच्या अशा आचरणातून आपण आज काय शिकायला हवे?

सर्वच क्षेत्रात नित्तीमत्ता लयाला गेली आहे. जात आहे सामान्य 

माणूस हवालदिल झाला आहे. या सर्वांतून मुक्त होण्यासाठीतो 

सामान्य माणूस कधीतरी अवतार घेईल व यातून मुक्त करेल. 

म्हणून वेडी आशा बाळगून आहे. पण कोणीतरी कशाला राजे 

आपल्याशिवाय दुसरे कोण असू शकेल? म्हणून मी आपला धावा 

करतो. आपण पुन्हा जन्म घ्या. आपण जे भूतकाळात म्हणून 

म्हणतो आपण पुन्हा जन्माला यावे व या पवित्र भूमीला 
लाचारीतून, भ्रष्टाचारातून, गुन्हेगारीतून मुक्त करा.
'शिवबा पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या.' 



महागाईचा भस्मासुर 


"दारिद्रयाची लेवून बसने,

कशी पहावी सुंदर स्वप्ने?

महागाईचा राक्षस करतो,

आयुष्याची उजाड राणे ||"

'अहो मला थोडे पैसे पाहिजेत.'

'अग परवाच दिले ना तुला'

संपले केव्हाच ते. महागाई किती ते पाहताय ना?' 

असे संवाद घरोघरी ऐकू येतात. मध्यमवर्गीय जनता, कामगार वर्ग 

महागाईने ग्रस्त झाले आहे.

  आई बाबा, आजी आजोबा यांच्या काळचे एकेक दर ऐकून अख्ख 

बोटच काय हात तोंडात घालायची वेळ येते. आजी म्हणते. 'दोन 

रुपयात टोप पदरी लुगड, दोन पैशात शेरभर दुध येत होत.' आई 

म्हणते, 'महागात महाग पाचवारी पातळ मी तेरा रुपयाला आणले 

होते.' या पातळाच्या किमतीत आज कमीत कमी ब्लाऊजची 

शिलाई झालीय. आज 'आणा' गेला पैसे आले, पण कितीही पैसे 

असले तरी हे 'आणा', ते 'आणा' संपत नाही. आजची हि राक्षसी 

महागाई पाहिल्यावर असे वाटते की भविष्यकाळात वस्तू पाहायला 

सुद्धा पैसे पडतील की काय?

    अनेक अत्याधुनिक तंत्राचा विकास झाल्यानेही महागाई आपले 

हातपाय पसरत आहे. पूर्वी फळे, भाज्या दुध, मांस, मासे 

यासारख्यानाशवंत वस्तू फुकट जाण्याच्या भीतीने येतील त्या 

भावांस विकल्या जात. त्यामुळे मोसमाप्रमाणे आंबा, संत्री, द्राक्षे, 

पालेभाज्या मुबलक खायला मिळत असत. आता शीतगृहे, फ्रीज व 

वस्तू टिकवण्याची कॅनिंगसारखी अनेक तंत्रे, निरनिराळी सरबते, 

सॉस किंवा केचप तयार करण्याचे कारखाने निघाल्यामुळे हि 

नाशवंत उत्पादने घाऊक प्रमाणात कारखानदारांना विकली जातात. 

त्यामुळे त्यांचे भरपूर पीक आले तरी किमती खाली येत नाहीत.

    कापडगिरण्यांचा प्रश्नही अवघड होत चालला आहे. कृत्रिम व 

रेशमी धाग्यांना जास्त मागणी असल्यामुळे सुती कापडाचा खप 

कमी झाला आहे. त्यामुळे उत्तम प्रकारचे सुती कापड महागले आहे. 

याखेरीज गिरण्यांमध्ये संप, टाळेबंदी इत्यादींमुळे उत्पादनात 

सातत्य राहत नाही. परिणामी कापड स्वस्त मिळणे असे शक्य 

आहे?

   घरांबद्दल तर काय लिहावे? वाडे पाडून ओनार्शिप्चे फ्लॅट होत 

आहेत. स्वत:चे घरकुल असावे हे स्वप्न पाहणाऱ्या व साकार करू 

पाहणाऱ्या मध्यमवर्गीयाला कर्जाचा बोजा पाठीवर टाकूनच पाहुल 

पुढे टाकावे लागते.

    हि महागाई बऱ्याचदा प्रासंगिक कारणांमुळे निर्माण होते. कधी 

दुष्काळ तर कधी गिरण्यांची टाळेबंदी, संप, मोर्चे यांमुळे अनेकदा 

साठेबाज कृत्रिम टंचाई निर्माण करतात. साखर, तांदूळ, रॉकेल 

दडवून ठेवतात आणि मग लोक वाटेल ती किंमत देऊन त्या 

महागड्या वस्तू जीवनावश्यक असल्याने काळ्या बाजारातून खरेदी 

करतात.

    असा हा महागाईचा भस्मासुर प्रत्येकाला भेडसावतोय! अथांग 

महासागरातल्या माणसाने जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने 

हातपाय मारावेत तसे या महागाईतून बचावण्यासाठी प्रत्येकजण 

धडपड करतोय. कोणी दोन नोकऱ्या करतात. कोणी जोडधंदे 

काढतात तर कोणी ह्या महागाईला तोंड देण्यासाठी वाममार्गाचाही 

अवलंब करतात.

       या महागाईला आपण सुद्धा जबाबदार आहोत. 

आपली कुटुंबे मर्यादित नाहीत. गरजा अमर्याद आहेत. पाय नेहमी 

अंथरूणाच्या बाहेर काढायची वाईट सवय लागलीय आपल्याला 

भौतिक सुखांची यादी वाढत आहे. ती सुखे मिळावीत म्हणून 

नितीलाच वेठीला धरलं गेलाय. रुपयाच्या अवमुल्यनामुळे माणसाचे 

माणूसपण महाग झाले. फक्त पैसा आणि पैसा मिळवणे हाच 

सुखाचा मंत्र प्रत्येकाला कळायला लागलाय. त्यातूनच 'भ्रष्टाचार' हा 

'सदाचार' बनलाय. पण या महागाईने जीवनमान उंचावले! 

   घराघरात फ्रीज, दूरदर्शनसंच, दूरध्वनी, वाहने, कपडे धुण्याचे 

मशीन आले. महागाईने नको म्हणून ती थोडीच बंद होणार आहे? 

ती अपरिहार्य! ती अटल आहे! म्हणून आपण अधिक सबळ हवे! 

महागाईवर मात करण्यासाठी लोकसंख्यावाढ नियंत्रित व्हावी 

म्हणून कुटुंबकल्याणाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 

   उत्पादनवाढीचे कसीशीचे प्रयत्न चालू आहेत. पण हे प्रयत्न 

दीर्घ मुदतीचे आहेत. यावरचा त्वरित उपाय म्हणजे 'अपना बाझार' 

सारख्या सहकारी संघटना सुरु करणे. ना नफा ना तोटा या 

तत्त्वावर हि सहकार भंडारे चालवली गेल्यामुळे महागाईस थोडा 

बहुत आळा बसू शकेल असे वाटते. 



 पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख ग्यारंटीड असतं!! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही… उप-उप-गंमत अशीये की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि पुरेसाची व्याख्या पुन्हा बदलते! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. आपल्याला आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानानी कमीच मिळतो आहे असं वाटत असतं. आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असं वाटत असतं. आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही, इतरांकडे मात्र टिकतो असं वाटत असतं. आपल्याला बेसिक गरजांनाही पुरत नाही, इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला असतो असं वाटत असतं. आणि हे असं म्हणजे असंच सगळ्या सगळ्यांनाच वाटत असतं! इतरांच्या तूलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गंमतशीर गोष्ट आहे!! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. तो एका दरवाज्यानं येतो आणि हजार खिडक्यांवाटे पसार होतो! आला की खूप छान, भारी, मस्त, बरं वगैरे वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखंही मिळत नाहीत. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आपल्यामुळे मिळणारं सुख मोठं का खर्चल्यामुळे मिळणारं हे ठरवता येत नाही, कारण पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. रेग्युरल, नियमित वगैरे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात, ‘कर्म’ करावं लागतं. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपणं म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका… काय वाट्टेल ते ‘दैव’ किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं… ‘कर्म कमावतं अन दैव हिसकावतं’ ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी!! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात रहात नाही आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा कधीच विसरला जात नाही!! जे उधारीचं तेच मदतीचं, तेच दान-धर्माचं, तेच खर्चाचं वगैरे. आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्या बाबतीत घडतं, कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ज्याच्याकडे नाही त्याला कमवावासा वाटतो. ज्याच्याकडे आहे त्याला अफाट कमावावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट आहे त्यालाही अजून जास्त अफाट कमवावासा वाटतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको असं कोणी म्हणजे कोणी म्हणत नाही. 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे ऑलरेडी खूप पैसा आहे तिथे अजून अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कल्टी मारत रहातो. 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर', आपण निघून जातो, पैसा इथेच रहातो!! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे! 

1 comment: