कडू डोस 14
कुणावाचून कुणाचे अडत नाही
'जो चोच देतो ,तो दाणे पण देतो.' अशी एक म्हण आहे.ही म्हण ज्याने सर्वात अगोदर म्हटली असेल त्याला शतशः प्रणाम.
म्हणी तयार होतात त्या खूप निरीक्षण करून होत असतात.आणि ही सुद्धा म्हण निर्मात्याने निरीक्षण करूनच लिहिली किंवा बोलली असेल.
आता बघा ना .लहान लहान पशु पक्षी असतात.त्यांना सुद्धा निर्माता जगवतोच ना.इतकेसे जीव किती किती मोठा प्रवास करून आपले पोट भरतात. कुठे ना कुठे तरी त्याच्या पोटाची व्यवस्था केलेलीच असते.जर कोणी आणून दिले तर चांगलेच पण नसेलच कोणी आणून दिले तर ते स्वतःचे पोट भरण्यासाठी वणवण भटकतात, आणि आपले अन्न मिळवतात.
मानवजातीचे पण तसेच नाही का,सुरुवातीचे दिवस त्याचे आईवडील नातेवाईक त्याच्यासाठी खूप काही करतात.त्याला चालायला शिकवतात.जगायला शिकवतात.समाजात कसे वावरायचे हे शिकवतात, समाजाची बरोबरी करण्याची ताकद देतात. समाजातील तो एक प्रतिष्ठित नागरिक होतो. मग तो इतरांना शिकवायला लागतो.हे रहाट असेच चालू असते.कधी कधी त्याच्या डोक्यात हवा जाते, आणि 'मी आज जो काही आहे तो स्वतःच्या ताकदीवर आहे,मला कोणीही मदत केली नाही, मी माझे विश्व स्वतः तयार केले, अशा वलग्ना करतो.आई बाप आणि त्याला घडवणारा समाज याना विसरतो.स्वतःसाठी जगतो.
या जगात प्रत्येकासाठी घर, अन्न विधात्याने बनवून ठेवले आहे. फक्त ते त्याला त्याचे शोधावे लागते.काहींना चटकन मिळते काहींना खूप मेहनत करूनही मिळत नाही. शेवटी त्याचा अंत होतो पण त्यांच्यासाठीचे घर त्याला।मिळत नाही.
त्याचे प्रयत्न अपुरे पडतात. कधीकधी साथ देणारे अर्धवट रस्त्यात सोडून जातात.
पण तो धीराचा असला तर स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढतो.इतरांवर अवलंबून राहत नाही.
जो इतरांवर अवलंबून असतो त्याचे काही खरे नसते.तुम्हाला काही मिळवायचे असेल तर स्व कर्तृत्व अतिशय महत्वाचे. सोबत करणारे शेवटपर्यंत साथ देतीलच असे नाही.एखादे कार्य करण्यास ते सोबत येतील पण शेवटपर्यंत टिकतीलच असे नाही.ते तुम्हाला मध्यावर सोडून जातील.त्यावेळेस तुमच्यात धमक असली पाहिजे.घेतलेले कार्य शिद्दीस नेण्याची जिद्द पाहिजे. तुम्ही कोणाच्या भरवश्यावर एखादे कार्य हाती घ्याल तर तुमचे काही खरे नाही.ते तुम्हाला कार्य पूर्ण होण्याआधीच सोडून जाऊ शकतात. किंवा तुमच्या कार्यात अडथळे सुद्धा आणू शकतात.
तुमच्या सोबत असणारे कधी कधी तुमच्या पासून अलगद दूर जाऊन तुमची गम्मत पाहू शकतात. तुमच्यावर कोट्या करू शकतात.तुमची कशी फजिती होते हे दूरवरून बघू शकतात.पण तुम्ही धीराचे असाल तर त्यांच्यावर मात करू शकता.त्यांचे दात त्यांच्याच घश्यात घालू शकता.
तुम्हाला ध्येय साधण्यासाठी एखाद्या प्रवासाला जावे लागते.तो प्रवास असाध्य असतो पण अश्यक्य नसतो.तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही तो शक्य करू शकता.पण कधी कधी सोबत असलेले ,आणि ज्यांच्यावर तुमचा भरोसा आहे तेच तुम्हाला संकटात टाकून मागे फिरतात.आणि तुमचे हसू कसे होईल याची योजना आखतात.पण तुमचा प्रवास प्रामाणिक असेल तर तुम्हाला वाटेत नवीन साथीदार भेटतात ते तुम्हाला हवी ती मदत करतात. तुमच्या अगोदरच्या सोबत्यांपेक्षा जास्त जीव लावतात.हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते.फक्त जिद्दीने जगता आले पाहिजे.कारण जो चोच देतो तो दाणे पण देतो.
कुठलेही कार्य हातात घेण्या अगोदर तुम्ही ते पूर्ण करू शकत असाल तरच हातात घ्या.दुसऱ्याच्या भरवश्यावर कधीही घेऊ नका.
समजा एखाद्या ठिकाणी काही वाद होत असेल ,आणि तुमच्या सोबत चार साथी असतील.तर त्यांच्या भरवश्यावर समोरच्याशी वाद कधीच करू नका, कारण त्याची ताकद तुम्हाला माहित नसते.त्याने तुमच्या एक ठेऊन दिली की तुमच्या मागे असणारे चार कधी गायब होतील कळणार नाही.कारण इथे कोणाला कोणाची पडलेली नसते.जो तो स्वतःसाठी जगत असतो.त्या माकडीनीची गोष्ट माहित आहे ना?
बिरबलाने एक प्रयोग करून अकबराला शिद्द करून दाखवले की कोणीही स्वतःसाठीच जगत असतो.त्याने एका हौदात माकडीन आणि तिचे अत्यंत लाडके पिल्लू जे की ती कधीच त्याला एकट्याला सोडत नाही.त्याच्यावर तिचा खूप जीव असतो.त्या दोघांना एका हौदात टाकले जाते.आणि हौदात पाणी सोडले जाते.जेव्हा हौदातले पाणी वाढायला लागते तेंव्हा माकडीन पिल्लाला उचलून कमरेवर घेते.पाणी कमरेपर्यंत येते माकडींन पिल्लाला खांद्यावर घेते ,पाणी खांद्यापर्यंत येते,माकडीन पिल्लाला डोक्यावर ठेवते,पण गळ्यापर्यंत ,पाणी नाकातोंडात जायला लागते ती पिल्लाला आणखी वर करते, टाचा वर करते तरी ही पाणी तोंडात जाते, ती गुदमरायला लागते , तिला श्वास घेता येत नाही. आता काहीच पर्याय राहत नाही.तिला तर जगायचे असते, ती पिल्लाला पायाखाली टाकते आणि त्याच्यावर उभे राहून स्वतःचा जीव वाचवते..असेच असते.ती आई असून आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या पिल्लाचा जीव घेण्यास कमी करत नाही.मग तुमचे सोबती तर वेगळे असतात.काही कारणाने काही हेतूने एकत्र आलेले असतात.त्यांच्या वर काय भरोसा ठेवायचा?
जे काही करायचे असेल ते स्वतःच्या हिमतीवर करा.यश तुमचेच आहे कारण ज्याने चोच दिली त्याने दाणे सुद्धा दिले आहेत ते फक्त आपल्याला शोधायचे आहेत.
कडू डोस:
कुठलेही कार्य करताना कुणाच्याही भरोश्यावर करू नका.कारण कोण कधी दगा देईल सांगतां येत नाही.
कार्य स्वतःच ओढून नेण्याची ताकद असेल तर ते कार्य हातात घ्या.अन्यथा त्या वाटेला जाऊच नका
कुणावाचून कुणाचे अडत नाही
'जो चोच देतो ,तो दाणे पण देतो.' अशी एक म्हण आहे.ही म्हण ज्याने सर्वात अगोदर म्हटली असेल त्याला शतशः प्रणाम.
म्हणी तयार होतात त्या खूप निरीक्षण करून होत असतात.आणि ही सुद्धा म्हण निर्मात्याने निरीक्षण करूनच लिहिली किंवा बोलली असेल.
आता बघा ना .लहान लहान पशु पक्षी असतात.त्यांना सुद्धा निर्माता जगवतोच ना.इतकेसे जीव किती किती मोठा प्रवास करून आपले पोट भरतात. कुठे ना कुठे तरी त्याच्या पोटाची व्यवस्था केलेलीच असते.जर कोणी आणून दिले तर चांगलेच पण नसेलच कोणी आणून दिले तर ते स्वतःचे पोट भरण्यासाठी वणवण भटकतात, आणि आपले अन्न मिळवतात.
मानवजातीचे पण तसेच नाही का,सुरुवातीचे दिवस त्याचे आईवडील नातेवाईक त्याच्यासाठी खूप काही करतात.त्याला चालायला शिकवतात.जगायला शिकवतात.समाजात कसे वावरायचे हे शिकवतात, समाजाची बरोबरी करण्याची ताकद देतात. समाजातील तो एक प्रतिष्ठित नागरिक होतो. मग तो इतरांना शिकवायला लागतो.हे रहाट असेच चालू असते.कधी कधी त्याच्या डोक्यात हवा जाते, आणि 'मी आज जो काही आहे तो स्वतःच्या ताकदीवर आहे,मला कोणीही मदत केली नाही, मी माझे विश्व स्वतः तयार केले, अशा वलग्ना करतो.आई बाप आणि त्याला घडवणारा समाज याना विसरतो.स्वतःसाठी जगतो.
या जगात प्रत्येकासाठी घर, अन्न विधात्याने बनवून ठेवले आहे. फक्त ते त्याला त्याचे शोधावे लागते.काहींना चटकन मिळते काहींना खूप मेहनत करूनही मिळत नाही. शेवटी त्याचा अंत होतो पण त्यांच्यासाठीचे घर त्याला।मिळत नाही.
त्याचे प्रयत्न अपुरे पडतात. कधीकधी साथ देणारे अर्धवट रस्त्यात सोडून जातात.
पण तो धीराचा असला तर स्वतःचा मार्ग स्वतः शोधून काढतो.इतरांवर अवलंबून राहत नाही.
जो इतरांवर अवलंबून असतो त्याचे काही खरे नसते.तुम्हाला काही मिळवायचे असेल तर स्व कर्तृत्व अतिशय महत्वाचे. सोबत करणारे शेवटपर्यंत साथ देतीलच असे नाही.एखादे कार्य करण्यास ते सोबत येतील पण शेवटपर्यंत टिकतीलच असे नाही.ते तुम्हाला मध्यावर सोडून जातील.त्यावेळेस तुमच्यात धमक असली पाहिजे.घेतलेले कार्य शिद्दीस नेण्याची जिद्द पाहिजे. तुम्ही कोणाच्या भरवश्यावर एखादे कार्य हाती घ्याल तर तुमचे काही खरे नाही.ते तुम्हाला कार्य पूर्ण होण्याआधीच सोडून जाऊ शकतात. किंवा तुमच्या कार्यात अडथळे सुद्धा आणू शकतात.
तुमच्या सोबत असणारे कधी कधी तुमच्या पासून अलगद दूर जाऊन तुमची गम्मत पाहू शकतात. तुमच्यावर कोट्या करू शकतात.तुमची कशी फजिती होते हे दूरवरून बघू शकतात.पण तुम्ही धीराचे असाल तर त्यांच्यावर मात करू शकता.त्यांचे दात त्यांच्याच घश्यात घालू शकता.
तुम्हाला ध्येय साधण्यासाठी एखाद्या प्रवासाला जावे लागते.तो प्रवास असाध्य असतो पण अश्यक्य नसतो.तुमच्या प्रयत्नांनी तुम्ही तो शक्य करू शकता.पण कधी कधी सोबत असलेले ,आणि ज्यांच्यावर तुमचा भरोसा आहे तेच तुम्हाला संकटात टाकून मागे फिरतात.आणि तुमचे हसू कसे होईल याची योजना आखतात.पण तुमचा प्रवास प्रामाणिक असेल तर तुम्हाला वाटेत नवीन साथीदार भेटतात ते तुम्हाला हवी ती मदत करतात. तुमच्या अगोदरच्या सोबत्यांपेक्षा जास्त जीव लावतात.हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते.फक्त जिद्दीने जगता आले पाहिजे.कारण जो चोच देतो तो दाणे पण देतो.
कुठलेही कार्य हातात घेण्या अगोदर तुम्ही ते पूर्ण करू शकत असाल तरच हातात घ्या.दुसऱ्याच्या भरवश्यावर कधीही घेऊ नका.
समजा एखाद्या ठिकाणी काही वाद होत असेल ,आणि तुमच्या सोबत चार साथी असतील.तर त्यांच्या भरवश्यावर समोरच्याशी वाद कधीच करू नका, कारण त्याची ताकद तुम्हाला माहित नसते.त्याने तुमच्या एक ठेऊन दिली की तुमच्या मागे असणारे चार कधी गायब होतील कळणार नाही.कारण इथे कोणाला कोणाची पडलेली नसते.जो तो स्वतःसाठी जगत असतो.त्या माकडीनीची गोष्ट माहित आहे ना?
बिरबलाने एक प्रयोग करून अकबराला शिद्द करून दाखवले की कोणीही स्वतःसाठीच जगत असतो.त्याने एका हौदात माकडीन आणि तिचे अत्यंत लाडके पिल्लू जे की ती कधीच त्याला एकट्याला सोडत नाही.त्याच्यावर तिचा खूप जीव असतो.त्या दोघांना एका हौदात टाकले जाते.आणि हौदात पाणी सोडले जाते.जेव्हा हौदातले पाणी वाढायला लागते तेंव्हा माकडीन पिल्लाला उचलून कमरेवर घेते.पाणी कमरेपर्यंत येते माकडींन पिल्लाला खांद्यावर घेते ,पाणी खांद्यापर्यंत येते,माकडीन पिल्लाला डोक्यावर ठेवते,पण गळ्यापर्यंत ,पाणी नाकातोंडात जायला लागते ती पिल्लाला आणखी वर करते, टाचा वर करते तरी ही पाणी तोंडात जाते, ती गुदमरायला लागते , तिला श्वास घेता येत नाही. आता काहीच पर्याय राहत नाही.तिला तर जगायचे असते, ती पिल्लाला पायाखाली टाकते आणि त्याच्यावर उभे राहून स्वतःचा जीव वाचवते..असेच असते.ती आई असून आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या पिल्लाचा जीव घेण्यास कमी करत नाही.मग तुमचे सोबती तर वेगळे असतात.काही कारणाने काही हेतूने एकत्र आलेले असतात.त्यांच्या वर काय भरोसा ठेवायचा?
जे काही करायचे असेल ते स्वतःच्या हिमतीवर करा.यश तुमचेच आहे कारण ज्याने चोच दिली त्याने दाणे सुद्धा दिले आहेत ते फक्त आपल्याला शोधायचे आहेत.
कडू डोस:
कुठलेही कार्य करताना कुणाच्याही भरोश्यावर करू नका.कारण कोण कधी दगा देईल सांगतां येत नाही.
कार्य स्वतःच ओढून नेण्याची ताकद असेल तर ते कार्य हातात घ्या.अन्यथा त्या वाटेला जाऊच नका
No comments:
Post a Comment