Saturday, 6 May 2017

ही गोष्ट आहे, दोन मित्रांची.

ही गोष्ट आहे, दोन मित्रांची. एक सामान्य तर दुसरा असामान्य. दोन विपरित वृत्तींचे माणसं एखाद्या वेळी निभवुन घेतिल, पण जर त्यातला एक “दिव्यांगी” असेल तर..? सिनेमातली ‘दोस्ती’ वगैरे ठिक आहे हो..., आपण विचारात तेव्हां पडतो, जेव्हां अशे मित्र आणि त्याचं जीवन आपल्या डोळ्या समोरुन जातो. तर मित्रांनो, अशीच एक मैत्री, जी मी जवळुन अनुभवली आहे, त्यांची ही गोष्ट.
      कॉलेजमधे असताना, मी ज्या मेस मधे जेवायला जात होतो, तिथे अशेच् दोन मित्र जेवायला यायचे. एक ‘अजय’ नावाचा, सावळा उंचपुरा आणि अप-टु-डेट मुलगा, जो मेस मधे आल्या-आल्या आदि दोन खुर्च्या रिजर्व करायचा आणि बाहेर जाउन गाडीवर बसलेला आपल्या दिव्यांग मित्र ‘भावेश’ ला, ज्याचे दोन्ही पाय कंबरेपासुन लुळे होते, आपल्या दोन्ही हातात अलगत उचलुन आणायचा आणि एका खुर्चीवर बसुन द्यायचा आणि स्वतः बाजुच्या खुर्चीवर बसुन जेवायचा. आम्ही सगळे त्यांच्याकडे मोठ्या कौतुकीने बघायचो, ते कशे एकामेकाला मैनेज करतात आणि मुख्य म्हणजे ते दोघं अगदि सामान्य लोकांन प्रमाणे वागायचे. कशाची ही परवा न करता, ते सहज आप-आपले कामं करायचे, जणु त्यांना आता एकामेकाची सवयच् लागली असावी.
      अजय आणि भावेश रोज सकाळी आणि संध्याकाळी मला भेटायचे. हळु हळु परिचय वाढला आणि मी एके दिवशी त्यांच्या रुमवर दोघांना भेटायला गेलो, सहज बोलता बोलता मी त्याच्याबद्दल चौकशी केली, तर भावेश म्हणाला, “बाबु, याचे वडिल आमच्याकडे लहानपना पासुन लाकडाच्या टालावर लाकडं विकण्याचं काम करायचे. आमच्याकडे फॉरेस्टचे लाकडं येतात आणि लाकडं विकणं हा आमचा व्यवसाय आहे. याचा आणि माझा जन्म एकाच महिन्यात झालं आहे, मी जरी काही दिवस मोठा असलो, पण हा पट्ठा माझ्या मोठ्या भावासारखी देखरेख करतो. अगदी म्हणजे, सकाळी संडासापासुन तर रात्री झोपुन देयी पर्यंत, हा माझी सेवा करतो. लहानपना पासुन हा माझ्या सोबतीला आहे, तेंव्हा हा मला साईकिलवर शाळेत घेउन जायचा. आता पल्सरवर नेतो... हा-हा-हा...” दोघेही हासायला लगले.
“बरं का मन्या...” चहा देत अजय बोलला, “लहानपना पासुन माझं संपुर्ण खर्च शेटजी, भावेशचे वडील उचलत आहे.”
“अरे पण तु माझी सेवा करित नाहीका...?” भावेश हसत म्हणाला...! मग दोघही हसायला लागले. मी पण चहा घेत त्यांच्या आनंदात सामिल झालो.
      भावेश हा एका गुजराती कुलिन घराचा दिव्यांग पुत्र होता आणि त्यांचा लाकडाचा मोठा व्यवसाय होता. अजय, हा त्यांच्याकडे काम करणार्या एका गडी-माणसाचा गरिब मुलगा. जेमतेम पगारात् अजयचे वडिलांनी कधी स्वप्नात सुद्धा विचार केलं नसावा कि त्यांच्या सारख्या गरिब मजुराचा मुलगा, आपल्या मालकाच्या मुलासोबत सि.ए.चं शिक्षण घ्यायला शहरात् जाणार..! नशिबाचे खेळ बघा, अजयचा भविष्य, हा भावेश मुळेच् चमकणार होतं..! भावेश जर दिव्यांग नसता, तर अजय जास्तित जास्त आपल्या वडिलांच्या सोबत टालावर कारकुन झाला असता..., पण आता तो सि.ए. होणार होता. कुठे अकाऊंटंट आणि कुठे सि.ए., खुप मोठा फरक आहे यात, आणि याची परिणिती भविष्यात काय होणार होती, देवालाच् माहित.
      आमची भेटीगाठी रोजच् व्हायची. ते दोघं कधी सिनेमा तर कधी पानीपुरी च्या ठेल्यावर सुद्धा भेटायचे. पण असामान्याला सुद्धा सामान्याप्रमाणे कसं जगायचं, हे कुणी त्यांच्याकडुन शिकावं. वर्षा वर वर्ष भराभर निघत होते, आम्ही सुद्धा आप-आपल्या शिक्षणाच्या अंतिम पडावावर येउन पोहोचलो होतो. एके दिवशी मेस मधे अजयला एक फोन आला आणि त्याच्या चेहर्यावरचे रंग उडाल्यासारखे वाटले मला. तो फोन घ्यायला बाहेर आला आणि थोड्यावेळानी बोलुन जेवण आटोपटं घेतलं. भावेश त्याच्याकडे उत्सुकतेनी बघत होता कि आता हा मला कुणाचं फोन होतं, हे सांगेल...! शेवटी त्यांनिच् अजयला विचारले, “कुणाचा फोन होता रे..?”
“ऑफिस मधुन होता, सरांचा...” अजय म्हणाला.
      ऑफिस म्हणजे जिथे हे दोघं आर्टिकलशिप करित होते, हे मलापण कळलं, पण त्यात घाबरण्यासारखं काय होतं, हे भावेश सोबत आम्हा सगळ्यांना विचारात टाकत होतं, पण अजयच्या सेवाभावामुळे त्याच्या या कृतीत् जास्त काही शंका घेणं अम्हाला योग्य वाटत नव्हतं. नंतर मला कळलं, अजय ऑफिसच्या एका आर्टिकल मुलीच्या प्रेमात पडला होता...! प्रेम हा जर सांगुन आला असता तर भावेशनी त्याला कधीचं ‘नो-एंट्री’ चा बोर्ड दाखविला असता.., कारण अजय जर त्याच्या जिवनातुन एकदा का निसटला, तर त्याची देखरेख कोण करणार... हा एक मोट्ठा यक्षप्रश्न भावेशसमोर उभा होता. भावेशला कळल्यावर तो कसा रिएक्ट करणार, याची मला उत्कंठा आणि भिती पण होती.
      भावेशला, अजयचं प्रेम-प्रकरण कळायला जास्त दिवस लागले नाही, पण तो मोठ्या मनाने त्याला आत्मसात करण्याचा प्रयत्न करित होता. दिव्यांगी माणसं फार प्रेमळ आणि चांगल्या मनाचे असतात, हे माझ्या एकुण अनुभवाने मी सांगु शकतो. काही वेगळे असतात, पण भावेशनी आपल्या मनावर पुर्ण ताबा कमविला होता आणि तो कुठल्याही प्रसंगाला तोंड सुद्धा द्याला तैयार होता. काळानी भावेश साठी काय लिहुन ठेवले होते, देव जाणे. पण त्याचं भलं व्हावं, हे आम्हा सगळ्यांना वाटत होतं..!
      दिव्यांगी मुलाला त्याच्या आई-वडिलांन् शिवाय दुसरं कुणीही समजु शकत नाही, पत्नी सुद्धा नाही, कारण तिचं त्या व्यक्तिशी रक्ताचं नातं नसतं. मग अजयतर परका होता, फक्त एका उपकाराखेरीज भावेशची सेवा करायला भाग पाडायला दुसरं काहिच् कारण नव्हतं त्याला. तसं बघितलं तर उपकार फेडण्याकरिता दुसरे अनेक मार्ग असु शकतात, तो या सेवेच्या मोबदल्यात पैशे घेउ शकत होता, पण तरी तो निश्काम भावनेने भावेशची सेवा करित होता. लहानपना पासुन तर आता २४-२५ वर्षा पर्यंत, खुप मोठा काळ असतो हा. जीवनहा नेहमी बदलत असतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या नंतर, प्रत्येक तरुण मनाला कुणाचीतरी साथ लागते, त्यांच्या सळसळणार्या उग्र रक्ताला हळुवार फुंकर घालणारा कुणीतरी हवं असतं. अजयचं मनसुद्धा कुणालातरी शोधित होता, कि जिच्या ऑफिसमधे येताच एक परिचित परफ्युमचा झोका सरळ डोक्यात् शिरणार, कि जिच्या मोकळे केसांचा स्पर्श हवंहवंसं वाटणार, कि जी चोर नजरेनी आपल्या मैत्रिणीच्या घोळक्यातुन त्याला स्माईल देणार, कि जी केसं सावरण्याच्या निमित्याने त्याला “हाय...” म्हनणार, कि जी ऑडिट करिता बाहेर जाता जाता, “कॉल मी..” चा संकेत देणार...!
      अजय सुद्धा एक माणुस आहे, त्याला सुद्धा मन, भावना आहे, त्याचं सुद्धा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, एक सेवाभावी मन आहे, मग त्याला थोडं स्वतःसाठी जगणं, इतकं स्वातंत्रतर मिळालाच पाहिजे, नाही का..? भावेशला सुद्धा हे कळत होतं, तो दिव्यांगी आहे, पण अजयतर नाही..! तो अक्षम असेल, पण अजयतर सक्षम आहे..! आणि मन मोठं केल्यानी त्याचे लुळे पायतर सरळ होणार नाही, कि त्यात प्राणतर येणार नाही..! आयुष्याच्या शेवटच्या श्वासा पर्यंत त्याला एका आधाराची गरज भासणार होती, हा एक कटुसत्य भावेशला माहित होतं, म्हणुन कधी कधी तो बेचैन होउन जायचा, कपाळावर घाम यायचा आणि तो आपल्या नशिबाला दोष द्यायला लागायचा..! मला इतकी बुद्धि दिली, दोन व्यवस्थित पाय दिले असते तर काय बिघडलं असतं देवाचं...? देवाच्या कारखान्यात् सुद्धा अंग प्रत्यंग, ‘आउट-ऑफ-ऑर्डर’ होतात का कधी..?
“काय विचार करतोस रे मित्रा..?” भावेश दचकला..! “अरे, मी आहे ना...!” अजय बोलला, जणु त्याला भावेशच्या मनाचं कळत होतं.
“तुला... अंजली आवडते का..?” भावेशनी अजयला सरळ प्रश्न विचारलं. अजय दचकला, त्याच्या कपाळावर घाम फुटायला लागलं..! “तुला कुणी सांगितलं..?” अजयनी डोळे खाली करत, अपराधभावने विचारले.
“फुल उमळला कि तो त्याच्या सुगन्धानेच् कळतं...!” भावेश मिस्किलपणे बोलला, “ऑफिस मधे सगळ्यांना माहित आहे तुमच्या प्रकरणाबद्दल...”
“सॉरी...” अजय हळुच बोलला... “यात सॉरी बिरी कुठुन आलं आता..?” भावेश हसत बोलला... “तु काय माझा गुलाम आहेस..?”
“नाही, मी तुला सोडुन जाईन, असं तुला नको वाटायला..!” अजय सावरत म्हणाला.
“देवाकडुन बोलावनं आलं, तरी नाही जाशिल..?” भावेश मसकरी करित म्हणाला. अजय त्याच्या जवळ येउन खाली बसला आणि म्हणाला, “हे सगळं कसं आणि कधी झालं, कळलंच नाही.., ती खुप छान मुलगी आहे रे...” अजय अंजलीची बाजु घेत कुठेतरी स्वतःला विसरला..!
“ए, हलो... ओ रोमियो... कुठे भटकले तुम्ही..?” भावेश अजयच्या डोळ्यापुढुन हाथ हालवित बोलला... “मी जर तुझ्या जागी असतो, तर मलापण एकदा प्रेमात पडायला आवडलं असतं..!” भावेश सुद्धा शुन्यात कुठेतरी हरवला.
      एकाला प्रेम करता येत नाही, किंबहुना करण्याची परवानगी नाही, कारण तो अक्षम होता आणि दुसरा, जरी तो सक्षम होता पण प्रेमातपडुन सुद्धा तो प्रेम करु शकत नव्हता...! किती विरोधाभास आहे, नाही..? कारण प्रेम, हा एकट्याने होणारा क़ृत्य नाही आहे, त्याला संपुर्णता मिळते दुसरीकडुन दिल्याजाणार्या दुजोर्याची. एकेरी प्रेम, हा प्रेम नसुन मृगतृष्ना शिवाय काही नसतं. पण अजय आणि अंजलीचं प्रेम, हा दोन्हीबाजुनी सारखं होता. अजय हा एक बुध्दीमान, हुतकरु आणि आकर्षक तरुण होता, अंजली सुद्धा देखणी, प्रेमळ आणि हुशार मुलगी होती, आणि दोघंही सी.ए. होणार होते.., मग का बरं त्याचं मिलन होणार नाही..? ऑफिसमधे सुगबुग होतीच त्या दोघांनविषयी.., सगळे त्याची जोडी बघुन ‘मेड-फ़ॉर-इच-अदर’ म्हणायचे..! अजयच्या स्वपनाचा क्लायमॅक्स नेहमी भावेश जवळ येउन संपायचा, तो नेहमी अंजली आणि भावेशच्या मधे पिसुनजायचा. काय करावं काही कळत नव्हतं त्याला, अंजली सोबत लग्न केलं तर भावेश एकटा पडेल, अशी त्याची नेहमी कोंडी व्हायची. विचार करता करता त्याचे तारांबळ उडायचे..!
      तिकडे अंजली, अजय सोबत स्वतःच्या लग्नाचे स्वप्न रंगवित होती. तिला भावेश बद्दल किती संवेदना होत्या, देव जाणे. कदाचित नसेल, कदाचित गरज भासत नसेल. तिला माहित होतं, ते फ्क्त इतकच् कि अजयसोबत लग्नकरुन आपला नवीन ऑफिस सुरु करायचं आहे बस्स... तिच्या जीवनाच्या प्रायोरिटीज् मधे प्रथम क्रमांकावर हाच एकमेव उध्दिस्ट होता, बाकीचं नंतर बघुया... आदि आपल्या सख्याला जवळतर करु दे, नव्या जिवनाची सुरुवाततर होवु दे... तो दुसरी कुणीच्या होण्याआदि माझा होवु दे...! बस्स एकदा ‘एक’ होवु दे... माझा कान्हा मलाच भेटु दे... असं प्रत्येक गोपीला वाटत होतं... कारण तो होताच मोठ्या गुणाचा... सावळा, भोळा, एकनिष्ठ, हुशार आणि देखणा..!!! आणि यात वाईट काय, सांगाबरं..? स्वप्न रंगविने आणि त्याला पुर्णत्वाला आणने, हाचतर जीवन आहे. साम, दाम, दंड, भेद... माणुस आपले स्वप्न रंगवायला, या पैकी कुठलाही शस्त्र वापरु शकतो. त्याला शास्त्रानी सुद्धा पुर्ण परवाणगी दिली आहे, मग अंजलीने आपले स्वप्न का बरं पुर्ण नाही करावे..? अजय जर भावेशसोबत आर्थिक, भावनिक नात्यानी जुडलेला असेल, पण कधी न कधी त्याला स्वतंत्र व्हावच लागेल.., नाही का..?
       जवळ जवळ वर्षभरानी निकाल लागला, ते तिघंही सी.ए.ची परिक्षा उत्तिर्ण झाले. अजय अंजलीचं तर आनंद गगनात मावत नव्हतं. भावेश मात्रं काहीसं विचलित झाला होता. मी त्याला विचारलं, “आता पुढे काय करायचं विचार आहे तुझा..?” तो हसत म्हणाला, “बघुया... काय आहे पुढे, आपल्या नशिबात..” मला त्याच्या चेहर्यामागे अविरत दुःख दिसत होतं..! मी मनातल्या मनात त्याच्यासाठी प्रार्थनेशिवाय काहीच् करु शकत नव्होतो..! असं म्हणतात कि माणसानी, माणसाचे दुःख कमी करायला पाहीजे, त्याच्या कामात यायला पाहिजे. पण मी त्याच्या कुठल्याही कामात येऊ शकत नव्होतो. त्याच्या जीवनात् एकच् व्यक्ति कामात येऊ शकत होता, आणि तो म्हणजे, अजय..! पण अजयतर अंजलीचा होणार होता.
      सहा महिन्यानी अजय आणि अंजलीचं लग्न जुडुन आलं. नविन ऑफिसचं सेटअप आणि लग्न, अश्या दोन्ही कार्य एकाचवेळी, त्या सुद्धा तेवढेच इम्पॉर्टन्ट..! दोघांची तारांबळ उडालेली होती, लग्नाच्या पत्रिकेपासुन तर ऑफिसच्या कामापर्यंत, अहोरात्र कामच् काम. अजयनी भावेशला, काही दिवसासाठी गावाला जाण्याचे अनुरोध केले, आणि तो त्याला गावाला सोडुन आला. त्याला नविन घराची सोय सुद्धा करायची होती, अंजली घरात लागणार्या आवश्यक वस्तुंची खरिदारी करित होती. अजय, ऑफिस आणि लग्नाची तैयारित लागला होता. तो पत्रिका घेउन गावाला गेला आणि भावेश आणि शेटजींना लग्नाला आमंत्रित करुन, आपल्या आई-वडिलांना सोबत घेऊन परत आला.
      लग्नाचा दिवस उजळला, गुलाबाच्या सुगंधात् शहनाईचा सुर जणु सुगंध आणि सुरांचा मिलन वाटत होता. भावेश आपल्या आई वडिलांसोबत व्हिलचेअरवर आला होता. लग्न समारंभ आटोपल्यावर, अजय आणि अंजलीने, सगळ्यांना आपल्या नवीन ऑफिसला भेंट द्यायला विनंती केली. भावेशला मात्रं अपमानित झाल्या सारखं वाटत होतं. पण नाईलाजाने जावे लागले. सगळेजण अजय आणि अंजलीचे नवीन ऑफिस बघायला गेले. त्यांचे आई-वडिल आणि काही मित्र परिवार ऑफिसला पोहचले. छोटसं, नवीन चकचकित ऑफिस जणु त्यांचीच् वाट बघत होता. चेंबर मधे तिन खुर्च्या बघुन सगळे दचकले. “हा तिसरा कोण रे..?” भावेशनी आश्चर्याने विचारले. अजय आणि अंजलीने त्याची व्हिलचेअर मधल्या खुर्चीजवळ नेऊन त्याला अलगत उचलत, त्यावर बसविले आणि अंजली म्हणाली, “अजुन कुणाची असेल दादा..., फक्त तुमचीच्..!!” दोघं आशिर्वाद घेण्यासाठी त्याच्या समोर वाकले...! पण भावेश त्यांच्या समोर खाली, खुप खाली वाकलेला वाटत होता. त्यानी अश्रुपुर्ण नेत्रांनी आपले हाथ, अजय आणि अंजलीच्या डोक्यावर ठेवले...!!!
ही गोष्ट मी लिहीली नाही 
आवडली म्हणून share  केली⁠⁠⁠⁠

No comments:

Post a Comment