Wednesday, 2 December 2020

Binding factors

 *Binding Factor*


" करंजी च्या सारणात थोडी कणिक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो." 


*लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची.*


पण कणिकच का? तांदळाचे  पीठ का नाही? तर त्यावर " अग गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. 

तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. " 


"मग आपण खव्याच्या किंवा मटार च्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ? माझा अजून एक आगाऊ प्रश्न। 

तर त्यावर " अग मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते।" 

तितकेच शांत पण तत्पर उत्तर. 

        

        पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर रेणू जुळणी तंत्राचा अभ्यास करताना हे सगळं उपयोगी पडले आणि त्यातले विज्ञान ही समजले. 


*किती सहजपणे माझ्या आईने  जीवनातल्या दोन गोष्टी मला समाजवल्या _* 


1. *अंगी ओलावा असेल तर गोष्टी मिळून येतात.*


2. *ओलावा कमी असेल तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो.* 

      

     नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding factor चे महत्व पटत गेले. 

        

          आणि आज दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली. 


नात्यांचंही असच आहे... 


*प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो , जो सर्वाना धरून ठेवतो.*

    

    मग ती एखादी अशी मैत्रीण असते जी बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणते , व्हाट्सअप्प ग्रुप बनवते आणि " contact मध्ये रहायचं ह" अशी प्रेमळ दमदाटी ही करते. 


कधीकधी असा binding  factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते. 

    

      *आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factor दिसतात.*


आपण त्याना एकेकदा भेटलेलेही नसतो  पण ते मात्र आपली चौकशी करतात, काळजीही करतात. आशा सगळ्या  binding factors ना माझा मानाचा मुजरा !!


समाजातील माणूसपण टिकून राहणे महत्त्वाचे.

    

 मंडळी, आपण मोठे झालो , *चला तर आता सर्वांना मिळवून आणणारे होऊ या.*

सुंदर

 _*"सुंदर.."*_


_लेखक- कौस्तुभ केळकर नगरवाला._


       तो हॅन्डसम वगैरे कधीच नव्हता. गरीब गाय मात्र नक्कीच होता. स्वभावाने आणि खिशानेही.

       कामकरी. आधी पोट मग पाटी. कमवा आणि शिका. आयुष्यभराचा विद्यार्थी.

      ग्रॅड्युएट झाला. नोकरीत इंटरेस्ट नव्हताच. जीभेवर खडीसाखर. माणसं जोडणारा फेव्हीकाॅली स्वभाव. मदतीला सदैव तयार. अशा माणसाला कोण मदत करणार नाही ?

       दोन चार आठ दहा.

सगळ्या लोकांनी मदत केली. पुरेसं भांडवल गोळा झालं. नवीनच झालेली ती पाॅश सोसायटी. सोसायटीच्या दारातला एक गाळा घेतला. डेली नीडस्'चं त्याचं दुकान.

सुरू झालं.

       गावाकडचा त्याच्यासारखाच एक धडपळू सोबतीला घेतला, होम डिलीव्हरीसाठी. वाॅटस्सप केलं की शून्य मिनटात डिलीव्हरी. 

      लोकांचा आळस... त्याची पळापळ. दुकान जोरात पळू लागलं. दोन तीन वर्षात सगळी देणी सपाट. काय नव्हतं त्याच्याकडे ? वाट्टेल ते.. सगळं मिळायचं. 

      गावाकडे जायला वेळ मिळेना. आजूबाजूच्या दहा बारा सोसायट्या. तो नसला की त्यांना आॅक्सीजन कमी पडायचा.

     त्याच्या डोक्यात एक्सपान्शनचे विचार. नाक्यावरची जागा. मोक्याची. कपड्यांची शोरूम. पुरेसं भांडवल. पुरेसा काॅन्फीडन्स. लवकरच सुरू होईल.

       लंबी रेस का घोडा था वो.. मुझे चलते जाना है ! स्लो बट स्टेडी. शुभम् भवतु!

      हे दुकान...? त्याच्या धावपळू जोडीदाराला हॅन्डओव्हर करायचं.

       ती. गोग्गोड हिमगौरी सुंदरा. भूलोकीची अप्सराच जणू. एकदम क्युटीफूल. त्याच सोसायटीत राहणारी. तन भी सुंदर, मन भी. हुश्शार, गोड पोरगी. आई बापाची एकुलती एक. ती स्वतः नोकरी करणारी. एका MNC त चांगल्या पोस्टवर, तरीही जमिनीवर.

       गेली दोन तीन वर्ष बघतीय ती त्याला. त्याची धावपळ, त्याची जिद्द, त्याचा स्वभाव. त्याची नजर, निरागस निर्मळ. मुलींशी, बायकांशी अतिशय नम्रतेने बोलायचा तो. कीप सेफ डिस्टन्स. आॅलवेज...

      तसा काळासावळाच होता तो. गावाकडे लहान असताना तालमीत घामगाळू मेहनत केलेली. आत्ताही व्यायाम चालूच होता. दणकट मजबूत स्टील बाॅडी. आवड्याच तिला.. तो. दिलसे.

      सोसायटीतली ती एकटीच बहुधा, जी स्वतः त्याच्या दुकानापर्यंत जाणारी. आधी आळस नको म्हणून.. नंतर. तिथं जायला आवडायचं, म्हणून. त्या वेडूला काहीच समजायचं नाही. प्रेमाच्या बाबतीत एकदम अनपढ.

     तीचा प्रश्नच नव्हता. 'माझा होशील काय ?'

      तो एकदम गडबडलाच. ऊंच जीनेसे धप्पकन खाली पड्यासारखं. "काय पाहिलंस माझ्यात ?" त्याला हेच विचारायचं होतं. चान्सच मिळाला नाही.

       पुढचं सगळं पटाटा. तिच्या आईबाबांचा लेकीवर पूर्ण विश्वास. तिचाही स्वतःवर. त्याच्या आईबाबांची समजूत जरा ऊशीरा पटली. टॅ टॅ ट्या टॅ ट टॅऽऽट्या.. गुँज ऊठी शहनाई.. शुभमंगल सावधान.

       तिथूनच जवळ एका सोसायटीत वन बीएच के घेतलाय त्यानं. सध्या भाड्यानेच. चालतंय की..

       काल एक छोटीशी पार्टी. तिच्या आॅफीसची गँग. तिचा बाॅस, कलीग्ज. सगळं आॅफीस हजर.

       त्याला सवयच नव्हती याची. लग्नात निळा सफारी शिवलेला. तो घालूनच गेला तो तिथं.

       काय दिसत होती ती.. तिच्या शेजारी तो. ब्लॅक अॅन्ड व्हाईट काॅम्बी. सगळ्यांचे चेहरे वाचले तिने. सगळ्यांनी काहीतरी छान गिफ्टलं दोघांना..

       माफक ड्रिंक्स ईतरांसाठी. ती दोघं त्या वाटेवरचे वाटसरू नव्हतेच कधी. मंद म्युझीक. छानसं जेवण. खिदळाट. तो जरा अवघडलेला. तरीही खूष.

       एकदम फिल्मी  अनाऊन्समेंट. "लेडीज अॅन्ड जेन्टलमन. मे आय हॅव यूवर अटेन्शन प्लीज."

      सगळ्यांनी कान टवकारले. ती बोलत होती. "थँक्स अ लाॅट. तुम्ही सगळे आलात, मला खूप बरं वाटलं. हाऊ ईज माय हब्बी ?"

     छोटासा पाॅझ घेतला तिनं. सगळ्यांच्या रिअॅक्शन्स वाचल्या तिनं. "आय नो... मला माहित्येय मी कशी आहे. दिसायला मी छान आहे. ईज ईट माय फाॅल्ट ? तुमच्या सगळ्यांचे डोळे स्कॅन करता येतात मला. जे फाॅर जेलसी. एस फाॅर सेक्सी. सगळं वाचता येतं मला. चलता है.. ईटस् ह्यूमन नेचर.

       तरीही तुम्ही सगळे खूप छान आहात. कुणीही आपल्या बाऊंड्रीज क्राॅस केल्या नाहीत कधी. ग्रेट. बाकी मन ही मन में... वो छोड दो.

       माय हब्बी..? वन्स अगेन. आय कॅन स्कॅन यूवर एक्स्प्रेशन्स.. "बंदर के हाथ अंगूर." "हम क्या ईतने बुरे थे ?"

       तुम्ही वाईट नव्हताच कधी. तो खूपच हॅन्डसम आहे. माझ्या चेहऱ्यामागच्या फिलींग्ज वाचता येतात त्याला. त्याचं केअरींग नेचर आणि निरागस, निरपेक्ष प्रेम. तेच आवडतं मला..

       और एक बात. त्याची तबीयत, स्टील बाॅडी. तीन चार लोगोंको तो पक्का भारी पडेगा वो. बच के रहना लोगो. अजून काय हवं ?

       बाकी त्याच्या फिल्डमधे तो डाॅन आहे. नोकरी करणारा नाहीये तो. नोकरीला लावणारा. म्हणूनच तो आवडतो मला. आय लव्ह माय हब्बी व्हेरी मच..."

       सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे. वो शरमा के मोतीचूर. सगळे जाम खूष.

      तिचा बाॅस. चाळीशीचा असेल. शेवटी तो बोलला. "ग्रेट.. ग्रेट आहात तुम्ही दोघं. मेन विल बी मेन. नेहमी मला काय पाहिजे याचा विचार करतो आम्ही. यूवर हब्बी ईज दी मोस्ट हॅन्डसम गाय. मुलीच्या मनातलं ज्याला ओळखता आलं तो  सगळ्यात हॅन्डसम. हिअर आफ्टर वीई आॅल विल काॅपी हिम.. बेस्ट आॅफ लक. विश यू हॅपी मॅरीड लाईफ."

      बाॅस ईज बाॅस. त्याचं म्हणणं पटलंच सगळ्यांना..

      एकदम म्युझीक चेंज. गरबा अॅटमाॅसफीअर.. ढोल बाजे रे.. सगळे आनंदाने डान्सू लागले. तो भारी नाचतो राव...

      दुसऱ्या दिवशी आॅफीस ग्रुपवर हेच सगळे फोटो. काय कॅप्शन असणार ? 'बंदर के...' अंहं..

      "लक्की गर्ल विथ हॅन्डसम गाय."

धूम मचालो..


_*©कौस्तुभ केळकर नगरवाला.*_

(आवडल्यास शेअर करतांना कथेत कुठलाही बदल न करता कृपया मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती- मेघःशाम सोनवणे 9325927222.)

_*C/P.*_

फटाके आणि फाटके

 _*🔸फटाके आणी फाटके.🔸*_


_लेखक-अनामिक._


      परवा सहज बाहेर पडलो. दिवाळी तशी म्हटली तर संपली होती. तसंही हल्ली दिवाळी पाच वरून दोन दिवसावर आली आहे...

      म्हटलं.., जरा सकाळी सकाळी फेरफटका मारून येऊ. असाच रस्त्याने एकटा चालत होतो अचानक माझी नजर रस्त्याचा दुसऱ्या बाजूला गेली ४ ~५ पोरं-पोरी वय जेमतेम ७ ~१०  वयोगटातील असतील... पोरं तशी फक्त चड्ड्या घालूनच होती आणि त्या पण बऱ्याच ठिकाणी फाटलेल्या नायतर ठिगळं जोडलेल्या. पोरींची कपडे पण तशी ठिगळांचीच जास्त होती...

      प्रत्येकाच्या हातात झाडू होता आणि ते रस्त्याला पडलेले फटाक्यांचे कागद झाडून काढत होती. जेवढा आनंद आमच्या पोरांच्या चेहऱ्यावर फटाके फोडताना दिसत असतो त्यापेक्ष्या दुप्पट त्यांच्या चेहऱ्यावर होता. जणू त्यांच्यातच शर्यत लागली होती, जास्त कचरा कोण साफ करतोय...

      मला कुतुहल वाटलं. त्यांचा उत्साह आणि ती धावपळ पाहून ..

       मी सहज रस्ता पार करून त्यांचेकडे गेलो. सर्वांना बोलावले आणि विचारले, ”का रे एव्हढी का गडबड सुरु आहे तुमची..?”

       हे ऐकून त्यातला एक पोरगा म्हंटला, ”आमचे आई- बाप रस्त्याची साफ सफाई करतात. आम्हाला दिवाळीची सुट्टी आहे, म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय, जो जास्त झाडलोट करेल त्याला भरपूर दिवाळी फराळ आणि नवीन कपडे मिळतील. आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या कचऱ्याचे वेगळे वेगळे ढीग करायचे. मंग आमचे आय - बाप त्यात काय फटाके असतील तर ते आम्हाला शोधून वाजवायला देणार.”

       हे ऐकून मी सुन्न झालो… त्यातून मी सावरून सहज विचारले, ”अरे तुम्हाला तर फटाके ह्यातले शोधून देणार मग तुम्हाला नवीन कपडे आणि फराळ कसा काय देऊ शकतात ते..?”

      त्यांच्यातली सगळ्यात मोठी पोरगी बोलली, ”काका, ते आमचे आई बाप झाडू मारत मारत जे बी घर रस्त्यात येतं, त्यांना विचारतात काय फराळ उरले असेल तर आमच्या पोरासनी द्या. कुणी देतो, कुणी असूनही हाकलून देतं..

       काही लोक लय चांगली असतेत, ते न इचारता देतात.. कपड्याचं पण तसंच. कुणी चांगली कापड देतं, कुणी फाटलेली... मग आमची आई त्याला जमत असलं, तर शिवते नायतर ठिगळ लावून देते. आणि मंग आम्ही ती आमची दिवाळीची कापडं म्हणून वरिस भर घालून फिरतो.”

      हे माझ्यासाठी खूप भयानक होते, असंही असू शकते, ह्यावर माझा विश्वास बसेना. माझ्या पाया खालची जमीनच सरकली…. सुख - समाधान कशात असतं..!! हे मला ह्या १० वर्षाच्या पोरांनी  दोन मिनिटात शिकवलं होतं...

      नाहीतर आम्ही १०० ची माळ आणली तरी त्या मोजत बसतो आणि १~२ फटाके जरी उडले नाही किंवा आवाज जरी कमी वाटला तरी सणासुदीला पण त्या दुकानदाराचा उद्धार करत बसतो... कपडे तर आम्ही AC शोरूम शिवाय घालतच नाही. त्याशिवाय दिवाळी होतंच नाही असा आमचा गैरसमज असतो.

      कुठं ते AC त गारठलेले कपडे आणि कुठं ती ठिगळांची कपडे... ज्यातून गारठापण रोखला जात नाही... पण त्यासाठी त्या छोट्या जीवांची चाललेली धडपड.. 

      त्यांची धडपड आणि आमची धडपड पाहून एकच फरक जाणवला, ते आनंदानं समाधानाने मिळेल तेच सुख मानणारी वाटत होती, पण आमची धडपड हि कधीच आनंदी वाटली नाही, कधी चेहऱ्यावर समाधान दिसलेच नाही. पण धडपडत राहत जायचे हेच आम्हाला माहिती. कारण आम्हाला सुख कशात आहे हेच समजत नाही..

       मी तसाच मागे फिरलो… घरातले सारे डब्बे शोधू लागलो. मिळेल तो फराळ पिशवीत घातला, पोरांची मिळतील ते ५~६ कपड्याचे जोड, बायकोच्या कपाटातल्या ढीगभर साड्यातल्या ३~४  साड्या, माझी काही कपडे एका पिशवीत भरली आणि थेट त्या पोरांकडे निघालो...

     इकडे माझं काय सुरु आहे, हे माझ्या बायको पोरांना समजत नव्हते. त्यांचा तिकडे दंगा सुरु होता आमचे कपडे, खाऊ घेऊन गेले…

       मी ते सारं त्या पोरांना दिलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.. त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं..

       मी परत फिरलो आणि जाता जाता त्यांना सांगितलं इथून पुढं कोणत्याही सणाला माझ्या घरी यायचं आणि इथून पुढे तुम्हाला दिवाळीची नवीन कपडे, फराळ आणि फटाके दरवर्षी मी देत जाईन...

       माझे डोळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पाण्यानी डबडबलेले … स्वतःला सावरत घरी आलो..!!

      आता माझी बारी होती. मला घरी उत्तर द्यायचे होते… मी घरी पोहचणार तोच दारात सारी मंडळी उभी होती. मी तसाच पायरीवर बसलो दोन्ही मुलांना जवळ घेतलं. बायको फुगून दाराला टेकूनच उभी होती. 

       मी मुलांना जे काय पाहिलं ते सगळं सांगितलं. आपण आपल्या ऐपतीप्रमाणे भारीतभारी कपडे, दागिने, सुगंधी साबण आणि सुगंधी उटणं लावले तरच दिवाळी होते असं समजून आपण विनाकारण किती वायफळ खर्च करतो आणि समाजात असे किती तरी लोक आहेत  ज्यांना साधं साबण, तेल अश्या साध्या साध्या, त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळत नाहीत... हे समजावू लागलो.

      तुम्ही २ फुलबाजे कमी घेतले, तरी रुसून बसता. पण ती मुलं तुमच्या उडवलेल्या फटक्याच्या ढिगातून एकादी न उडलेली फटाकी मिळेल ह्या आशेने मन लावून तुम्ही केलेला कचरा साफ करत आहेत... हे समजावण्याचा प्रयत्न करत होतो..  

      ती पोरं रस्ता झाडत झाडत आमच्या घराजवळ आली होती.. आमच्या घरचे सारे एकटक लावून त्यांचेकडे पाहत होते.

      साऱ्याचे चेहरे पडले होते. तोच माझा छोटा मुलगा माझ्या जवळुन उठला आणि थेट घरात गेला, आणि लपवून ठेवलेले एक टिकल्याचे पॅकेट आणि बंदूक घेऊन बाहेर आला नि सरळ त्या पोरांकडे गेला आणि त्यांना दिले…

       हे पाहून त्या पोरांनी काम सोडलं आणि जणू काय आपल्या हातात हजाराची माळ पडल्यासारखे एक-एकजण ते टिकल्या बंदुकीत घालून वाजवत नाचू लागले…

      माझा मुलगा तसाच पळत आला नि माझ्या कुशीत बसून रडायला लागला. त्याला काय समजलं मला माहिती नाही आणि मी हि त्याला विचारणं मुद्दाम टाळलं, काहीही असेल... तरी एक वात पेटली होती त्याची मला जाणीव झाली होती.. 

      ह्या साऱ्यातून एक गोष्ट मला आणि माझ्या कुटुंबाला समजली ती म्हणजे “फटाके” आणि “फाटके” ह्यात फक्त एका “काण्याचा” फरक असतो आणि तो “काना” एकाद्या “काठी” सारखा असतो. योग्य ठिकाणी लागला तर साऱ्या गोष्टींचा आनंद देणारा आधार बनतो नाहीतर ते आयुष्याचं ओझं होतो ….

      म्हणून ठरवलं, आता कोणताही सण आला कि अश्या २ का होईना, पण ह्या पोरांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम करायचे .. फटाके एकदा पेटले, कि एकदा मोठा आवाज करून कागदच होतात पण कोणाच्यातरी चेहऱ्यावर एकदा पेटवलेले आनंदरुपी समाधान आवाज न करता पण एखाद्या रंगीत फुलबाज्या प्रमाणे फुलत राहतात.

_*लेखक-अनामिक.*_

अवघा रंग एकचि झाला

 #लघुकथा

अवघा रंग एक झाला..(repost)

©स्वप्ना...

    सावळी आज येणार नाही आजीच्या बहिणीच्या नातीने शेजारच्या गॅलरीतून ओरडून  निरोप दिला,... ते ऐकून आजी अस्वस्थ झाल्या,...पडल्या पडल्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं आता आपलं नॅपकिन कोण बदलणार ..?खरंतर सावळीमुळे आपण एवढं व्यवस्थित राहू शकतो आणि सावळी येणार नाही म्हणते पण का काय झालं,..?अगतिक होऊन चिडून ओरडून आजींनी विचारलं ,..त्यावर  नात म्हणाली,.. आजी कर्फ्यु लागला आहे रस्त्याने जीवावर उदार होऊन येते ती गेल्या 15 दिवसांपासून तुम्हाला काय माहिती?? हो बाहेर काय वातावरण आहे ते,...एवढं बोलून ती नात आत निघून गेली,...आजीला जाणवायला लागलं खुपच उष्ण पाणी आपल्या गालावरून ओघळतंय आपल्याला आता खरंतर मरून जावं वाटतंय,..देवा काय खेळ लावला आहेस रे ह्या जीवाचा..? लवकर सम्पव तरी अरे आमच्या सारखी मरण मागणारी माणसं सोडून तरुण लोक घेऊन चालला न्याय कुठे तुझा,...?तेवढ्यात आजीला लॅच उघडल्याचा आवाज आला,..आजी ओरडली ,..भयभीत होऊन कारण चावी फक्त सावळीकडेच असते,..आणि आताच तर निरोप असा आजी विचार करत होती तर समोर गोड हसणारी सावळी,.. आजी म्हणाली," काय गम्मत करतेस का ग माझी म्हातारीची??"सावळी ओढणी कमरेला बांधत म्हणाली,..गम्मत केली नाही माझ्या बापाने केला होता तो फोन कारण खरंच बाहेर वातावरण खराब झालं आहे,..बाप म्हणतो लग्न आहे तुझं,...काही झालं तुला तर,..?

       ऐकून आजीला हुंदकाच फुटला आणि आजी चादरीत तोंड लपवून रडू लागली,...सावळे किती करतेस ग माझ्यासाठी,...?नक्की आज पण भांडून आली असशील घरच्या लोकांसोबत,...सावळीने लगेच आजीचा हात हातात घेतला,..आजी रडू नका तुमचे खुप उपकार आहेत माझ्यावर त्यासाठी हे करणं तर काहीच नाही,..चला उठा स्वच्छ व्हा छान सावळीच्या मदतीने आजी अगदी प्रसन्न तयार होऊन मस्त बसली ,...आपल्या काळ्याभोर विठ्ठल मुर्ती समोर,...सावळीची सगळी लगबग सुरू होती,..छोट्याश्या मूर्तीला तुळशीहार तयार होता,.. त्याच्या समोर पुसून नाजुक रांगोळी रेखाटली होती,...चांदीची  निरंजन चकचकीत घासुन साजुक तुपाने गच्च भरलेली शांतपणे तेवत होती ,...आजी शांत मनाने जप करत होती,..स्वयंपाक घरातुन सावळी बाहेर आली चहा घेऊन,... आजीने चहा घेताना विषय काढलाच,..".सावळे तू नस्तीस तर काय झालं असतं ग माझ्या म्हातारीचं,...?? नुसता पैसा असुन उपयोग नसतो बघ ...आयुष्यात मायेनं जवळ घेणारं लागतंच कुणीतरी,...नुसतं रक्ताच्या नात्याचं नाही ग बाई मनाच्या नात्याचं,..हो किनी ग,...जशी मला तू,...!"

             सावळी म्हणाली आजी,..".हे सगळं तुम्ही जीव लावला म्हणून आहे,..टाळी एका हाताने वाजत नाही,...आजी मला आजही आठवतं,.. एक तर पोरगी आणि त्यात काळी म्हणून बाप चिडत होता,..मारत होता,..म्हणून आई तुमच्याकडे कामाला येताना घेऊन यायची,.. तुमच्या मनाला पाझर फुटला माझं शिक्षण केलं,...आज मी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे ती तुमच्यामुळे आणि मग माझं शिक्षण जर तुमच्या कामाला नाही आलं तर काय उपयोग हो,...मध्ये आई गेली तेंव्हा तर खरा आधार पैशानं, मनानं तुम्ही दिला मला,...आणि त्या पैश्यापेक्षा संस्काराची शिदोरी दिलीये आजी,...तुमच्याकडे असलेले सणवार,भजन,पुजा आनंद कसा मिळवावा ते शिकवून गेले,...ते सगळं मला अनुभवू दिलंत तुम्ही,...आजोबांना जाऊन वर्ष पण झालं नाही तर तुम्ही अश्या पॅरॅलीस झाल्या,... तुम्हाला मुलबाळ नसलं तरी तुम्ही मला मुली सारखंच जपलं ना,...मग माझं कर्तव्य मी करतीये आणि करणार,...होणाऱ्या नवऱ्याला पण सांगितलं आहे मी,... सकाळचे दोन तास माझे आजीसाठी आहेत खास लग्नानंतर सुद्धा,...म्हणुन सांगते आजी तुम्ही काळजी करू नका,...मी येते बरोबर कशीही,... मला माहित आहे मी गेल्यावर तुमच्या बहिणीची नात जी वर राहते ती येते तुमच्या मदतीला,... पण तुम्हाला पण मी येऊन गेल्या शिवाय करमत नाही ना,???"...दोघी हसल्या,...

            हसता हसता आजीच्या डोळ्यात पाणी आलं,...आजी म्हणाली,.."सावळे तू हि विठ्ठल मुर्ती दिली आणि तेंव्हा पासुन मला तू सतत जवळ असल्यासारखं वाटतं,... तू तशी फार हुशार मी केलेल्या सगळ्या पंढरपूर वाऱ्या तुला माहीत होत्या,... पण ह्या 3 वर्षापूर्वी गुढग्यांच्या दुखण्याने मला वारीला जाता नाही आलं म्हणून मी नाराज होते तर तू चक्क हि मूर्ती आणून ठेवली माझ्या हातात,...काळीभोर आणि शांत,...

        बरं आजी आता जाऊ का मी,..."आहो माझी आजीसासू सिरीयस आहे म्हणून लग्न उद्याच करायचं ठरलंय,... हे लॉकडाऊन काही उघडत नाही म्हणून घरातच करणार आहे ,...उद्या फक्त धकवून घ्या,...परवा येतेच मी  आशीर्वाद द्या मला,...आजीला गहिवरून आलं,..सगळ्यांनी काळी म्हणून हिणवलेलं लेकरू,...कष्टाळू आणि प्रामाणिक होतं,... उद्या तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती,...तिला जवळ घेत आजी म्हणाली काय देऊ ग तुला,...?तशी सावळी म्हणाली,..".आनंदी रहाण्याचा आशीर्वाद बस बाकी काही नको,..."

               आजीला तेवढ्यात काहीतरी आठवलं,...आजी म्हणाली,"सावळे तू खरेदी केली कि नाही तुला माझ्या त्या पैठणी लुगड्यासारखं लुगडं घालायचं होतं ना ,...आणि त्यावर मोत्याची नथ,..."

सावळी हसली आणि म्हणाली,"आजी हे लॉकडाऊन इतकं झटपट झालं ,...खरंतर आईने पैसे साठवून ठेवले होते मला तस पैठणी लुगडं घ्यायला पण आता राहिलं,... जाऊ द्या,... नंतर घेऊ चला येऊ मी,..?"

         आजी म्हणाली," थांब ते कपाट उघड,...ती खालच्या कप्प्यात सुती कापडाची घडी आण इकडे,..."

         सावळीने पटकन ती घडी ठेवली हातात,...आजींन त्यातुन लालचुटुक पैठणी काढली,...आणि सावळीला म्हणाली," घाल लग्नात,... आणि परवा मला आणुन दाखव कशी दिसली ते,..."

तशी सावळी म्हणाली," आजी,... अहो मी तुमच्यासारखी पैठणी घेणार होते पण रंग हा नाही अहो माझ्या सारख्या काळीला चांगली तरी दिसेल का,..?"

           आजी म्हणाली सावळे,..."अग माणसाचा कातडीचा रंग गौण असतो ग,...त्याच मन ज्या रंगाचं असतं ना,..त्यावर त्याच सौन्दर्य असतं,.... म्हणजे,.... कपटी,धूर्त,प्रेमळ,निरागस असे वेगवेगळे रंग असतात त्यावर विचार करायचा,...आणि आता मला सांग ह्या विठ्ठलाचं वस्त्र कोणत्या रंगाच आहे ग,...?"

        सावळी हसुन म्हणाली ,"अगदी असंच लाल,..."

   आजी लगेच म्हणाली,...मग त्याला ते वाईट दिसतंय का,???

        सावळी म्हणाली," आजी तो देव आहे,...त्याला चांगलंच दिसणार,..."

          आजी हसली म्हणाली,..."सावळे देवत्व मूर्तीत नसतं असं नाही पण मूर्तीशिवाय जेंव्हा ते बघायच असतं ना तर ते,...माणसाच्या कृतीत,कष्टात,स्वभावात बघायच असतं,... आता ह्या महामारीच्या काळातच तर तू म्हंटली ना,...हे शेतकरी, पोलीस,नर्स,डॉकटर,सफाई कामगार अगदी देव बनुन पृथ्वीवर वावरत आहेत म्हणून,..."

         सावळीने दोन्ही हात कोपऱ्यापासून जोडले आणि आजीला म्हणाली,"बोलण्यात मी तुम्हाला काही हरवू शकणार नाही,...द्या ते लुगडं मी परवा नेसुन आणि नवऱ्याला घेऊन येईल आशीर्वाद घ्यायला आणि सेवेला पण येईन,...जाऊ का आता,...??आजीने नथीची डबी पण ठेवली हातात,..तशी ती घाबरत म्हणाली,सोन्याची आहे आजी हि नथ मला नको,...आजी म्हणाली "घालुन परत आणुन दे मग तर झालं,...अग पैठणीवर शोभुन दिसेल,..."

         सावळीचे डोळे पाणावले,...ती पटकन आजीच्या गळ्यात पडली,...आणि चटकन निरोप घेऊन निघाली,..

         आजी हताशपणे पडून राहिली,...विठ्ठलाकडे पहात,...

         तिसऱ्या दिवशी लालचुटूक पैठणी घालुन नवऱ्यासोबत ती आजीच्या अपार्टमेंटच्या गेटमधून आत शिरली तसं आजीच्या नातीने तिला वर ये म्हणून हाक मारली,...सावळीला खरंतर आधीआजीला भेटायचं होत पण आधी तिच्याकडे जावं लागलं,...

         नातीने दरवाज्यातच तिला थांबवलं,...तोंडाला मास्क बांधूनच ती बोलत होती,..तिने सावळीला आजीच्या फ्लॅटची चावी मागितली आणि म्हणाली सावळे",... अग परवा तू गेल्यावर काही तासात आजी गेली अग,...तू केलेलं जेवण द्यायला मी फ्लॅटमध्ये गेले तर आजी रडत होती,...मला म्हणाली,..." माझ्या सावळीच लग्न आहे,...तिला दिलेली पैठणी आणि नथ तिला माझी आठवण म्हणून सांग ,...मी जवळ बसले तर मला म्हणाली,ती विठ्ठल मूर्ती दे माझ्या जवळ,...त्या मूर्तीला कवटाळून म्हणत होती खरं सांग तूच सावळी बनून येत होतास ना,...आणि प्राण सोडले ग तिने,...

         सावळी सुन्न होऊन गेली,...नवऱ्याने तिला सावरलं,...ती निघाली आणि निघताना म्हणाली त्या नातीला मला ती विठ्ठल मूर्ती देता का???नातीने लगेच फ्लॅटचे कुलूप उघडून ती मूर्ती तिच्या हातात दिली,...सावळी विठ्ठल घेऊन चालू लागली,...पण सावळीच्या मनातला प्रश्न विठ्ठल ऐकत होता,...

     सावळी मनात म्हणत होती,.."आजी तुझी सेवा केली म्हणून मी तुझा विठ्ठल कि तू मला चांगलं जगणं दिलंस म्हणून तू माझा विठ्ठल,..??"


          माणुसकीचा हा अवघा रंग एक झालेला पाहून विठ्ठलमूर्ती हसुन म्हणत होती,... अवघा रंग एक झाला..

    

   वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा,..शुद्धलेखन चुका माफी असावी असेच blogs वाचण्यासाठी swapna blogs ह्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा,...धन्यवाद..

       

  ©स्वप्ना मुळे(मायी) औरंगाबाद

विश्वास

 *" घंटा उचलेपर्यंत थांबा "*


*" चिमणीचा विश्वास "*


🙏🙏🙏👌👍👌🙏🙏🙏


कौरव-पांडवांमध्ये होणा-या युद्धाकरता कुरुक्षेत्राची सिद्धता करण्याचे काम सुरू होते.

 हत्तींच्या मदतीने विशालकाय वृक्ष भुईसपाट करण्यात येत होते. मोकळी आणि सपाट अशी युद्धभूमी तयार होत होती. एका विशाल वृक्षावर एक चिमणी आपल्या चार पिल्लांसह राहात होती. तो वृक्ष जमीनदोस्त झाला आणि तिचं घरटं, उडताही न येणा-या इवल्या पिल्लांसह कोसळलं.


पण आश्चर्यकारकरीत्या ती पिल्लं अजूनही सुखरूप होती.

घाबरलेल्या, हताश चिमणीने, तेव्हाच अर्जुनासहित तिथे आलेल्या श्रीकृष्णांना पाहिले.

युद्धभूमीचे निरीक्षण करायला आणि विजयासाठी आवश्यक ती व्यूहरचना ठरविण्यासाठी ते तिथे आले होते.


दुबळ्या पंखांत, सगळी शक्ती एकवटून तिने श्रीकृष्णांच्या रथाकडे उड्डाण केले.


"हे कृष्णा, माझ्या बाळांना वाचव!  या भयंकर युद्धात ती चिरडली जातील." तिनं विनवलं.


"तुझं दु:ख मला कळतंय, पण मी निसर्गनियमात ढवळाढवळ करू शकत नाही." श्रीकृष्ण म्हणाले.

"मला इतकंच माहीत आहे, की तुम्ही माझे तारणहार आहात. माझ्या बाळांचं नशीब आता तुमच्या हातात आहे. त्यांना वाचवायचं की मरू द्यायचं, हे आता तुम्हीच ठरवा."


"कालचक्र कोणताही भेदभाव न करता फिरत राहातं," श्रीकृष्ण एखाद्या सामान्य माणसासारखं बोलत होते. असं दाखवत होते की जणू त्यांच्या हातात काहीच नाही.


"हे तत्त्वज्ञान मला कळत नाही. मला फक्त इतकंच कळतं की कालचक्र तुम्हीच आहात, मी तुम्हाला शरण आले आहे." चिमणी अत्यंत आदराने आणि विश्वासपूर्वक बोलत होती.


"मग असं कर, ३ आठवडे पुरेल इतकं अन्न तुझ्या घरट्यात गोळा कर."  श्रीकृष्णांनी सांगितलं.

सुरू असलेल्या या संभाषणाबाबत अनभिज्ञ असलेला अर्जुन चिमणीला हुसकावणार, इतक्यात श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून स्मितहास्य करताना त्याला दिसले.

चिमणीने आदराने पंख फडफडवले आणि ती घरट्याकडे उडून गेली.


दोन दिवसांनंतर, शंखनाद करून युद्धारंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाकडे त्याचं धनुष्य आणि बाण मागितले. या युद्धात लढण्यासाठी शस्त्र हातात न धरण्याची प्रतिज्ञा करणा-या श्रीकृष्णांची ही मागणी ऐकून अर्जुन दचकलाच; शिवाय आपण सर्वोत्कृष्ट धनुर्धारी आहोत याबद्दल त्याला विश्वास होता.

"मला आज्ञा करावी, माझ्या बाणांसाठी काहीही अभेद्य नाही."

अर्जुनाकडून शांतपणे धनुष्य स्वत:कडे घेत श्रीकृष्णांनी हत्तीवर नेम धरला.  पण बाणाने हत्तीला खाली पाडण्याऐवजी तो बाण हत्तीच्या गळ्याभोवतालच्या घंटेला लागला आणि काही ठिणग्या चमकल्या. 


एवढा सोपा नेम हुकलेला पाहून अर्जुन त्याचं चुकचुकणं लपवू शकला नाही.

"मी करू का..??" अर्जुनाने आर्जव केले. 


त्याच्या त्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी धनुष्यबाण त्याला परत दिले आणि आणखी काही करण्याची गरज नसल्याचं सांगितलं.


"पण तुम्ही केशव हत्तीवर वार का केलात..??" अर्जुनाने विचारलं.

"कारण चिमणीचं नांदतं घरटं असणारं झाड त्याने पाडलं होतं."

"कोण कुठली चिमणी ती..!!"


 अर्जुनाला काही कळेना...


 "आणि एवढं होऊनही तो हत्ती सुखरूप आणि जिवंत आहे, फक्त त्याच्या गळ्यातली घंटा तेवढी उडून पडलीय."


अर्जुनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत, श्रीकृष्णांनी त्याला शंखनाद करण्याची सूचना दिली.


युद्ध सुरू झालं, पुढच्या अठरा दिवसांत अनेकांची आयुष्यं संपली. अखेर पांडवांचा विजय झाला. परत एकदा, त्या रक्तलांछित युद्धभूमीवरून श्रीकृष्ण अर्जुनासहित फिरू लागले. अनेक योद्ध्यांची कलेवरे अंत्यसंस्कारांची वाट पाहात अजूनही तिथेच पडलेली होती. छिन्नविच्छिन्न झालेले दोन्ही बाजूंचे सैन्य, युद्धात मारले गेलेले हत्ती, रथाला जोडलेल्या अवस्थेत मरण पावलेले घोडे यांच्या प्रेतांचा तिथे खच पडला होता.


एका विशिष्ट ठिकाणी श्रीकृष्ण थांबले आणि तिथे पडलेल्या हत्तीच्या गळ्यातल्या घंटेकडे विचारमग्न होऊन पाहात राहिले.

"अर्जुना, माझ्यासाठी म्हणून तू ही घंटा उचलून बाजूला ठेवशील का?" श्रीकृष्ण म्हणाले.

या साध्याशा सूचनेने अर्जुन मात्र गोंधळात पडला. 


एवढ्या विस्तीर्ण युद्धक्षेत्रावर इतक्या बहुसंख्य इतर गोष्टींचे निवारण करणे बाकी असताना, एक क्षुल्लकसा धातूचा तुकडा उचलायला श्रीकृष्ण त्याला का सांगत असावेत, हे न कळून प्रश्नार्थक नजरेने तो श्रीकृष्णांकडे पाहू लागला.


"हां...हीच ती घंटा, मी बाण मारल्यावर हत्तीच्या गळ्यातून निसटली होती." श्रीकृष्ण म्हणाले.


अर्जुन खाली वाकला आणि कुठलाही प्रश्न न विचारता, त्याने ती जडशीळ घंटा उचलली. आणि त्यानंतर, त्याने जे पाहिले त्याने त्याचे आयुष्य कायमचे बदलले. 

एक, दोन, तीन, चार आणि पाच: चार छोट्या चिमण्यांपाठोपाठ एका प्रौढ चिमणीने पंख पसरून झेप घेतली. आनंदाने उडत उडत तिने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली. निखळलेल्या एका घंटेने एक पूर्ण कुटुंब वाचवले होते.

अर्जुन म्हणाला, "मला क्षमा करा, श्रीकृष्णा! मानवी अवतारातल्या तुला मर्त्य मानवासारखंच वागताना पाहून मी तुझं खरं स्वरूप विसरलो होतो."


*"घंटा उचलली जाईपर्यंत घरामध्ये आतच थांबा...!!"*


*सुरक्षित रहा...!!*


*"कोरोनाला पळवू या...!!"*


*आपल्या तसेच आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा...!!*


🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

ईच्छा

 # एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला...


दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत

तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो.

काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण.

परतताना मनात विचार येतो

‘तो ड्रेस घ्यायला हवा होता''...

सिग्नलला गाडी थांबते,

चिमुरडी काच ठोठावते.

गोड हसते, पण भिक मागत आहे

हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे

फार लक्ष देत नाही आपण.

२-३ रुपये द्यावे असे मनात येते.

रेंगाळत सुटे शोधता शोधता

‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो.

तेवढ्यात सिग्नल सुटतो,

गाडी पुढे घ्यायची वेळ येते.

थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते,

‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला'

जेवणाच्या सुट्टीत  मित्र

त्याच्या घरातला त्रास फार विश्वासाने सांगतो,

त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात.

वाईट वाटते खूप, नशीब आपण त्या परिस्थितीत

नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळेहोतो.

‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही

आपण गप्प राहतो."

जेवणाची सुट्टी संपते.

तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो.

क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही'

निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!’

असेच होते नेहमी,

छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात

खरं तर या छोट्या गोष्टीच

जगण्याचे कारण असतात.


जगण्याची साधने जमवताना

जगणेच राहून जात नाहीयेना

ते ‘चेक’ करा.

                               "आनंद झाला तर हसा,

                            वाईट वाटले तर डोळ्यांना

                                 बांध घालू नका"

                          चांगल्या गोष्टीची दाद द्या,

                              आवडले नाही तर सांगा,

                                    घुसमटू नका."


त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा.

नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.

आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,


आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली

तर ‘लाईफ’ कसले?

आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले

तर ‘लाईफ’ कसले?

मित्रांच्या फालतू विनोदांवर

पोट दुखेस्तोवर हसलो नाही

तर ‘लाईफ’ कसले?

आनंदात आनंद आणि

दु:खात दु:ख नाही जाणवले

तर ‘लाईफ’ कसले!!???? 


बघा जमलं  तर ....

माणसं

 माणसं....


मला माणसांना भेटायला फार आवडतं. लहानपणापासून. माणसं आवडतात मला. अनोळखी माणसांना भेटण्यात, जाणून घेण्यांत त्यांना एक अनोखी मजा असते. त्यांच्याकडून बरंच काही मग कळतं जातं आपलं आपल्याला. टिपतं राहतंच आपलं मन. नकळतपणे आपल्याच. एखाद्या टिपकागदासारखं. माणूस बदलला समोरचा की हा कागद बदलून टाकला जातो. तो सुद्धा नकळतपणे आपल्याच. म्हणून मला वाटतं की आपलं मन हे एखाद्या टिपकागदासारखं असावं. पण काही काही जणांचं असं नसतं, त्यांची मनं कार्बन पेपर सारखी असतात. म्हणजे जाणारी माणसं गेलीच निघून आयुष्यातून त्यांच्या तरी ते आपले ठसे उमटवून जातात. आणि मग त्या खुणा जन्मखुणांसारख्या बाळगत अशी माणसं जगतं राहतात. माझ्या मते असं जगणं खूप त्रासदायक आहे. आणि नव्याने येणाऱ्या माणसांवर अन्यायकारक सुद्धा आहेच. येणारा नवीन माणूस जुन्या सारखा कसा असेल? रोजचं साधं ऊन घ्या. ते सुद्धा नसतंच रोज तसंच आणि सारखं. हिवाळी दिवसांत कलेकलेने त्यातला उबदारपणा कमी होतं जातो. आणि उन्हाळी दिवसांत तो त्याचं कलेकलेने वाढतं नाही का जातं? आणि पावसाळ्यातलं जांभळं ऊन, कलणाऱ्या दिवसाच्या खांदयावर बसून ते जेव्हा परतीच्या प्रवासाला निघतं तेव्हा ते अनुपम सुंदर दिसतं.....


काही माणसांची तर अजूनच गंमत असते. म्हणजे त्यांनी असा 'निज शैशवास जपावे' असा वसाचं घेतलेला असतो जणू. ती मग वाढतंच नाहीत. वयानं वाढली तरी. अशा माणसांच्यात एकाच वेळी बरंच काही सापडतं बघा मग. म्हणजे ती माणसं सतत काही तरी करत असतात. हसतात, रडतात, बोलतात. सगळंच. आणि बेलगाम. चांगलं का वाईट हे ठरवणारे आपण कोण? पण ह्यांचे राग, लोभ फार तीव्र असतात. त्यांच्या मधला मी पण खूप मोठा असतो. त्यांच्या सावलीपेक्षा सुद्धा लांब. आणि अनेकदा अशी माणसं फक्त स्वतःबद्दल बोलत असतात. आणि ते फार कंटाळवाणं जातं होऊन. म्हणजे सापडलाच आहे समोरचा तावडीत छान तर ऐकवा त्याला असा एकूण रोख आणि होरा असतो ह्यांचा. अशा माणसांना भेटून, बोलून त्यांच्याशी काही लागत नाही मग हाती. माझ्या ओळखीच्या एका बाई आहेत. त्या ‘मीभक्त’ आहेत. एकच गोष्ट इतक्यांदा आणि परत परत त्याचं उत्साहानं त्या सांगतं असतात. जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा गुदमरल्यासारखं होतं मग. म्हणजे बाई हुशार आहेत, चटपटीत, कामसू गुण आहेतच अनेक. पण त्या ते इतक्यांदा उगाळून सांगतात की ते स्वस्तुतीचे थाळाभर गंध मग संपता संपत नाही.


काही काही वेळा तर माणसं हातालाच लागतं नाहीत. इतकी ती खोटी, तकलादू आणि वरवरची असतात. कचकड्याची. त्यांच्याबद्दल लिहिलं तरी ते तकलादू होईल इतकी. म्हणून त्यांच्याबद्दल इतकंच. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हटलंच आहे, आणि असतंच ते तसं. आपण कसे दिसतं असू समोरच्याला? कसे वाटतं असू? आणि जसे दिसतं असू तसेच आहोत का नक्की आपण? असे सुद्धा प्रश्न मग मनात येऊनच जातात. आणि व्यक्त होणाऱ्या माणसांना, विचार करणाऱ्या माणसांना ते जास्त तीव्रतेने पडतात. कधी कधी आपल्यालाच आपली नवीन ओळख पटत जाते. जगण्यातले प्रश्न कधी कधी इतके गुंतागुंतीचे आणि तीव्र असतात की आपला अभिमन्यू आणि युधिष्टिर दोन्हीही होऊन जातो. एकाच वेळी परत. म्हणजे आपला प्रश्न म्हणून आपण त्यात अडकलेले राहतो. कधी नकळतपणे आपल्या समोरच्याचा प्रश्न आपला होऊन जातो. इतके आपण जोडलेले असतो. अशावेळी ना ते सहन करता येतं ना त्यातून सुटका मिळते. म्हणून म्हटलं आपला अभिमन्यू होतो. आणि युधिष्टिर का? तर अनेकदा आपल्याला ‘सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्, न ब्रूयात् सत्यम् अप्रियम्’ असं वागावं लागतं.  आणि हे सगळं आपण आपल्या मायेच्या माणसांसाठी करत असतो. इतकी ती महत्वाची असतात. असतातच. कारण अनेकदा प्रश्नांना उत्तरंच नसतात. किंवा येणारा काळ हेच एक उत्तर. मग अशा वेळी काय करायचं असतं? अशावेळी माणसं काय करतात? जी आपल्या आधी जगून गेलेली असतात. माझ्या मते ती पुस्तकं वाचतात.


इतक्या वेगवेगळ्या माणसांना भेटून, बोलून काय मिळतं? आणि अजूनही का भेटतो आपण त्यांना? ह्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा किती अस्पष्ट, किती धूसर. आपल्या मनांत संदिग्धता नाही हे कितीही आवर्जून आणि ठासून सांगितलं आपण तरी काही क्षण चकवूनच जातात. मला तर हे सगळं असं टेकडी चढण्यासारखं वाटतं. म्हणजे माथा दिसतं असतो. अंतर माहित असतं. आपली कुवत सुद्धा असतेच माहित. बरं वर जाऊन तिथे काही लागेलंच हाती हे नसतं माहित. आणि दिसेल ते हवंच होतं का हे सुद्धा कुठं असतं माहित चढतांना टेकडी. पण तरीही आपण ती टेकडी चढतो. माणसांचं असंच आहे. किती भेटतात. हजार अनुभव देऊन जातात. काही परत तेच नव्याने.  कधी अगदी नवे, कोरे. कधी इतके जुने की जाळीदार पिंपळाचे पान. पण तरीही आपण भेटतोच त्यांना. न जाणो कोणत्या असोशीने... आणि राहूच भेटत, हे सुद्धा खरंय.  


© प्राची बापट

अज्ञानात सुख

 रस्त्यावर कचरा गॊळा करणाऱ्या एका गावंढळ जोडप्यात कडाक्याचॆ भांडण झालॆ. नवऱ्यानॆ बायकॊला यथेच्य चोप दिला आणि निघुन गेला तिने त्याला आरडाओरड करुन शिव्या दिल्या. ती जरा वेळ रडली आणि पुन्हा कामाला लागली. थोड्या वेळाने तो पुन्हा आला आणि काय आश्चर्य तॆ दॊघॆ पुन्हा एकत्र कामाला लागले आणि सोबत घरी गेलेसुद्धा. मुक्तपिठ मध्ये हि गोष्ट काहीदिवसापुर्वी आली. विचार कॆला कि, ह्याचजागी जर एखादे शहरी-शिकलेले जोडपे असते तर ? कदाचीत त्यांच्यामध्ये "You are encroaching my personal space, You are humiliating me, I deserve self-respect, Where is my self-identity" असा काहिसा संवाद झाला असता कदाचित काडिमोड पर्यंत गोष्ट गेली असती. शिव्या दॆणॆ हा आपला प्रतिकार असॆ त्या गावंढळ स्रीला आणि मार दॆणॆ हा आपला अधिकार असॆ त्या गावंढळ पुरुषाला वाटत असावॆ. किंबहुना आयुष्य असॆच असतॆ हॆ त्यांनी स्विकारलॆलॆ असावॆ. कायदा काय म्हणतॊ, तॊ कुणाच्या बाजुला आहॆ, मानवी हक्क(Human-Rights), नैसर्गिक न्याय-हक्क असे काही असते हॆ त्यांना माहितही नसावे. या अज्ञानामुळॆतर त्यांचॆ वैवाहिक जीवन चालले नसावे ना?



असॆ म्हटलॆ जातॆ कि 'अज्ञानात सुख असतं' (Ignorance is BLISS). कधीकधी जास्त खॊल विचार न करता घेतलेले निर्णयच योग्य ठरतात. जितकॆ विचार खॊल तितकी ध्येयशक्ती क्षीण. 'गहरी सोच इरादोंको कमजोर बना देती है'. याचा प्रत्ययसुद्धा आपणास यॆतच असतॊ. उदा. एखाद्याला 'अर्थविषयक' गुंतवणुकीत गती असेल तर स्वत:चे अर्थविषयक निर्णय घेतांना तो हजारवेळा विचार करेल. माझी गुंतवणुक कुठल्या 'Financial Instrument' मध्ये जास्त सुरक्षित असेल. मला परतावा(Returns) जास्त आणि धोका कमी असणारे पर्याय काय? या Scrip चॆ Fundamental & Technical Analysis काय सांगतॆ? या कंपनीचा CashFlow कसा आहॆ, OrderBook कसॆ आहॆ? आता Stock Market पडणार तर नाही ना? मी फसवला तर जाणार नाही ना? वगैरॆ वगैरॆ... जितकॆ जास्त Parameters तितका जास्त गॊंधळ आणि निर्णय घ्यायला तितकाच उशीर.



आपला नोकरीदाता(Employer) आपल्यावर १००% Margin ठॆवुन आपल्याला पिळत असतॊ हॆ आपणास माहित नसतॆ आणि त्यातच आपण आपली रोजी रोटी कमवत असतो.



'मालगुडी-डेज'या मालिकेत एकदा एका सामान्य पण सुखी माणसाला एक 'अंतरंगात डोकावणारा' चश्मा मिळतो. हौसेखातर तो चश्मा घालुन आपल्या नजिकच्या लोकांत जातॊ आणि यांच्या अंतरंगात डोकावतो. दुखावतो कि तोंडावर गोड बोलणारी मंडळी त्याच्या 'मरणावर' टपुन बसली आहेत. तॊ चश्मा नदित फॆकुन दॆतॊ आणि म्हणतॊ कि, हा चश्मा नव्हता तेंव्हा मी खरोखरच यापेक्षा जास्त सुख़ी होतो.



उद्यमशिलता(Enterpreneurship) तपासतांना काही साहसवित्तवाले(Venture Capitalists) हॆच बघतात कि, एखाद्या गोष्टीत अपयश येइल हे तुम्हाला कितपत माहित नाही?(They look for your Risk-Apetite). जितके तुम्ही अननुभवी तितके चांगले कारण कि यात अपयश यॆतॆ हॆ तुम्हाला माहित नसते आणि तुम्ही ती गोष्ट यशस्वी करुनही टाकता (Its better to have no experience than gathering large irrelevant experience).



वसतीगृहात रहात असतांना एक सदा नापास होणारे व्यक्तिमत्व होते. तो म्हणायचा 'More Information...More Confusion, Less Information...Less Confusion and No Information...No Confusion'.



खरोखरच 'अज्ञानात जग जगतं'. म्हणुनच परमेश्वराने जन्माला घालतांना आपल्याला आपल्या मागच्या अनॆक जन्मांविषयी 'अज्ञात' ठॆवलं असावं.

आयुष्याचा भेळ

 🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀

               *🔸आयुष्याची भेळ.🔸*


*तिने घरात आल्याबरोबर लगेच बॅग सोफ्यावर फेकून दिली. तिचं ते रुप त्यानं बघितलं आणि त्याला कळून चुकलं की आज काहीतरी बिनसलेलं दिसतंय.*


*"काय झालं, कुणाशी वाद वगैरे झाला का?"अगदी सौम्य भाषेत त्याने विचारलं.*


*"हो, मला काय येतं दुसरं वादाशिवाय, मीच भांडत असते ना सगळ्यांशी".*


*"अगं, मी वाद म्हंटलंं भांडण नाही".*


*"उगाच शब्द नको फिरवुस, वाद आणि भांडण फार वेगळं नाही".*


*"बरं !".*


*"हे बरं आहे मी काही बोलली की नुसतं 'बरं !' म्हणायचं आणि शांत बसायचं".*


*ती बाथरूम मध्ये गेली फ्रेश झाली , आतून आवाज आला "ह्या फेसवॉशला सुद्धा आताच संपायचं होतं. लिस्ट मध्ये होतं ना ! पण ह्या घरात मी पुढे पुढे केल्याशिवाय काहीच नीट नसते".*


*"अगंं ह्यावेळी तूच गेली होतीस सामान आणायला".*


*"हो का?, ते बरंं लक्षात राहीलंं".*


*"बरं !".*


*"सर्वात आधी हे बरं ! बरं ! , बंद कर तुझं".*


*"बरं ....सॉरी ....हम्मम्म्म".*


*"सगळी विचित्र माणसं माझ्याच आयुष्यात आहेत".*


*"तुला भूक लागली का, मी भेळ चा प्लान केलाय मस्त".*


*"मी खादाडच आहे ना ! भूक लागली की चिडचिड करते नाही का?".*


*"मी असंं काही म्हणालो नाही".*


*"उद्देश तर तोच होता".*


*"अस नाहीं गंं राणी काही".*


*"जाऊ दे , तू मला कधीच समजून नाही घेतलंस".*


*"बरं!".*


*ती सरळ बेडरूम मध्ये निघून गेली आणि उशीत तोंड खुपसून रडू लागली. ह्याने तिला थोडा वेळ रडू दिलं तोवर त्याने छान भेळ तयार केली. नंतर 2 प्लेट छान सजवल्या आणि बेडरूम मध्ये घेऊन गेला.*


*"ऊठा राणी साहेब, ही बघा स्वादिष्ट भेळ तयार आहे".*


*"मला नको".*


*"हे चालणार नाही".*


*"नको म्हंटलंं ना !".*


*"जाऊ दे मग मी सुद्धा नाही खात".*


*"अरे तू खा, मला भूक नाही".*


*"बरं!, ही भेळ मी तुला समजावून सांगतो. आपलं आयुष्य आहे ना हे त्या शुभ्र कुरमुऱ्यां सारखं असतं, हळू हळू त्यात थोडे बालपणीचे शेव, चिवडा पडतो मग, थोडं वेगळं वाटायला लागतं, त्यात आपण थोडा त्याचे मित्र मैत्रिणी घालतो उदाहरणार्थ कांदा, उकडलेला बटाटा, खारे शेंगदाणे, मग आहों मिरची किंवा चटणी घालतो, हे म्हणजे त्या माणसांसारखंं असते जे सदैव आपल्या आयुष्यात काहीतरी नकारात्मक घेऊन येत असतात. पण त्यांना आपण टाळू शकत नाही, त्यांचा एखादा विचार पटत नाही याचा अर्थ असा नाही की आपण त्यात अजून तिखटाची भर घालावी, थोडं आपल्या विचारांचं मीठ घातलं की भेळ चवदार होते. तरीही जर का तिखटच वाटत असेल तर थोडं आपल्या स्वभावातील लिंबू पिळावं म्हणजे तिखटपणा राहत नाही समोरच्याच्या मनात सुध्दा नाही आणि आपल्या जिभेवर सुद्धा नाही. त्यावर मस्त पैकी आपल्या सुसंस्काराची कोथिंबीर भुरभुरावी मग कशी भेळ आणि जीवन दोन्ही चटकदार होते"*


*ती हसत ऊठली त्याला बिलगली आणि पुन्हा रडली, "नको ती माणसे का येतात समोर?".*


*"आपण आपल्या मनाला इतकं का कमकुवत करायचं की कुणी एखादी व्यक्ती समोर आली तर असं हतबल होऊन जायचं...?*


*"भेळीत काय रोल असेल मग याचा"*


*"सिम्पल आहे हे माणसं एकेकाळी आपलीच असतात, उदाहरण लिंबू पण ते पिळताना त्याची बी सुद्दा पडतेच भेळीत , मग ती जर का दिसली भेळ खातांना तर अलगद तिला बाजूला करायचं आणि भेळ खात बसायचं".*


*"सो स्वीट....  आयुष्याची भेळ."*

🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀

Outlet

 *Outlet*

...............................

*भय्यूजी महाराजांनी* आत्महत्या केल्या नंतर

 *ABP माझा चँनल* ने एक परिचर्चा घडवून आणली होती .त्यात बोलताना भय्यूजी महारांजाचे मित्र - *अशोक वानखेडे* यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक *"अध्यात्मीक" गूरू होते  , परंतू ते एक व्यक्ती पण होते , आपल्या मनातील "स्ट्रेस" बाहेर काढायला त्याच्या जवळ "outlet" नव्हता*

आज परत डॉ. शितल आमटे 

(बाबा आमटे यांची नात त्याचं ही अगदी भैयु महाराज सारखं झाले)


*ईतकं महत्वाचं असतं का हे outlet ?*


 होय !

कोट्यावधी रूपये खर्च करून  *धरण*

बांधले .आणि समजा त्याला outlet च दिले नाही

तर काय झाले असते ? अक्षरशः धरण फूटले असते..इतकं महत्वाचं असते

हे 

मानवी शरीर म्हणजे विवीध पंचतत्वापासून सांधलेलेलं

एक *धरणच* जणु ! या शरीरात समस्यांची आवक अती प्रमाणात झाली तर हे धरण फूटेल की राहील ?

  म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा .आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या आई - पत्नीजवळ सांगा ...आपल्या अंतर्मनाचं outlet Open करण्यासाठी *विपश्यना , ध्यान साधनेचा अवलंब* करा... आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात

मोठं outlet म्हणजे आपले डोळे....उघडा , फुटून जाऊ

द्या *अश्रूचा बांध*...वाहून जाऊद्या स्ट्रेस , दूःख , उपेक्षा...

पिस्तौल च्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.... 

हे केव्हाही सोप्प...नाही का ?

*बेस्ट आउटलेट मित्र आणि मैत्रिणी*🤘❣️💃💃💃

*हसा ! बोला !रडा !भांडा!*

*व्यक्त व्हा!! मुक्त व्हा..!!*

Die empty

 *रिक्त मरण (Die Empty)*


वाचण्यासाठी आणि त्यातून काहीतरी शिकण्यासाठी अनेक पुस्तकं आहेत त्यातलंच एक सर्वोत्तम पुस्तक म्हणजे टॉड हेनरी यांचे "Die Empty"


हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा आणि कल्पना लेखकाला एका बिझनेस मिटींग मध्ये मिळाली.


मिटींगमध्ये डायरेक्टरने तेथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला. की "जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे?"


प्रेक्षकांपैकी एकाने उत्तर दिले : "तेलाने समृद्ध गल्फ राज्ये." 


तर दूसर्‍याने उत्तर दिले : "आफ्रिकेतील डायमंड खाणी."


त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर डायरेक्टर म्हणाले : नाही, जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे स्मशानभूमी. कारण असे लाखो लोक मरण पावले आहेत ज्यांच्याजवळ अनेक मौल्यवान कल्पना होत्या पण त्या कधीच प्रकाशात येऊ शकल्या नाहीत आणि इतरांना त्याचा काहीच फायदा सुध्दा झाला नाही. त्यांच्या या सर्व मौल्यवान कल्पना त्यांच्याबरोबर या दफनभूमीत पुरण्यात आल्या आहेत. 


याच उत्तराने प्रेरीत होऊन लेखक टॉड हेनरी यांनी "Die Empty" हे पुस्तक लिहले.


सर्वात सुंदर जर त्यांनी काही या पुस्तकात म्हटलं असेल तर ते म्हणजे " तुमच्या आतमध्ये जे सर्वात बेस्ट आहे जे तुम्ही करु शकता ते आतमध्येच ठेवुन मरु नका. निवडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच पर्याय असतो त्यामुळे नेहमी रिक्त मरण निवडा.


रिक्त मरण किंवा Die Empty या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये जो काही चांगुलपणा आहे, जे काही चांगले तुम्ही या जगाला देऊ शकता ते सर्व मरण्यापूर्वी या जगाला देऊन जा.


जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती सादर करा.


जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते इतरांना द्या.


जर तुमच्याकडे एखादे ध्येय असेल तर ते साध्य करा.


तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा, इतरांचा सांगा आणि इतरांमध्ये वाटा आतमध्येच दडवून ठेवू नका.


चला तर मग, द्यायला सुरुवात करुया. आपल्यामध्ये जे काही चांगले आणि आपण जे काही चांगले या जगाला देऊ शकतो ते सर्व  आपल्यामधून काढून या जगामध्ये पसरवा.


शर्यत सुरु झाली आहे.

    चला, हे जग सोडण्याआधी रिक्त होऊया.

Wednesday, 7 October 2020

*_कोणाचं घरटं मोडू नका_* ."

            🔶सत्य घटनेवर आधारीत🔷

*टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्ंच्या जीवनात घडलेला प्रसंग !*

*एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते.उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती.रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती.वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक ,सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.*

*जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं .त्यांना वाटायला लागलं आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल.त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.*

*गाड्या थांबल्या.त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले.तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता.त्याला बोलावलं.तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ति आलीय ,हे त्यानी ओळखलंच.त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं.त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली.* *"दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे."*

*यावर तो मुलगा म्हणाला ,"सरजी,पैशाचा सवालच नाहीए .कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही."*

*"का रे बाबा?"*

*"त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत.सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल,ते माझ्याच्यानं पाहवणार नाही.कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी."*

*हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.*

*शेषन् म्हणाले ,"कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं.माझं पद ,माझी पदवी ,उच्च शिक्षण सार्‍या सार्‍याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला.जे शिक्षण , संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत.ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही.".*



चार मेणबत्त्या

 *🕯️.🕯️.चार मेणबत्त्या.🕯️.🕯️*

एका छोट्या शहरातील गोष्ट.दिव्याच्या झगमगाट असलेल्या शहरात अचानक आठवडाभर वीज गेली.घरामध्ये खूप अंधार पसरला.उजेडासाठी एका छोट्या मुलाने घराच्या चार कोपऱ्यात एक एक अशा चार मेणबत्त्या लावल्या.खोली प्रकाशमान झाली.मुलगा झोपी गेला.

अचानक एक आश्चर्य घडलं.मेणबत्त्या चक्क बोलू लागल्या.एकमेकांशी बोलता बोलता त्या अर्ध्या जळून गेल्या होत्या. 

पहिली मेणबत्ती म्हणाली " माझं नाव *शांती.* आयुष्यभर जग शांत आणि आनंदी राहावं म्हणून मी पेटत राहली. पण आता माणसं बदलली आहेत. सर्वत्र द्वेष ,भांडण आणि राग पसरला आहे.आता माझी गरज संपली आहे." असे म्हणत ती विझून गेली. 

ते पाहून बाकी तीन मेणबत्त्या विचारात पडल्या.दुसरी मेणबत्ती बोलली."माझे ही हाल असेच झाले आहेत. माझं नाव *विश्वास.* लोकांची नाती मजबूत करण्यासाठी मी आयुष्यभर तेवत राहिले पण या कलियुगात माझी अवस्था बिकट आहे. फसवणूक आणि लबाडी वाढली आहे. माझी ही गरज संपली आहे."असे म्हणून त्या मेणबत्तीनेही निरोप घेतला. आणि अर्ध्या खोलीत अंधार झाला.

तिसरी मेणबत्ती मोठ्या आकाराची होती. खोलीच्या महत्वाच्या भागात लावली होती. ती चौथ्या मेणबत्तीला दु:खात  म्हणाली, " ह्या दोन्ही मेणबत्त्या बोलतात ते बरोबर आहे.जग खूप निष्ठुर झालं आहे. माझं नाव *प्रेम.* माझं महत्वंच लोक विसरून गेले आहेत.आपल्या जवळच्या लोकांशी,नातेवाईकांशी आजकाल कोणी प्रेमाने बोलत नाही माझं ही पेटणं आता निरर्थक झालं आहे.आता तू तुझा विचार कर". तिसरी मेणबत्ती ही वाऱ्याने विझली.खोली एक छोटासा कोपरा सोडला तर अंधारून गेली. 

छोटा मुलगा अचानक झोपेतून उठला.अचानक झालेला अंधार पाहून घाबरला व रडायला लागला.त्याने लावलेल्या तीन मेणबत्त्या विझल्या होत्या.एका निरुपयोगी कोपऱ्यात लावलेली सर्वात छोटी मेणबत्ती मात्र पेटत होती.तो रडत रडत बोलला.

" तू तरी कशाला पेटत राहलीस.तुझा काय उपयोग? बघ जवळपास पूर्ण खोलीत अंधार झाला आहे.तू पण जा आता विझून.आता सगळं संपलं आहे." आणि तो रडायला लागला.

त्याला रडताना पाहून चौथी मेणबत्ती बोलली. " अरे मी छोटी आहे.दुर्लक्षित आहे पण मी विझू शकत नाही.माझं नाव आहे *आशा.* खोलीत सर्वत्र अंधार आहे,मी जास्त प्रकाश देऊ शकत नाही पण मी खोली प्रकाशित करू शकते. माझी पेटणारी वात घेऊन तू ह्या विझलेल्या तिनी मेणबत्त्या पेटव आणि त्या अशाच तेवत राहतील याची काळजी घे"

हे ऐकून त्या मुलाला खुप आनंद झाला. त्याने आशेची मेणबत्ती घेऊन 'शांती,विश्वास आणि प्रेम' ह्या तिन्ही मेणबत्त्या पेटवल्या आणि पूर्ण घर पुन्हा प्रकाशमान झालं. 

.....सध्याचे दिवस ही असेच काळेकुट्ट आहेत.मनाच्या खोलीत उदासीचा आणि चिंतेचा अंधार पसरला आहे.सर्वत्र अशांती पसरली आहे.अनेकांचे जीव वाचवण्याऱ्या डॉक्टरांवरही लोकांचा विश्वास राहिला नाही.सच्च्या प्रेमापेक्षा त्याचा दिखावा आणि स्वार्थ सर्वत्र दिसत आहे.प्रेमाचे मुखवटे घातलेल्या लोकांचे खरे चेहरे लक्षात आले आहेत. 'आता सर्व संपले आहे आणि कुणीही आपली मदत करू शकणार नाही' अशा विचारांमुळे काही जणांनी अगदी आत्महत्येच्या ही विचार केला आहे.पण एक दिवा ह्या भयाच्या अंधारातून मनाला बाहेर काढणार आहे तो म्हणजे 'आशा (HOPE). *'हे ही दिवस जातील आणि चांगले दिवस येतील'* हा आशादायी विचार आणि भावना. 

चला मग स्वतःच्या मनाला बदलू.मग जग आपोआप बदलेल.आशेचा दिवा पुन्हा पेटवू आणि काळोखाशी लढत राहू.

म्हणूनच आजपासून  "दिल हे छोटासा, छोटीशी आशा,दु:ख भरे मन की भोलीशी आशा" ......मग 

*"फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश,दरी खोऱ्यातुन वाहे एक प्रकाश प्रकाश..."*

Thursday, 14 May 2020

।। शेती आणि शेतकरी ।।
।। शेती आणि शेतकरी ।। 
★★★★★ 

 1 Minutes   7.4K     
पोटच्या जीवा परी, शेतावरी केली माया।
कधी पिकलं शेतात, मूठ भर पीक खाया।।

मेघ पाहून आकाशी, काय शेतात पेरावं।
भेगाळल्या शेतास बांधावरून पहावं।।

रानंमाळ शेती सारी, उन्हानं करपली।
गुरढोर माणसांची, तोंड उन्हान सुकली।।

वाट पिकाची लागली, शेती गेली सारी वाया।
एक थेंब पावसाचा, नाही तोंडात टाकाया।।

विहिरी तलाव तळी, सारी उताणी पडली।
तरी दया कशी नाही, आता पावसास आली।।

आस वाटते मनाला, मेघ येईल धावत।
आता येईल पाऊस, सोनं पिकलं शेतात।।

Wednesday, 19 February 2020

शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले .... लढाई सुरू झाली... एक  छोटीशी घडी... मावळे लढतायेत...पण गढी काही मिळेना... एक दिवस गेला ...आठ दिवस गेले ... पंधरा दिवस....तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला... आणि जिंकली.... कोण होते त्या गढीत... कोण लढल एवढे चिवटपणे..... ती होती साविञी देसाई ....
ही लढवत होती ती गढी....
गढी ताब्यात आली... सावित्री कैद झाली .... राजे गढीत गेले .. गादीवर स्थानापन्न झाले... आणि सावित्रीला समोर आणले गेले ... ती घाबरलेली.. गांगरलेली...आता माझ कस होणार .... तिला एक लहान मुल होत . त्याची काळजी लागली. मला शिवाजी मारणार . माझ बाळ अनाथ होणार . आता मी काय करू. राज्यांच्या समोर रडायला लागली ...
महाराज मला मारा ...
ठार मारा... पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या .
हे तीचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला... तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली ... बाळ आणले ... राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीच काळीज धडधडत होते .. आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार .. काय करावे.
तेवढयात राजांनी आज्ञा दिली. सावित्री ला बंधमुक्त केले. ती धावत राज्यांच्या पायावर झुकली. माझ्या लेकराला मारू नका........

आणि या शञूच्या बाईसाठी..
शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.
ताई.............
ताई  ... कोण म्हटले मी तुम्हाला मारणार ... या बाळाला मारणार ... मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला. 
आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय... काही तरी दिले पाहिजे ना...

ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय... आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..
अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.
राजा.. मी तुला शञू समजले..
मी वैरी समजले..
पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला...
धन्य शिवाजी राजा..
धन्य त्याचे माता पिता..

ही कथा इथच संपत नाही
शिवाजी निघुन गेले. पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले.
यात गादीवर शिवाजी बसले आहेत..लहान मुल मांडीवर आहे. राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. अस शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पहायला मिळते.

हेच शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे...

किती महान माझा शिवाजी राजा होता हो..

शिवरायांना सख्खी बहिण नव्हती
पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .
आणि तुम्हाला सांगायची गरज नाही
काय नात आहे हे भाऊ बहिणीचे...
आणि काय नात आहे शिवाजी राजाच.
माझा शिवाजी भाऊ बहिणीच प्रेम शिकवून गेला .

किती बर होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर...
वादाच्या पलिकडले शिवाजी ...
बहिणीचा भाऊ शिवाजी ...

माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर ...
कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .
निर्भया सारखी प्रकरणे होणार नाहीत .
कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तीचा शिवभक्त भाऊ उभा असेल .

मध्यरात्री कामावरून सुटणारी तरूणी बिनधास्त असेल
कारण तिला विश्वास असेल
हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.
शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे.
माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे

प्रत्येक भावाने प्रत्येक गृपवर पाठवावा
हि विनंती ..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Tuesday, 28 January 2020

मृत्यू - एक अटळ सत्य

मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचं होतं.

कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा (mask) घालत असे.

त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत असत.

त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे.

त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे.

मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्‍या आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं ते ही गोर्‍या मुलींबरोबर.

दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछान्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुप्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील.

त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि २५ जून २००९ या दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी १२ डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही. हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही.

त्याने २५ वर्षे डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला १५० वर्षे जगायचं होतं पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा यांची हाडं तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते. प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा, त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज antibiotics ची अनेक injections घ्यावी लागत असे.

मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे.

मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच २५ जून २००९ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं instant messenger हे सगळं क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी येताच ८ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं. त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं.

मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो, त्यांना मृत्यूच चकवतो, हेच खरं.

चार दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माज.. कशाला तो ! स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच असणार आहे. हे कधी समजणार लोकांना ! कदाचित कधीच नाही.

Thursday, 23 January 2020

🔸🔸🔸🔸🔸🔹🔸🔸🔸🔸🔸
*रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते टर्मिनल ?*

*जर कुठल्या रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी टर्मिनल लिहिले असेल तर त्याचा अर्थ तिथून पुढे ट्रॅक नाही. म्हणजे रेल्वे ज्या दिशेने आली त्याच दिशेने परत जाणार. टर्मिनसला टर्मिनल पण म्हटले जाते. म्हणजे असे स्टेशन जिथून रेल्वे पुढे न जाता आली त्याच दिशेने परत जाते. आपल्या माहितीसाठी देशात सध्या 27 स्टेशनवर टर्मिनल लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस हे देशातील सगळ्यात मोठे टर्मिनल आहेत.*

 *चला तर तुम्हाला सांगतो की, रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते सेंट्रल ?*

*स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असले तर त्या शहरात एक पेक्षा अधिक स्टेशन आहेत. ज्या रेल्वे% स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेले असते ते त्या शहरातील सगळ्यात जुने स्टेशन असते. रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी सेंट्रल लिहिलेलं असण्याचा दुसरा अर्थ असा की ते त्या शहरातील सगळ्यात व्यस्त राहणारे स्टेशन आहे. तुमच्या माहितीसाठी सध्या भारतात मुंबई सेंट्रल, चेन्नई सेंट्रल, त्रिवेंद्रम सेंट्रल, मंगलोर सेंट्रल, कानपुर सेंट्रल हे प्रमुख सेंट्रल स्टेशन आहेत.*

 *रेल्वे स्टेशनच्या नावाच्या शेवटी का लिहिले असते जंक्शन ?*

*कुठल्याही स्टेशनच्या नावाच्या शेवटी जंक्शन लिहिलेले असणे म्हणजे त्या स्टेशनवर येण्या जाण्यासाठी ३ पेक्षा अधिक मार्ग आहेत. म्हणजे ट्रेन एका मार्गाने येऊन त्या स्टेशन वरून इतर दोन मार्गावरून जाऊ शकते. त्यामुळे स्टेशनच्या नावाच्या शेवटी जंक्शन लिहिलेले असते. सध्या देशात मथुरा जंक्शन (७ रुट्स), सालेम जंक्शन (६ रुट्स), विजयवाड़ा जंक्शन (५ रुट्स ), बरैली जंक्शन (५ रुट्स) हे जंक्शन स्टेशन आहेत.*
🔸🔸🔸🔸🔸🔹🔸🔸🔸🔸🔸
🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴
            *मतदानाच्या शाईची कथा.*

*मतदाराने मतदान केल्याची खूण म्हणून बोटावर जी शाई लावली जाते, ती गेली ५६ वर्षे मैसूर येथे बनविली जात आहे याची अनेकांना माहिती नसेल. हि शाई सर्वप्रथम मैसूरचे महाराज कृष्णराज वाडियार यांनी १९३७ मध्ये स्थापन केलेल्या मैसूर इंक लॅक अँड पेंट लिमिटेड या कारखान्यात बनविली गेली. मात्र तिचा प्रथम वापर १९६२ मध्ये केला गेला. पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना या शाईची संकल्पना सुचली.*

*त्याआधी बोटाला डाय लावला जायचा. त्यानंतर आजतागायत हीच शाई निवडणूक प्रक्रियेत वापरली जात आहे.*

*मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमीटेड या कंपनी मार्फत या शाईचे उत्पादन होते. हि शाई येथून मालदीव, अफगाणिस्थान, कंबोडिया, मलेशिया, इजिप्त, द.आफ्रिका या देशात निर्यात केली जाते. या शाईसाठी विशेष फॉर्म्युला वापरला जातो.*

*या शाईत २५ टक्क्यांपर्यंत सिल्वर नायट्रेट असतं. हे खूप महागडं रसायन असतं हे जांभळ्या रंगाचे विशेष रसायन सूर्यप्रकाशात रंग बदलते आणि सहजी ते घालविता येत नाही.*

*भारतात हाताच्या नखाखाली हि शाई मतदान केल्यावर लावली जाते, तर मालदीव कंबोडियात बोट या शाईत बुडविले जाते. बुरांडी, बुर्कीनो फासो येथे ती ब्रशने लावली जाते तर इजिप्त मध्ये त्यासाठी पेन वापरले जाते.*

*निवडणुकीसाठी पुरविण्यात येणाऱ्या शाईची खूप दक्षता घेतली जाते, आणि तिचा चोख हिशोब ठेवला जातो. या शाईच्या एका बाटलीतून ७०० ते ८०० मतदारांच्या बोटावर खूण करता येते. उरलेली शाई निवडणूक कार्यालयात जमा केली जाते आणि नंतर ती नष्ट केली जाते.*

🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴

Tuesday, 21 January 2020

मराठी भाषा पंधरवडा निमित्त

      🙏वंदन मायबोलीला🙏

मायबोली माझी मराठी
करतो तिजला वंदन
तिच्याचमुळे फुलले
माझ्या जीवनाचे नंदनवन

कधी न फिटती उपकार
माझ्या मायबोलीचे
मायबोलीने घडविले
दर्शन थोर विचारांचे

लावते अम्रुत ओठी
माय मराठी
आठवती नित्य
सानेगुरुजींच्या गोष्टी

विश्वात्मकतेचा नंदादीप
पेटविला संत ज्ञानेश्वरांनी
भक्तीच्या मंदिरावर कळस बांधला
महाराष्ट्र संत तुकोबा रायांनी

दासबोध करुणाष्टके मनाचे श्लोक
आरत्या,श्री हनुमंताची देवळे
साकारणार्या समर्थ रामदासांनी
राष्ट्रभक्तीचेही धडे दिले

पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे
बालकवी,राजकवी,बा.भ.बोरकर
यांच्यासह दुर्गाबाई,इरावती कर्वे
शांता शेळकेंनी फुलवला बहर

खांडेकर,कुसुमाग्रज, विंदा,नेमाडे
हे सारस्वत ज्ञानपीठाचे मानकरी
जनाई,मुक्ताई,बहिणाईचे वाङमय
हे तर सुवर्ण लेणे साक्षात् ईश्वरी

फादर दिब्रिटोंसह सर्व अध्यक्षांनी
वाढविली मायबोलीची श्रीमंती
कधी न फिटती उपकार जिचे
त्या माय मराठीची गाऊ आरती

राजेंद्र र.वाणी
दहिसर मुंबई🙏🌷