Sunday, 3 June 2018

पोराला थोडं रडू द्या

 *पोराला थोडं रडू द्या...!!*

काल पेपर वाचतांना खूप
छोट्याशा अशा एका बातमीनं
माझं लक्ष वेधलं...

बातमी होती हिंगोली मधून...
वडीलांनी १० वीची पुस्तकं
आणण्यास उशीर केला, म्हणून
एका १० वी च्या मुलानं रागाच्या
भरांत गळफास घेऊन आत्महत्या
केली...

छोटीच बातमी पण मनांला
चटका लावणारी...

आपल्या वाचनांत रोज अशा
बातम्या येत असतात, त्या
आपण वाचतो व सोडून देतो...

पण, आपण कोणीही खोलांत
जाऊन विचार करत नाहीत,
की असं कां..?

आपण थोडसं मागं म्हणजे
१९८० च्या आसपास किंवा
त्या दरम्यान... म्हणजे आता
जे लोक वय वर्ष ४५ च्या
आसपास आहेत, ते शाळेमध्ये
जातांना खाकी चड्डी व पांढरा
शर्ट शाळेचा गणवेश असायचा,
तो आपल्याला मिळायचा नाही,
आपल्या मोठ्या भावाचा आणि
मुलींना मोठ्या बहिणीचा
वापरावा लागत होता आणि
त्यालाच नीटनिटके करून
आपल्याला ते वापरावे लागत
होते. तशीच अवस्था आपल्या
पुस्तकांची होती, पुढच्या
वर्गातील मुलांची जुनी पुस्तकं
अर्ध्या किमतीत घ्यायची
आणि ती परत कव्हर लावून
फाटलेली पुस्तकं वर्षभर
काळजीपूर्वक वापरायची
आणि परत विकायची.

आताच्या मुलांना ठिगळ हा
शब्दच आठवत नाही आणि
त्यांना ते कांय असतं, तेही
माहित नाही. ते सरळ
आपल्यालाच विचारतील,
ते कांय असतं. आपल्या वेळेस
घरची परिस्थिती खूपच
हलाखीची असल्यानं वर्गातील
अनेकांच्या चड्डीवर ठिगळं
दिसायची...

साधारण १९९५ नंतर जसं
आर्थिक स्वायत्ततेचं वारं
आणि अनेकांच्या हातात थोडा
फार पैसा यायला लागला, तसे
अनेक प्रश्न निर्माण होत गेले...

👉​​आई सुद्धा जन्मलेल्या
मुलाला रडल्याशिवाय दूध
पाजत नाही... पण आज
आपण समाजमध्ये पाहतोय,
की बऱ्याच गरज नसलेल्या
गोष्टी मुलांच्या हातात येत
आहेत. लहानपणापासूनच
आपण पालक म्हणून मुलांना
गरज नसतांना सुद्धा उलट्या
होईपर्यंत देतो...

आज लहान मुलांच्या हातात
अनेक गॅजेट्स आले आहेत,
व्हाट्सअप, फेसबुक, इंटरनेट,
केबल टीव्ही आणि इतर अनेक
त्यामुळे त्यावरील बऱ्याच
गोष्टीमुळे मुले जास्त आभासी
दुनियेत वावरतात... पालक
म्हणून आपण त्याला कशालाच
नाही म्हणत नाहीत...

👉​​आज आपल्या देशात लेकरू
पहिलीला आल्या पासून त्याला
आपण अपंग करतोय, असं माझं
वैयक्तिक मत आहे. त्याला पुस्तकं
फुकट, वह्या फुकट, पाटी फुकट,
दुपारी मस्तपैकी पोषण आहार,
दप्तर फुकट आणि शिवाय
त्याला नापास करायचं नाही...

कशाला अभ्यास करतंय ते
मग...त्याला जर सगळंच
विनाकष्टाचे मिळत असेल, तर
पुढं कांय होईल...???

एक ऐत खाऊ पिढी तयार होईल.
आज आपण विध्यार्थ्यांना उलट्या
होईपर्यंत देत आहोत, त्याला
त्याची काहीच गरज नाही..

👉​​शाळेत मिळणाऱ्या फुकट
पुस्तकाची किमतसुद्धा आज
पालकांना माहित नाही, हे खूप
मोठं दुर्दैव म्हणावं लागेल...

आज बऱ्याच शाळांमधून
प्राथमिक स्तरावरील
विध्यार्थ्यांना इंटरनेटचं शिक्षण
दिलं जातं...

वास्तविक पाहता एकदम
चुकीची पद्धत आहे ती...
आणि काय शिकवावं आणि
कुठं शिकवावं हे पैसा जास्त
झाल्यामुळे पालकांना कळत
ठिक नाही...

👉​​आज मुलांना मैदानी खेळ
नको वाटतात, त्यामुळं त्याचा
आपल्या वयोगटातील मुलामध्ये
मिसळण्याची सवयच नाही
राहिली. घरी कोणी वडीलधारी
मंडळी आली, तर कसं वागावं,
याचं सामाजिक भान पण आज
 लोप पावत चाललं आहे...

सगळंच आयतं आणि विनाकष्ट
मिळत असल्यानं आजच्या
पिढीला नाही ऐकायची, सवयच
नाही राहिली, ना परिस्थितीची
जाण ना कशाची भीती...

मुलांच्या तोंडातून एकदा शब्द
बाहेर पडेपर्यंत ती वस्तू त्याच्या
समोर हजर...

आणि ज्या वेळेस ही मूलं वयांत
येतात... त्यावेळी आपल्या
हातातून सर्व परिस्थिती बाहेर
गेलेली असते, एकादी गोष्ट नाही
मिळाली, तर ही मुलं त्यामुळे
खूप टोकाची पावलं उचलतात.
 नाही ऐकण्याची सवय
 नसल्यामुळं ती खूप आक्रमक
झालेली असतात...

👉​​लाड करावेत, पण तेही
नियंत्रणात...आज मुलाच्या
बाबतीत प्रत्येक पालक नको
तितका जागरूक झाला
आहे, पालकांच्या भल्या मोठ्या
अपेक्षा वाढलेल्या आहेत, कांय
करावं आणि कांय नाही, तेही
आज समजण्याच्या पलीकडे
गेलं आहे...

🙏​​कष्टाला दुसरा कोणताही
शॉर्टकट नाही, हे त्या मुलांना
बालपणी पासूनच मनावर
ठिक बिबविण्याची गरज आहे...
तरच ही बालकं टिकतील...
म्हणून  मुलांना थोडं रडू
द्या...थोडं रडू द्या...!!🙏🏻़
[30/05, 6:08 am] Tai: पहाटेच जाग आली कुणीतरी टकटक करीत होते.

दार उघडून बघितले बाहेर तर कुणीच उभे नव्हते..

आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीच्या गजावर दिसला एक पक्षी.



चोचीने टकटक करीत तावदानावर उमटवीत होता नक्षी.

का रे बाबा? विचारले तर म्हणाला भाड्याने मिळेल का एखादे झाड घरटे बांधण्यासाठी.

एकटा कुठेही कसाही राहिलो असतो पण जागा हवी होणाऱ्या पिल्लांसाठी.



तुमच्या भाऊबंदांनी लुटले आमचे रान केले निर्वासित.

बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी असतो आता फिरस्तित.

वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे अन पाणी.

पण निवाऱ्याचे काय? हे लक्षात घेतच नाही कुणी.

पोटाला हवेच खातो ती भिक अन नेतो थोडे घरी.

खायला तर हवच जरी डोक्यावर छप्पर नसले तरी.

कधीकधी वाटते आत्महत्या करावी बसुन विजेच्या तारेवर.

किंवा द्यावा जीव लोटून उंच उंच त्या मोबाईल टाॅवरवर.



जसे मग आत्महत्या नंतर सरकार काही देते शेतकऱ्यांला.

तसेच मिळेल एखाद झाड माझ्या पिल्लांना तरी आसऱ्याला.

ऐकून मी चक्रावले खरच एवढा विचार मी नव्हता केला.

जंगलतोडीत त्यांच्या घरांचा विचार कुठेच नाही झाला.

मी हात जोडून म्हटले त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते.

पण आत्महत्या करू नको खरच मनापासुन सांगते.

तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर बांध वनरुम किचन खोपा.

अडचण होईल पण आतातरी एवढाच उपाय आहे सोपा.

तो म्हणाला खुप उपकार होतील पण भाडे कसे देणार.

मी म्हटले रोज सकाळ संध्याकाळ मंजुळ गाणी ऐकव बाकी काही नाही मागणार.

तो म्हणाला मला तुम्ही भेटलात पण बाकी नातलगांच काय

त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी कुठे ठेवतील पाय.

अरे लावताहेत आता झाडे अन जगवतात



आता कुणी कुणी बदलतेय चित्र पण त्यांना सांग आत्महत्या करू नका कुणी

ऐकुन तो पक्षी उडाला काड्या जमवायला घरट्यासाठी.

अन मी पण घरात आले तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी.

त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड.

वाचुन तुम्ही पण लावाल ना कुंडीत वा अंगणात एकतरी झाड.... निदान एक तरी झाड...

No comments:

Post a Comment